शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

पावसामुळे १४ गावांमधील टँकर्सच्या फेऱ्या थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पावसाची कृपादृष्टी बरसू लागल्याने जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या टँकर्सच्या फेऱ्या बंद होण्याची दाट ...

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पावसाची कृपादृष्टी बरसू लागल्याने जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या टँकर्सच्या फेऱ्या बंद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातील पाणी पातळीतही वाढ होऊ लागली असून विहिरींनाही पाणी वाढले आहे. त्यामुळे या आठवड्यात टँकर्स बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या जिल्ह्यातील १४ गावांमध्ये ९ टँकर्स सुरू आहेत.

जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने चिंता वाढली होती. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पावसाचे वेळापत्रकच कोलमडले होते. त्यामुळे ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ९ गावांमध्ये टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. अजूनही १४ गावे, ६ वाडे अशा एकूण २० ठिकाणी ९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये येवला तालुक्यात सर्वाधिक ६ टँकर्स सुरू आहेत. आता येवल्यातही चांगला पाऊस पडल्याने टँकर्सची मागणी कमी होणार आहे. बागलाणमध्ये ४, देवळा येथे २, मालेगावमध्ये २, तर येवला येथे ६ गावांमध्ये टँकर्स सुरू आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने संततधार धरल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या वाड्या-पाड्यावरही पाऊस सुरू असल्यामुळे वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेले टँकर्स देखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हवामान खात्याचे सर्व अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे गणितही बिघडले आहे. जून-जुलै कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. जुलैच्या मध्यानंतर पडलेल्या पावसामुळे दुबारचे संकट काही प्रमाणात टळले. त्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकरी आता सुखावला असून त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आनंदाची बरसात घेऊन आलेल्या या पावसामुळे शेतकरी सुखावले असून पिकांना देखील जीवदान मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

--इन्फो--

सोयाबीन, भुईमूग पिकांना दिलास

या पावसामुळे शेतकरी सुखावले असून पिकांना जीवदानही मिळाले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पाऊसच नसल्याने संततधारेमुळे विहिरींमध्ये पाणी उतरण्यास या पावसाची मदत होणार आहे. पाण्याची गरज असलेल्या सोयाबीन, भुईमूग, मका, या पिकांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी पिकेही वाचली आहेत.

दरम्यान, गंगापूर धरण ८२ टक्के भरल्याने नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.