शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

नाशिक जिल्ह्यात पावसाने साधली गतवर्षाची बरोबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:40 IST

गेल्या महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सर्वदूर झोडपून काढत महिन्याची सरासरी ओलांडणाºया पावसाने नंतर जवळपास महिनाभर दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्'ात ३७ टक्के पाऊस झाला होता, त्याचीच बरोबरी यंदाही साधली गेली आहे. त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहिनाभरापासून प्रतीक्षा : शेतकरी हवालदिल

नाशिक : गेल्या महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सर्वदूर झोडपून काढत महिन्याची सरासरी ओलांडणाºया पावसाने नंतर जवळपास महिनाभर दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्'ात ३७ टक्के पाऊस झाला होता, त्याचीच बरोबरी यंदाही साधली गेली आहे. त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.गेल्या वर्षी पावसाने थेट जुलै महिन्यातच हजेरी लावल्यामुळे त्यानंतरच पेरण्यांना वेग आला होता. संपूर्ण जून महिना कोरडाच गेल्याने पेरण्याही उशिराने करण्यात आल्या. यंदा मात्र निसर्ग चक्रीवादळाने हवामानात अचानक बदल होऊन जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने झडी लावली होती. विशेष म्हणजे दुष्काळी तालुक्यांमध्येही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नदी, नाल्यांच्या पातळीत वाढ झाली होती. पावसाचे आश्वासक आगमन पाहता, शेतकºयांनी जूनच्या दुसºया आठवड्यापासून पीक पेरणीस सुरुवात केली, तर भात शेतीसाठी रोपे तयार करण्यास सुरुवात केली. हवामान खात्यानेही यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे जाहीर केल्यामुळे शेतकºयांनी त्याच भरवशावर पेरणीला वेग दिला. पहिल्या पावसानंतर पेरणी केलेल्या मका, सोयाबीन, भुईमूग, बाजरी या पिकांमध्ये तण काढण्याचे काम सुरू आहे. नेमकी पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज निर्माण झालेली असताना गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.गेल्या पंधरा दिवसांत सरासरी १२४.२ मिलिमीटर इतका म्हणजे जुलै महिन्याच्या सरासरीच्या ३६.७९ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षीदेखील याचदरम्यान जिल्'ात ३७.१९ टक्के पाऊस झालाहोता. त्यामुळे यंदा चांगल्या पावसाच्या भरवशावर पिके घेतलेल्या शेतकºयांमध्ये नाराजी पसरली आहे. कृषी खात्याच्या अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार येत्या चार ते पाच दिवसात चांगला पाऊस झाला तर पिके तग धरण्याची शक्यता आहे, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.चालू महिन्यातील पर्जन्यमाननाशिक -६१, इगतपुरी-५८०, दिंडोरी-२५, पेठ-१७२, त्र्यंबकेश्वर-१८३, मालेगाव- ८०, नांदगाव- १२४, चांदवड- ८७, कळवण-६२, बागलाण- १३०, सुरगाणा-१५६, देवळा-७५, निफाड-३२, सिन्नर-५०, येवला-४८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी