शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राजापूरला तीव्र पाणीटंचाई दखल : टँकर सुरू करण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:09 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली होती.

ठळक मुद्देटँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको स्थगितपाणीपुरवठ्याची विहिरी व बोअरवेल कोरडेठाक पडले

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला होता. याची दखल घेत तहसीलदारांनी बुधवारी टँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको स्थगित केला. तहसीलदार नरेशकुमार बहिरम, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब भापकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावला. गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडली आहे. पाणीपुरवठा योजनेलगत खैराबाई पाझर तलाव आहे. या तलावातून संपूर्ण पाणी उपसा होत असल्याने पाणीपुरवठ्याची विहिरी व बोअरवेल कोरडेठाक पडले आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाझर तलावातील पाणी आरक्षित करावे असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. या योजनेसाठी लाखो रु पये खर्च केले जातात; मात्र उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे टॅँकर सुरू करण्याची मागणी केली होती, मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मागणीची दखल घेत तहसीलदारांनी टॅँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. निवेदनावर अशोक आव्हाड, सुखदेव मगर, त्र्यंबक वाघ, राहुल कासार, विठ्ठल जाधव, गायत्री सोनवणे, रजनी वाघ, अशोक मुंढे, शिल्पा धात्रक, योगीता घुगे, सरला ठाकरे आदींच्या सह्या आहेत. आंदोलनाशिवाय पाणी मिळणार आहे, अशी भावना राजापूरच्या जनतेची झाली आहे.