शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

राजापूरला तीव्र पाणीटंचाई दखल : टँकर सुरू करण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:09 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली होती.

ठळक मुद्देटँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको स्थगितपाणीपुरवठ्याची विहिरी व बोअरवेल कोरडेठाक पडले

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला होता. याची दखल घेत तहसीलदारांनी बुधवारी टँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको स्थगित केला. तहसीलदार नरेशकुमार बहिरम, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब भापकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावला. गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडली आहे. पाणीपुरवठा योजनेलगत खैराबाई पाझर तलाव आहे. या तलावातून संपूर्ण पाणी उपसा होत असल्याने पाणीपुरवठ्याची विहिरी व बोअरवेल कोरडेठाक पडले आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाझर तलावातील पाणी आरक्षित करावे असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. या योजनेसाठी लाखो रु पये खर्च केले जातात; मात्र उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे टॅँकर सुरू करण्याची मागणी केली होती, मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मागणीची दखल घेत तहसीलदारांनी टॅँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. निवेदनावर अशोक आव्हाड, सुखदेव मगर, त्र्यंबक वाघ, राहुल कासार, विठ्ठल जाधव, गायत्री सोनवणे, रजनी वाघ, अशोक मुंढे, शिल्पा धात्रक, योगीता घुगे, सरला ठाकरे आदींच्या सह्या आहेत. आंदोलनाशिवाय पाणी मिळणार आहे, अशी भावना राजापूरच्या जनतेची झाली आहे.