शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे १४ गावांमधील टँकर्सच्या फेऱ्या थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पावसाची कृपादृष्टी बरसू लागल्याने जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या टँकर्सच्या फेऱ्या बंद होण्याची दाट ...

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पावसाची कृपादृष्टी बरसू लागल्याने जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या टँकर्सच्या फेऱ्या बंद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातील पाणी पातळीतही वाढ होऊ लागली असून विहिरींनाही पाणी वाढले आहे. त्यामुळे या आठवड्यात टँकर्स बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या जिल्ह्यातील १४ गावांमध्ये ९ टँकर्स सुरू आहेत.

जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने चिंता वाढली होती. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पावसाचे वेळापत्रकच कोलमडले होते. त्यामुळे ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ९ गावांमध्ये टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. अजूनही १४ गावे, ६ वाडे अशा एकूण २० ठिकाणी ९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये येवला तालुक्यात सर्वाधिक ६ टँकर्स सुरू आहेत. आता येवल्यातही चांगला पाऊस पडल्याने टँकर्सची मागणी कमी होणार आहे. बागलाणमध्ये ४, देवळा येथे २, मालेगावमध्ये २, तर येवला येथे ६ गावांमध्ये टँकर्स सुरू आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने संततधार धरल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या वाड्या-पाड्यावरही पाऊस सुरू असल्यामुळे वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेले टँकर्स देखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हवामान खात्याचे सर्व अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे गणितही बिघडले आहे. जून-जुलै कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. जुलैच्या मध्यानंतर पडलेल्या पावसामुळे दुबारचे संकट काही प्रमाणात टळले. त्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकरी आता सुखावला असून त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आनंदाची बरसात घेऊन आलेल्या या पावसामुळे शेतकरी सुखावले असून पिकांना देखील जीवदान मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

--इन्फो--

सोयाबीन, भुईमूग पिकांना दिलास

या पावसामुळे शेतकरी सुखावले असून पिकांना जीवदानही मिळाले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पाऊसच नसल्याने संततधारेमुळे विहिरींमध्ये पाणी उतरण्यास या पावसाची मदत होणार आहे. पाण्याची गरज असलेल्या सोयाबीन, भुईमूग, मका, या पिकांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी पिकेही वाचली आहेत.

दरम्यान, गंगापूर धरण ८२ टक्के भरल्याने नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.