शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरला दुष्काळाने उभा कांदा करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:01 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे.

ठळक मुद्दे येथील शेती पावसाच्या भरवशावर असताना शेतकऱ्यांनी पहिल्या हलक्या पावसावरच कपाशी पाठोपाठ मकाची लागवड केली. पण ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने जोमाने तीन-साडेतीन फुटापर्यत उंच वाढणारी कपाशी दीड-दोन फुटावरच अडकली, तर मकाचा शेंडा सहा फुटांवर न पोहोचता

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे.   झाडाची भर न झाल्याने कापसाला दरवर्षी ५० ते ९० पर्यंत बोंडे लागून एकरी ८ ते १२ क्विंटल उत्पन्न निघते तेथे यावर्षी १० ते २० बोंडे येऊन १ ते ३ क्विंटल उत्पन्न निघाले आहे. मकाचे एकरी २५ ते ३२ क्विंटलपर्यंत दरवर्षी उत्पन्न हाती लागते. यावर्षी उत्पन्न ३ ते ५ क्विंटलपर्यंत घटून फक्त चाराच हाती आला आहे. पुढे पाऊस पडेल या भरवशावर लाल कांद्याच्या लागवडीचा जुगार खेळत पुन्हा एकदा नशीब आजमवण्याच्या प्रयत्न पाणीच नसल्याने फसला अन् उभा कांदा करपला.आज हजार एकरांवर जमीन पिकांअभावी ओसाड पडली असून, जिकडे पाहावे तिकडे मोकळे रानमाळ दिसत आहे. अनेकांनी बैल, ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून ठेवल्याने ढेकळांशिवाय काहीही नजरेत पडत नाही. परिसरातील गाव व वाड्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तेव्हा रब्बी हंगामाचा विषयच नाही.आता फक्त जून उजाडावा आणि धोधो पाऊस पडावा हीच आस नव्या हंगामासाठी राजापूरकरांना लागून आहे.-बंधारे कोरडे, तर ७० टक्के विहिरी पावसाळ्यातही कोरड्या होत्या.-पावसाळ्यात फक्त दोन सर्वसाधारण, तर सुमारे १८-२०टक्के रब्बी पेरणी बोटावर मोजण्या इतकीच झाली.-अनेक शेततळे वर्षभर रिकामे होते, तर आता ९७ टक्के तळे कोरडेठाक पडले आहेत.उन्हाच्या तीव्रतेने शेततळ्यांचे कागद खराब होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राजापूर हे येवला तालुक्याच्या पूर्वेकडील उंचावर असल्याने येथे दरवर्षी पाऊस पडूनही उत्पन्न निघते असे नाही. राजापूरकरांच्या नशिबी दुष्काळ हा दरवर्षी पाचवीलाच पूजलेला आहे. हरणे, मोर व अन्य वन्यजीव अन्न-पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहे. दुष्काळसदृश स्थितीचा सामना पशुपक्ष्यांनाही करावा लागत आहे. डिसेंबरमध्येच अशी स्थिती असून,पुढील सहा ते सात महिने कसे काढावे या विचाराने शेतकरी चिंतित आहे.==राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने निसर्गाच्या भरवशावर येथील शेतकरी शेती करतात. हे गाव उंचावर असल्याने येथे कुठल्याही सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे-काशीनाथ चव्हाण, शेतकरी, राजापूर