शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

राजापूरला तीव्र पाणीटंचाई दखल : टँकर सुरू करण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:09 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली होती.

ठळक मुद्देटँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको स्थगितपाणीपुरवठ्याची विहिरी व बोअरवेल कोरडेठाक पडले

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला होता. याची दखल घेत तहसीलदारांनी बुधवारी टँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको स्थगित केला. तहसीलदार नरेशकुमार बहिरम, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब भापकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावला. गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडली आहे. पाणीपुरवठा योजनेलगत खैराबाई पाझर तलाव आहे. या तलावातून संपूर्ण पाणी उपसा होत असल्याने पाणीपुरवठ्याची विहिरी व बोअरवेल कोरडेठाक पडले आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाझर तलावातील पाणी आरक्षित करावे असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. या योजनेसाठी लाखो रु पये खर्च केले जातात; मात्र उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे टॅँकर सुरू करण्याची मागणी केली होती, मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मागणीची दखल घेत तहसीलदारांनी टॅँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. निवेदनावर अशोक आव्हाड, सुखदेव मगर, त्र्यंबक वाघ, राहुल कासार, विठ्ठल जाधव, गायत्री सोनवणे, रजनी वाघ, अशोक मुंढे, शिल्पा धात्रक, योगीता घुगे, सरला ठाकरे आदींच्या सह्या आहेत. आंदोलनाशिवाय पाणी मिळणार आहे, अशी भावना राजापूरच्या जनतेची झाली आहे.