शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

राज साहेब, नाशकात या.. खड्डे पहा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:39 IST

संपूर्ण राज्यात खड्डे झाले आहेत, परंतु नाशकात खड्डे नाही, हे मुंबई येथे जाहीर सभेत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये यावे आणि खड्डे बघावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.

ठळक मुद्देकाळ बदलला; मनसेची सत्ता गेली, कुंभमेळा संपून झाली चार वर्षे

नाशिक : संपूर्ण राज्यात खड्डे झाले आहेत, परंतु नाशकात खड्डे नाही, हे मुंबई येथे जाहीर सभेत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये यावे आणि खड्डे बघावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे यांची शनिवारी (दि.१२) मुंबईत सभा झाली. त्यावेळी त्यांनी सरकारच्या कामाचा समाचार घेताना नेहमीप्रमाणेच नाशिकमधील संदर्भ दिला. राज्यात सर्वत्र खड्डे पडले आहेत. मात्र नाशिकमध्ये खड्डे नाहीत, असे अजब विधान त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी महापालिकेतील मनसेच्या कारभाराचादेखील हवाला दिला. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना ठेकेदारांना दम दिला होता त्यामुळे रस्ते चांगले झाल्याचा दावादेखील त्यांनी केला. त्यानंतर राज यांनी त्यावेळी राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीच्या वेळी मनसेने नाशिकमध्ये केलेली कामे दाखवताना गुळगुळीत रस्तेदेखील दाखवले होते. मात्र, त्यावेळच्या परिस्थितीत आणि आत्तापर्यंत मोठा बदल झाला आहे. मात्र २०१२-२०१७ दरम्यानच्या सत्ता काळातून राज हे बाहेर पडण्यास तयार नसल्याचेच त्यांच्या विधानातून दिसत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.२०१२ मध्ये नाशिक महापालिकेत मनसेची भाजपाच्या मदतीने सत्ता होती. त्याचवेळी २०१४-१५ नाशिकमध्ये कुंभमेळा होता. महापालिकेने एक हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यात राज्य शासनाने ७० टक्के निधी दिला. त्यातून कुंभमेळ्याची कामे करता आली. महत्त्वाची बाब म्हणजे त्यावेळी प्रवीण गेडाम हे कर्तव्य कठोर आयुक्त होते आणि त्यांनी तीन तीन वेळा प्रत्येक कामाचे आॅडिट केले आणि त्यानंतर देयके दिली गेली. २०१७ मध्ये राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी राजयांनी याच कुंभमेळ्याच्या कामांचा हवाला देऊन गुळगुळीत रिंगरोड दाखवले होते.शनिवारी मुंबई येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केल्याने शहरातील त्यांच्या काळातील आणिआताच्या खड्डयांचे चित्र नाशिककरांसमोर उभे ठाकले. ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून नाशिकमधील विकासकामांचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी सभांमध्ये नाशिकचा विकास मुद्दा पुन्हा समोर आल्याचे बोललेजात आहे.खड्ड्यांचे स्मरणरंजनआता कुंभमेळा संपून चार वर्षे झाली असून, तीन वर्षे ठेकेदाराकडील दायित्व संपत नाही तोच खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था झाली आहे. चालू वर्षी पाऊस संपूनही खड्डे जैसे थे असताना राज यांनी मनसेच्या काळातील स्मरण रंजनाच्या आठवणी आजच्या स्थितीत सांगितल्याने नाशिककरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरे