शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

राजापूरला दुष्काळाने उभा कांदा करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:01 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे.

ठळक मुद्दे येथील शेती पावसाच्या भरवशावर असताना शेतकऱ्यांनी पहिल्या हलक्या पावसावरच कपाशी पाठोपाठ मकाची लागवड केली. पण ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने जोमाने तीन-साडेतीन फुटापर्यत उंच वाढणारी कपाशी दीड-दोन फुटावरच अडकली, तर मकाचा शेंडा सहा फुटांवर न पोहोचता

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे.   झाडाची भर न झाल्याने कापसाला दरवर्षी ५० ते ९० पर्यंत बोंडे लागून एकरी ८ ते १२ क्विंटल उत्पन्न निघते तेथे यावर्षी १० ते २० बोंडे येऊन १ ते ३ क्विंटल उत्पन्न निघाले आहे. मकाचे एकरी २५ ते ३२ क्विंटलपर्यंत दरवर्षी उत्पन्न हाती लागते. यावर्षी उत्पन्न ३ ते ५ क्विंटलपर्यंत घटून फक्त चाराच हाती आला आहे. पुढे पाऊस पडेल या भरवशावर लाल कांद्याच्या लागवडीचा जुगार खेळत पुन्हा एकदा नशीब आजमवण्याच्या प्रयत्न पाणीच नसल्याने फसला अन् उभा कांदा करपला.आज हजार एकरांवर जमीन पिकांअभावी ओसाड पडली असून, जिकडे पाहावे तिकडे मोकळे रानमाळ दिसत आहे. अनेकांनी बैल, ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करून ठेवल्याने ढेकळांशिवाय काहीही नजरेत पडत नाही. परिसरातील गाव व वाड्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तेव्हा रब्बी हंगामाचा विषयच नाही.आता फक्त जून उजाडावा आणि धोधो पाऊस पडावा हीच आस नव्या हंगामासाठी राजापूरकरांना लागून आहे.-बंधारे कोरडे, तर ७० टक्के विहिरी पावसाळ्यातही कोरड्या होत्या.-पावसाळ्यात फक्त दोन सर्वसाधारण, तर सुमारे १८-२०टक्के रब्बी पेरणी बोटावर मोजण्या इतकीच झाली.-अनेक शेततळे वर्षभर रिकामे होते, तर आता ९७ टक्के तळे कोरडेठाक पडले आहेत.उन्हाच्या तीव्रतेने शेततळ्यांचे कागद खराब होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राजापूर हे येवला तालुक्याच्या पूर्वेकडील उंचावर असल्याने येथे दरवर्षी पाऊस पडूनही उत्पन्न निघते असे नाही. राजापूरकरांच्या नशिबी दुष्काळ हा दरवर्षी पाचवीलाच पूजलेला आहे. हरणे, मोर व अन्य वन्यजीव अन्न-पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहे. दुष्काळसदृश स्थितीचा सामना पशुपक्ष्यांनाही करावा लागत आहे. डिसेंबरमध्येच अशी स्थिती असून,पुढील सहा ते सात महिने कसे काढावे या विचाराने शेतकरी चिंतित आहे.==राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने निसर्गाच्या भरवशावर येथील शेतकरी शेती करतात. हे गाव उंचावर असल्याने येथे कुठल्याही सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे-काशीनाथ चव्हाण, शेतकरी, राजापूर