शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पावसामुळे १४ गावांमधील टँकर्सच्या फेऱ्या थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पावसाची कृपादृष्टी बरसू लागल्याने जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या टँकर्सच्या फेऱ्या बंद होण्याची दाट ...

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पावसाची कृपादृष्टी बरसू लागल्याने जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या टँकर्सच्या फेऱ्या बंद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातील पाणी पातळीतही वाढ होऊ लागली असून विहिरींनाही पाणी वाढले आहे. त्यामुळे या आठवड्यात टँकर्स बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या जिल्ह्यातील १४ गावांमध्ये ९ टँकर्स सुरू आहेत.

जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने चिंता वाढली होती. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पावसाचे वेळापत्रकच कोलमडले होते. त्यामुळे ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ९ गावांमध्ये टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. अजूनही १४ गावे, ६ वाडे अशा एकूण २० ठिकाणी ९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये येवला तालुक्यात सर्वाधिक ६ टँकर्स सुरू आहेत. आता येवल्यातही चांगला पाऊस पडल्याने टँकर्सची मागणी कमी होणार आहे. बागलाणमध्ये ४, देवळा येथे २, मालेगावमध्ये २, तर येवला येथे ६ गावांमध्ये टँकर्स सुरू आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने संततधार धरल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या वाड्या-पाड्यावरही पाऊस सुरू असल्यामुळे वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेले टँकर्स देखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हवामान खात्याचे सर्व अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे गणितही बिघडले आहे. जून-जुलै कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. जुलैच्या मध्यानंतर पडलेल्या पावसामुळे दुबारचे संकट काही प्रमाणात टळले. त्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकरी आता सुखावला असून त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आनंदाची बरसात घेऊन आलेल्या या पावसामुळे शेतकरी सुखावले असून पिकांना देखील जीवदान मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

--इन्फो--

सोयाबीन, भुईमूग पिकांना दिलास

या पावसामुळे शेतकरी सुखावले असून पिकांना जीवदानही मिळाले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पाऊसच नसल्याने संततधारेमुळे विहिरींमध्ये पाणी उतरण्यास या पावसाची मदत होणार आहे. पाण्याची गरज असलेल्या सोयाबीन, भुईमूग, मका, या पिकांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी पिकेही वाचली आहेत.

दरम्यान, गंगापूर धरण ८२ टक्के भरल्याने नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.