शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

‘राज्यराणी’ नांदेडपर्यंत नेण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:11 IST

मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा विरोध : रेल्वेची परतीची वेळ बदलण्याची मागणी

नाशिकरोड : मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे. राज्यराणीची परतीची वेळ बदलावी, दादरला थांबा देऊन प्रायोगिक तत्त्वावर गाडी चालवून निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.नाशिककरांसाठी मुंबई-ठाणे आदि भागात दररोज ये-जा करण्यासाठी राज्यराणी, पंचवटी, गोदावरी या तीनच गाड्या आहेत. राज्यराणीला लासलगाव, निफाड व सर्वांत महत्त्वाचा दादर थांबा नाही. तसेच सीएसटीवरून येणारी राज्यराणीची वेळ चुकीची असल्याने तिला प्रवाशांचा योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नांदेड-सीएसटी राज्यराणी करून तसे वेळापत्रक करण्याचा घाट घातला जात आहे.तत्कालीन स्व. माजी खासदार डॉ. वसंत पवार यांनी नाशिककरांना मनमाड-सीएसटी तपोवन एक्स्प्रेस मिळवून दिली होती. काही वर्षे मनमाड-सीएसटी चाललेली तपोवन एक्स्प्रेस पुढे नांदेड-सीएसटी करण्यात आली. मध्य रेल्वेची वर्षभर चालणारी ही एकमेव गाडी असून नांदेडवरूनच भरून येणाऱ्या तपोवनमध्ये नाशिककरांची हक्काची तपोवन पाठोपाठ मनमाड-पुणे रेल्वे भुसावळ-पुणे करण्यात आली. आता रेल्वे प्रशासनाकडून नाशिककरांची हक्काची व गरजेची राज्यराणी पळविण्याचा घाट घातला जात आहे.‘राज्यराणी’ची परतीची वेळच चुकीचीमनमाडवरून पहाटे ५.२५ ला सुटणारी राज्यराणी नाशिकला ६.१३ व सीएसटीला १०.०७ ला पोहचते. मात्र तिला येताना-जाताना लासलगाव, निफाड, दादर थांबा दिलेला नाही. राज्यराणी सायंकाळी सीएसटीवरून ६.४५, नाशिकला रात्री १०.१५ व मनमाडला रात्री ११.२५ ला पोहचते. सीएसटीवरून नाशिकला येण्यासाठी दुपारी ३ वाजता सेवाग्राम, ४.३० वाजता नंदीग्राम, ६.१५ ला पंचवटी, ६.४५ ला राज्यराणी, ७ वाजता विदर्भ आहे. मुंबईत व्यापाºयांची कामे ५ वाजेपर्यंत संपून जातात. तर शासकीय कार्यालय सायंकाळी ६ वाजता सुटत असल्याने पंचवटी व त्यापूर्वी असलेल्या रेल्वेंना येणाºया प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे राज्यराणीला येणारे प्रवासी जास्त शिल्लक राहत नसल्याने प्रतिसाद मिळत नाही. नंदीग्राम व पंचवटी या दोन गाड्यांमध्ये पावणेदोन तासांचा कालावधी असून, यामध्ये सीएसटीवरून राज्यराणी सोडल्यास तिचा खºया अर्थाने प्रवाशांना व पर्यायाने रेल्वेलादेखील फायदा होईल.दादर महत्त्वाचे ठिकाणनाशिकहून मुंबईला जाणारे बहुतांश प्रवासी हे दादरलाच उतरतात. अत्यंत कमी प्रवासी सीएसटीला उतरतात. दादरला उतरल्यावर प्रवाशांना पश्चिम रेल्वेलाइनवरील अंधेरी, बोरिवली, मुंबई सेंट्रल, चर्चगेट व हार्बर लाइनवरील कुर्ला, चेंबूर, वडाळा आदी ठिकाणी जाणे सोपे होते. मात्र राज्यराणीला दादर थांबा नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळतो.

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिकNandedनांदेड