शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

पावसाळी सहल : पर्यटकांना भुरळ घालतयं नाशिकचं ‘कोकण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 14:38 IST

चौहोबाजूंनी वेढलेली सह्याद्रीची पर्वतरांग हिरवाईने नटली आहे. या नटलेल्या पर्वतरांगांवरुन फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे वाहू लागले आहे. जणू हे धबधबे या डोंगरकड्यांचे ‘दागिने’ भासत आहेत.

ठळक मुद्दे पर्यटकांनी बेभानपणे या भागात वावरु नये, अशीच अपेक्षा आहे.निसर्गाला ओरबाडू नका

नाशिक : शहरात जरी पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी मात्र जिल्ह्याचे कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यात पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. यामुळे पर्यटकांना नाशिकचे ‘कोकण’ भुरळ घालू लागले आहे. पावसाळी सहलींसाठी शहरवासीयांची पावले आता या कोकणाकडे चालू लागली आहे.

मागील आठवड्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने अचानक पुन्हा आगमन केल्याने त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्याने हिरवा शालू पांघरला आहे. चौहोबाजूंनी वेढलेली सह्याद्रीची पर्वतरांग हिरवाईने नटली आहे. या नटलेल्या पर्वतरांगांवरुन फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे वाहू लागले आहे. जणू हे धबधबे या डोंगरकड्यांचे ‘दागिने’ भासत आहेत. या निसर्गसौंदर्याचे शहरवासियांमध्ये आकर्षण वाढले असून नाशिकसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांमधील भाविक त्र्यंबकेश्वर येथील देवदर्शन आटोपून पावसाळी सहलींचा आनंद या भागात लुटताना दिसत आहे.पर्यटकांच्या वाढत्या गर्दीबरोबरच या तालुक्यांमध्ये बळीराजाची लगबगही नजरेस पडत आहे. शेतीच्या कामांनी वेग घेतला असून नांगरणी पूर्ण झाली असून लवकरच भात लावणीच्या कामााला सुरूवात होणार असल्याचे चित्र आहे. यंदा पावसाने उशिरा दमदार हजेरी लावल्यामुळे या तालुक्यांमध्येही यंदा शेतीच्या कामांना विलंब झाला; मात्र जुलै महिना उजाडताच पावसाची पुन्हा ‘एन्ट्री’ झाल्याने दुबार पेरणीचे सावट टळले.

‘वाघेरा’चे बहरले सौंदर्यपावसाच्या आगमनाने हरसूल-वाघेरा घाटाला हिरवाईचे कोंदण लाभले आहे. हा घाट वाघेरा पाडा ते नाकेपाडापर्यंत सात किलोमीटरचा आहे. वनौषधींसाठी घाटाचा परिसर प्रसिध्द आहे. काळानुरूप या घाटामध्येही अतिक्रमण वाढीस लागल्याने वनौषधी नष्ट होऊ लागल्या आहेत. दरडी कोसळण्याचा धोका घाटात अधिक असल्याने पर्यटकांनी पावसाळी सहलीचा आनंद घाटात लुटताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या घाटात लावण्यात आलेल्या सुचना फलकांकडे दुर्लक्ष करणे दुर्घटनांना निमंत्रण देणारे ठरु शकते.त्र्यंबकेश्वर-घोटी रस्त्यावर पावसाळी सहलींची धम्मालत्र्यंबकेश्वर-घोटी हा मार्ग पावसाळी सहलींसाठी प्रसिध्द आहे. या मार्गावर असलेल्या घाटाच्या दुतर्फा असलेले सह्याद्रीचे उंचचउंच डोंगर जणू धुक्यांमुळे लुप्त झाले की काय? असाच भास पर्यटकांना होतो. पाऊसधारांचा वर्षाव अंगावर झेलत पर्यटक छायाचित्रांची हौस भागविताना दिसतात. पेगलवाडी, पहिने या आदिवासी गावातील गावकºयांना पर्यटकांच्या सहलींमुळे काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होताना दिसतो. भटकंती करतांना विविध जातीचे वृक्ष, रानभाज्या, फुलं, रानफुलं, पक्ष्यांची घरटी यांचं जवळून निरिक्षण करतानाही काही निसर्गप्रेमी नजरेस पडत आहे.

दुगारवाडी धबधबा बघताय, पण जरा जपूनशहरात येणा-या पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण म्हणजे दुगारवाडी धबधबा होय. या भागातील डोंगरमाथ्यावरून वाहणारे दुधाळ धबधबे, गर्द हिरवाईने नटलेल्या वाटा, अधूनमधून सातत्याने संततधार कोसळणारा पाऊस असे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना मोहिनी घालते. नाशिक शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर पर्यटकांच्या पसंतीचा आहे. दुगारवाडी धबधबा हा गर्द हिरवाईतून कोसळणारा अत्यंत उंचीचा धबधबा आहे. मात्र हा भाग धोकादायक असून, पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.सापगाव पासुन धबधब्याकडे पायी जावे लागते. डोंगर दºयातून वाट काढत जाताना उपनदी ओलांडावी लागते, हा अत्यंत अवघड असा टप्पा आहे. त्यामुळे जरा जपूनच या धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा. सापगावपासून थेट दुगारवाडी धबधब्यापर्यंत जाण्यासाठी अडीच तास लागतात.

त्यांच्या कष्टाचा वाटतो हेवा‘‘मातीच्या लेकराचं मातीमंदी मन सारं, आभाळाची माया अंगी कष्टाचं वारं ...,’’ या ओळीतुन कष्टाळु शेतकरी आपल्याला अशाच भटकंतीतून सापडतो; मात्र पावसाळी सहलीचा आनंद लुटताना तसा दृष्टीकोनही गरजेचा असतो. येथे फिरताना आदिवासी बांधवांची शेती, शेतीची पद्धत आणि वा-यावर झुलणारी पीके मनाला मोहिनी घालतात आणि आपण ज्यांच्यामुळे अन्न खातो ते अन्नदाता आणि त्याचे कष्ट बघून हेवा वाटतो आणि अभिमानही. घाटमाथ्यावरच्या भटकंतीत शुद्ध हवा तर मिळतेच शिवाय रोजच्या व्यापामुळे शिणलेलं मन प्रसन्न होतं.

निसर्गाला ओरबाडू नकापावसाळी सहलीदरम्यान अनेक पर्यटक निसर्गाचे नियम सर्रास पायदळी तुडवितात. मद्यपान,नाचगाणे, वृक्षवेलीनां ओरबाडने जेवणानंतरचे खाद्यपदार्थ, प्लास्टिक, रिकाम्या बाटल्या बसल्याजागी फेकून देणे असे प्रकारही सर्रास पहायला मिळतात. निसर्गकृपेने बहरलेला आदिवासी भाग मानवीकृत्यामुळे गलिच्छ होत चालाला आहे. पर्यटकांनी बेभानपणे या भागात वावरु नये, अशीच अपेक्षा अन् आदिवासी बांधवांची मागणी आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरRainपाऊसanjenriअंजनेरी