शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला पर्जन्यवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:23 IST

परिसरात गेल्या दोन दिवासांपासून सुरू असलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गावात पाणी शिरले आहे. यामुळे वाहनधारक व दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय झाली. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांची पुराच्या पाण्यामुळे तारांबळ उडाली.

त्र्यंबकेश्वर : परिसरात गेल्या दोन दिवासांपासून सुरू असलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गावात पाणी शिरले आहे. यामुळे वाहनधारक व दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय झाली. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांची पुराच्या पाण्यामुळे तारांबळ उडाली.परिसरातील रस्त्यांवर श्रावण महिन्यात प्रचंड संख्येने येणाºया भाविकांच्या सोयीसाठी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स पाण्यामुळे एका जागेहून दुसºया ठिकाणी हलले. काही दुकानधारकांच्या वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्र्यंबकेश्वरला श्रावणी शनिवारनिमित्त येऊन मुक्कामी असलेल्या भाविकांना येथेच थांबून राहावे लागले. टॅक्सी व बससेवेवरही या पुराच्या पाण्याचा विपरीत परिणाम झाला. आतापर्यंत त्र्यंबकेश्वरला १८६० मिमी पावसाची नोंद झाली असून, अद्यापपावेतो पावसाळा संपला नसल्याने अजूनही जोरदार पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे पावसाची सरासरी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्र्यंबकला जोरदार पाऊस पडला की, गंगासागर तलाव, अहिल्या धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असते. अहिल्या धरण ओव्हरफ्लो झाले की, निदान अहिल्या नदी तरी वाहते पण गंगासागरचे पाणी थेट महाजन चौकातून गावात वाहते. त्यात म्हातार ओहळाची भर पडते. दुसरीकडे तेलगल्लीकडून येणाºया नीलगंगा ओहळ हे सर्व गोदावरीत एकत्र येऊन गावात पूर येतो. सर्वत्र पाणीच पाणी चहूकडे..! अशी परिस्थिती निर्माण होत असते. महाजन चौक, कुशावर्त परिसर, मेनरोड, भाजी मंडई, डॉ. आंबेडकर चौक आदी परिसरात सर्वत्र पाणी असते. कमरेएवढे पाणी असते. गावाबाहेर असलेल्या गोदावरी पुलावरून पाणी वाहत होते. तर पूर ओसरल्यावर घरात घुसलेले पुराचे पाणी उपसताना नागरिक दिसत होते. पूर यायचे अजून एक कारण म्हणजे पालिकेकडून समाधानकारकरीत्या पात्राची सफाई झालेली नाही.पाटोदा परिसरात पिकांना जीवदानपाटोदा : रविवारी सकाळपासून परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील बाजरी, मका, मूग, भुईमूग, सोयाबीन अशा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून, पिकेही जोमदार आली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतातील ऐन फुलोºयात आलेल्या पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या होत्या. पिके वाया जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ऐन गरजेच्या वेळीच पावसाने हात दिल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पालखेड कालव्यातूनही रोटेशन सुरू आहे. ज्या शेतकºयांकडे व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देत होते; मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी पुरविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पिके जगविण्यासाठी शेतकºयांची मोठी धडपड सुरू होती. रविवारी सकाळपासून ठाणगाव, पिंपरी, कानडी, विखरणी, कातरणी, आडगाव रेपाळ पिंपळगाव लेप परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली़