शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

राज साहेब, नाशकात या.. खड्डे पहा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:39 IST

संपूर्ण राज्यात खड्डे झाले आहेत, परंतु नाशकात खड्डे नाही, हे मुंबई येथे जाहीर सभेत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये यावे आणि खड्डे बघावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.

ठळक मुद्देकाळ बदलला; मनसेची सत्ता गेली, कुंभमेळा संपून झाली चार वर्षे

नाशिक : संपूर्ण राज्यात खड्डे झाले आहेत, परंतु नाशकात खड्डे नाही, हे मुंबई येथे जाहीर सभेत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये यावे आणि खड्डे बघावे म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे सांगण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे यांची शनिवारी (दि.१२) मुंबईत सभा झाली. त्यावेळी त्यांनी सरकारच्या कामाचा समाचार घेताना नेहमीप्रमाणेच नाशिकमधील संदर्भ दिला. राज्यात सर्वत्र खड्डे पडले आहेत. मात्र नाशिकमध्ये खड्डे नाहीत, असे अजब विधान त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी महापालिकेतील मनसेच्या कारभाराचादेखील हवाला दिला. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना ठेकेदारांना दम दिला होता त्यामुळे रस्ते चांगले झाल्याचा दावादेखील त्यांनी केला. त्यानंतर राज यांनी त्यावेळी राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीच्या वेळी मनसेने नाशिकमध्ये केलेली कामे दाखवताना गुळगुळीत रस्तेदेखील दाखवले होते. मात्र, त्यावेळच्या परिस्थितीत आणि आत्तापर्यंत मोठा बदल झाला आहे. मात्र २०१२-२०१७ दरम्यानच्या सत्ता काळातून राज हे बाहेर पडण्यास तयार नसल्याचेच त्यांच्या विधानातून दिसत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.२०१२ मध्ये नाशिक महापालिकेत मनसेची भाजपाच्या मदतीने सत्ता होती. त्याचवेळी २०१४-१५ नाशिकमध्ये कुंभमेळा होता. महापालिकेने एक हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यात राज्य शासनाने ७० टक्के निधी दिला. त्यातून कुंभमेळ्याची कामे करता आली. महत्त्वाची बाब म्हणजे त्यावेळी प्रवीण गेडाम हे कर्तव्य कठोर आयुक्त होते आणि त्यांनी तीन तीन वेळा प्रत्येक कामाचे आॅडिट केले आणि त्यानंतर देयके दिली गेली. २०१७ मध्ये राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी राजयांनी याच कुंभमेळ्याच्या कामांचा हवाला देऊन गुळगुळीत रिंगरोड दाखवले होते.शनिवारी मुंबई येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केल्याने शहरातील त्यांच्या काळातील आणिआताच्या खड्डयांचे चित्र नाशिककरांसमोर उभे ठाकले. ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून नाशिकमधील विकासकामांचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी सभांमध्ये नाशिकचा विकास मुद्दा पुन्हा समोर आल्याचे बोललेजात आहे.खड्ड्यांचे स्मरणरंजनआता कुंभमेळा संपून चार वर्षे झाली असून, तीन वर्षे ठेकेदाराकडील दायित्व संपत नाही तोच खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था झाली आहे. चालू वर्षी पाऊस संपूनही खड्डे जैसे थे असताना राज यांनी मनसेच्या काळातील स्मरण रंजनाच्या आठवणी आजच्या स्थितीत सांगितल्याने नाशिककरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरे