शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

‘राज्यराणी’ नांदेडपर्यंत नेण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:11 IST

मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा विरोध : रेल्वेची परतीची वेळ बदलण्याची मागणी

नाशिकरोड : मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे. राज्यराणीची परतीची वेळ बदलावी, दादरला थांबा देऊन प्रायोगिक तत्त्वावर गाडी चालवून निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.नाशिककरांसाठी मुंबई-ठाणे आदि भागात दररोज ये-जा करण्यासाठी राज्यराणी, पंचवटी, गोदावरी या तीनच गाड्या आहेत. राज्यराणीला लासलगाव, निफाड व सर्वांत महत्त्वाचा दादर थांबा नाही. तसेच सीएसटीवरून येणारी राज्यराणीची वेळ चुकीची असल्याने तिला प्रवाशांचा योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नांदेड-सीएसटी राज्यराणी करून तसे वेळापत्रक करण्याचा घाट घातला जात आहे.तत्कालीन स्व. माजी खासदार डॉ. वसंत पवार यांनी नाशिककरांना मनमाड-सीएसटी तपोवन एक्स्प्रेस मिळवून दिली होती. काही वर्षे मनमाड-सीएसटी चाललेली तपोवन एक्स्प्रेस पुढे नांदेड-सीएसटी करण्यात आली. मध्य रेल्वेची वर्षभर चालणारी ही एकमेव गाडी असून नांदेडवरूनच भरून येणाऱ्या तपोवनमध्ये नाशिककरांची हक्काची तपोवन पाठोपाठ मनमाड-पुणे रेल्वे भुसावळ-पुणे करण्यात आली. आता रेल्वे प्रशासनाकडून नाशिककरांची हक्काची व गरजेची राज्यराणी पळविण्याचा घाट घातला जात आहे.‘राज्यराणी’ची परतीची वेळच चुकीचीमनमाडवरून पहाटे ५.२५ ला सुटणारी राज्यराणी नाशिकला ६.१३ व सीएसटीला १०.०७ ला पोहचते. मात्र तिला येताना-जाताना लासलगाव, निफाड, दादर थांबा दिलेला नाही. राज्यराणी सायंकाळी सीएसटीवरून ६.४५, नाशिकला रात्री १०.१५ व मनमाडला रात्री ११.२५ ला पोहचते. सीएसटीवरून नाशिकला येण्यासाठी दुपारी ३ वाजता सेवाग्राम, ४.३० वाजता नंदीग्राम, ६.१५ ला पंचवटी, ६.४५ ला राज्यराणी, ७ वाजता विदर्भ आहे. मुंबईत व्यापाºयांची कामे ५ वाजेपर्यंत संपून जातात. तर शासकीय कार्यालय सायंकाळी ६ वाजता सुटत असल्याने पंचवटी व त्यापूर्वी असलेल्या रेल्वेंना येणाºया प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे राज्यराणीला येणारे प्रवासी जास्त शिल्लक राहत नसल्याने प्रतिसाद मिळत नाही. नंदीग्राम व पंचवटी या दोन गाड्यांमध्ये पावणेदोन तासांचा कालावधी असून, यामध्ये सीएसटीवरून राज्यराणी सोडल्यास तिचा खºया अर्थाने प्रवाशांना व पर्यायाने रेल्वेलादेखील फायदा होईल.दादर महत्त्वाचे ठिकाणनाशिकहून मुंबईला जाणारे बहुतांश प्रवासी हे दादरलाच उतरतात. अत्यंत कमी प्रवासी सीएसटीला उतरतात. दादरला उतरल्यावर प्रवाशांना पश्चिम रेल्वेलाइनवरील अंधेरी, बोरिवली, मुंबई सेंट्रल, चर्चगेट व हार्बर लाइनवरील कुर्ला, चेंबूर, वडाळा आदी ठिकाणी जाणे सोपे होते. मात्र राज्यराणीला दादर थांबा नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळतो.

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिकNandedनांदेड