शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

त्र्यंबकेश्वरला पर्जन्यवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:23 IST

परिसरात गेल्या दोन दिवासांपासून सुरू असलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गावात पाणी शिरले आहे. यामुळे वाहनधारक व दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय झाली. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांची पुराच्या पाण्यामुळे तारांबळ उडाली.

त्र्यंबकेश्वर : परिसरात गेल्या दोन दिवासांपासून सुरू असलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गावात पाणी शिरले आहे. यामुळे वाहनधारक व दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय झाली. अनेक घरे व दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांची पुराच्या पाण्यामुळे तारांबळ उडाली.परिसरातील रस्त्यांवर श्रावण महिन्यात प्रचंड संख्येने येणाºया भाविकांच्या सोयीसाठी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स पाण्यामुळे एका जागेहून दुसºया ठिकाणी हलले. काही दुकानधारकांच्या वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्र्यंबकेश्वरला श्रावणी शनिवारनिमित्त येऊन मुक्कामी असलेल्या भाविकांना येथेच थांबून राहावे लागले. टॅक्सी व बससेवेवरही या पुराच्या पाण्याचा विपरीत परिणाम झाला. आतापर्यंत त्र्यंबकेश्वरला १८६० मिमी पावसाची नोंद झाली असून, अद्यापपावेतो पावसाळा संपला नसल्याने अजूनही जोरदार पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे पावसाची सरासरी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्र्यंबकला जोरदार पाऊस पडला की, गंगासागर तलाव, अहिल्या धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असते. अहिल्या धरण ओव्हरफ्लो झाले की, निदान अहिल्या नदी तरी वाहते पण गंगासागरचे पाणी थेट महाजन चौकातून गावात वाहते. त्यात म्हातार ओहळाची भर पडते. दुसरीकडे तेलगल्लीकडून येणाºया नीलगंगा ओहळ हे सर्व गोदावरीत एकत्र येऊन गावात पूर येतो. सर्वत्र पाणीच पाणी चहूकडे..! अशी परिस्थिती निर्माण होत असते. महाजन चौक, कुशावर्त परिसर, मेनरोड, भाजी मंडई, डॉ. आंबेडकर चौक आदी परिसरात सर्वत्र पाणी असते. कमरेएवढे पाणी असते. गावाबाहेर असलेल्या गोदावरी पुलावरून पाणी वाहत होते. तर पूर ओसरल्यावर घरात घुसलेले पुराचे पाणी उपसताना नागरिक दिसत होते. पूर यायचे अजून एक कारण म्हणजे पालिकेकडून समाधानकारकरीत्या पात्राची सफाई झालेली नाही.पाटोदा परिसरात पिकांना जीवदानपाटोदा : रविवारी सकाळपासून परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील बाजरी, मका, मूग, भुईमूग, सोयाबीन अशा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून, पिकेही जोमदार आली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतातील ऐन फुलोºयात आलेल्या पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या होत्या. पिके वाया जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ऐन गरजेच्या वेळीच पावसाने हात दिल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पालखेड कालव्यातूनही रोटेशन सुरू आहे. ज्या शेतकºयांकडे व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देत होते; मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी पुरविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पिके जगविण्यासाठी शेतकºयांची मोठी धडपड सुरू होती. रविवारी सकाळपासून ठाणगाव, पिंपरी, कानडी, विखरणी, कातरणी, आडगाव रेपाळ पिंपळगाव लेप परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली़