शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

"भोंगे कशाला काढायचे? हनुमान चालिसा जरूर म्हणा; पण मशिदींसमोर जाऊन गळा काढू नका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 13:01 IST

देवळाली कॅम्प : देशाचा कारभार संविधानाने चालतो. त्यामुळे भोंगे काढण्याची, वाजविण्याची भाषा करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करता ...

देवळाली कॅम्प : देशाचा कारभार संविधानाने चालतो. त्यामुळे भोंगे काढण्याची, वाजविण्याची भाषा करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. राज ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. भगवा रंग शांततेचे प्रतीक आहे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद करता कामा नये, असेही आठवले यावेळी म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देवळाली कॅम्प येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सभेत आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे होते. यावेळी आठवले यांनी सध्या देशात सुरू असलेल्या भोंगे आणि अयोध्या प्रकरणावरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तरभारतीयांची माफी मागावी, धर्मा धर्मात तेढ निर्माण करू नये कारण भगवा रंग हा गौतम बुद्धांचा आहे. बुद्ध व भगवा रंग शांततेचा आहे. ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालिमीत तयार झालेले असल्याने वाद करण्यापेक्षा वाद मिटविण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद नको, असा सल्लाही त्यांनी दिला.

रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र आल्यास पक्षाचे प्रतिनिधित्व दिल्लीसह राज्यात निर्माण होईल. यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारायला आपण तयार आहोत, शिवाय आपला प्रवास पँथर ते रिपब्लिकन पार्टी असा झालेला असून रक्ताच्या शेवटपर्यंत रिपाइंच राहू, असे त्यांनी सांगितले. यावेळी अमोल पगारे, चंद्रकांत भालेराव, सिद्धार्थ पगारे, आर डी जाधव, अशोक साळवे, गौतम भालेराव, संतोष कटारे, पंडित साळवे, सुभाष बोराडे, गौतम पगारे, संजय भालेराव, प्रभाताई धिवरे, विश्वनाथ काळे, नितीन साळवे, राजू वाघमारे, जयंतीभाई गडा, भगवान कटारिया, योगेश लोखंडे, आदी उपस्थित होते.

मशिदींसमोर गळे कशाला काढता?

भोंगे कशाला काढायचे? हनुमान चालिसा जरूर म्हणा; पण मशिदींसमोर जाऊन गळा काढू नका. संविधानातील भारत उभा करायचा आहे. सर्वांना एकत्र आणून सुखशांतीने जीवन जगायचे आहे. वाद कशाला करायचा, असेही आठवले यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणMNSमनसे