शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात पावसाने साधली गतवर्षाची बरोबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:40 IST

गेल्या महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सर्वदूर झोडपून काढत महिन्याची सरासरी ओलांडणाºया पावसाने नंतर जवळपास महिनाभर दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्'ात ३७ टक्के पाऊस झाला होता, त्याचीच बरोबरी यंदाही साधली गेली आहे. त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहिनाभरापासून प्रतीक्षा : शेतकरी हवालदिल

नाशिक : गेल्या महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सर्वदूर झोडपून काढत महिन्याची सरासरी ओलांडणाºया पावसाने नंतर जवळपास महिनाभर दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्'ात ३७ टक्के पाऊस झाला होता, त्याचीच बरोबरी यंदाही साधली गेली आहे. त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.गेल्या वर्षी पावसाने थेट जुलै महिन्यातच हजेरी लावल्यामुळे त्यानंतरच पेरण्यांना वेग आला होता. संपूर्ण जून महिना कोरडाच गेल्याने पेरण्याही उशिराने करण्यात आल्या. यंदा मात्र निसर्ग चक्रीवादळाने हवामानात अचानक बदल होऊन जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने झडी लावली होती. विशेष म्हणजे दुष्काळी तालुक्यांमध्येही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नदी, नाल्यांच्या पातळीत वाढ झाली होती. पावसाचे आश्वासक आगमन पाहता, शेतकºयांनी जूनच्या दुसºया आठवड्यापासून पीक पेरणीस सुरुवात केली, तर भात शेतीसाठी रोपे तयार करण्यास सुरुवात केली. हवामान खात्यानेही यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे जाहीर केल्यामुळे शेतकºयांनी त्याच भरवशावर पेरणीला वेग दिला. पहिल्या पावसानंतर पेरणी केलेल्या मका, सोयाबीन, भुईमूग, बाजरी या पिकांमध्ये तण काढण्याचे काम सुरू आहे. नेमकी पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज निर्माण झालेली असताना गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.गेल्या पंधरा दिवसांत सरासरी १२४.२ मिलिमीटर इतका म्हणजे जुलै महिन्याच्या सरासरीच्या ३६.७९ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षीदेखील याचदरम्यान जिल्'ात ३७.१९ टक्के पाऊस झालाहोता. त्यामुळे यंदा चांगल्या पावसाच्या भरवशावर पिके घेतलेल्या शेतकºयांमध्ये नाराजी पसरली आहे. कृषी खात्याच्या अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार येत्या चार ते पाच दिवसात चांगला पाऊस झाला तर पिके तग धरण्याची शक्यता आहे, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.चालू महिन्यातील पर्जन्यमाननाशिक -६१, इगतपुरी-५८०, दिंडोरी-२५, पेठ-१७२, त्र्यंबकेश्वर-१८३, मालेगाव- ८०, नांदगाव- १२४, चांदवड- ८७, कळवण-६२, बागलाण- १३०, सुरगाणा-१५६, देवळा-७५, निफाड-३२, सिन्नर-५०, येवला-४८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी