शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जोरदार वार्‍यासह शहरात पावसाच्या सरी

By admin | Updated: May 7, 2014 21:56 IST

नाशिक : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना सायंकाळच्या सुमारास अर्धा तास झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला.

नाशिक : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना सायंकाळच्या सुमारास अर्धा तास झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. वाढत्या तपमानामुळे नाशिकरांच्या अंगाची काहिली झालेली असतानाच सायंकाळी दाटून आलेले आभाळ आणि वाहणार्‍या वार्‍यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मात्र जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. आजचा पारा वाढलेला असतानाच सायंकाळच्या सुमारास आभाळ दाटून आल्याने वातावरणात अधिकच उकाडा निर्माण झाला होता. पावसाच्या थेंबांसह जोरदार वाराही वाहू लागल्याने शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. विशेषत: नाशिकरोड परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वार्‍यासह कोसळणार्‍या पावसामुळे या भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचप्रमाणे पंचवटीतील काही भागात काहीकाळ पावसाने हजेरी लावली. सिडको, सातपूर येथेही आभाळ दाटून आले; मात्र या ठिकाणी तुरळक पाऊस झाला. नाशिकरोडसह शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली, तर बुधवार बाजारातही व्यापार्‍यांचे चांगलेच हाल झाले. सायंकाळच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागल्याने शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. यामुळे अगोदरच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता. पाऊस थांबल्यानंतर तेथील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. ००००इन्फो----तीन फिडर्स नादुरुस्तजोरदार वार्‍यासह अवघ्या अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. सातपूर येथील ३३ केव्ही फिडरमध्ये बिघाड झाल्याने या फिडरवरील ग्राहकांना सुमारे तासभर वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे सातपूर, महात्मानगर, त्र्यंबकरोड, तसेच गंगापूर परिसरातील काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच ३३ केव्ही पंचक फिडरवरही स्ट्रिपिंग झाल्याने या फिडरवरील ग्राहकही हैराण झाले होते. टाकळी फिडर वाहिनीवर एकूण ११ ठिकाणी स्ट्रिपिंग झाल्यामुळे या वाहिन्यांवरील हजारो ग्राहकांना वीजपुरवठा होऊ शकला नाही. वार्‍यासह पाऊस सुरू झाल्याने काही ठिकाणी वीज कंपनीनेच वीजपुरवठा तात्पुरता बंद केला होता. काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत होईल, असा दावा वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी करूनही सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ अनेक भागातील वीजपुरवठा खंडितच होता.