शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
अनंत अंबानी-राधिक मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
10
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
11
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
12
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
13
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
14
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
15
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
16
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
17
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
18
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
19
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 8:40 PM

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पहिल्यांदाच जून अखेरीस पेरण्यांची कामे उरकली आहेत. मृगाच्या दमदार पावसाने पिकांची उगवन जोरदार झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने या पिकांना आता वरुणराजाची ओढ लागली आहे.

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पहिल्यांदाच जून अखेरीस पेरण्यांची कामे उरकली आहेत. मृगाच्या दमदार पावसाने पिकांची उगवन जोरदार झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने या पिकांना आता वरुणराजाची ओढ लागली आहे.पिकांना पाण्याचा ताण पडत असल्याने पुर्व भागातील बळीराजा येथील येरे येरे पावसा म्हणत अर्जव करताना दिसतो आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची वेळेआधीच वाटचाल सुरू झाली. दुष्काळी म्हणून गणल्या जाणाऱ्या सिन्नरच्या पूर्व भागात जूनच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यानीदेखील वेग घेतला.शेतकऱ्यांना बांधावर खतांचे वाटपपाथरे : जामनदी फार्मर प्रोडूसर कंपनीच्या वतीने पाथरे येथील शेतकरी सभासदांना थेट बांधावर युरिया खताचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र चिने, संचालक नारायण शिंदे, वारेगावचे सरपंच मिननाथ माळी यांचेसह शेतकरी सभासद उपस्थित होते. ना नफा ना तोटा या तत्वाने केवळ शेतकºयांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या या कंपनीने आज सर्वत्र युरिया खताची टंचाई निर्माण झाली असताना हा उपक्रम राबवला. ज्या सभासद शेतकºयांनी संस्थेकडे खताची मागणी नोंदविली होती त्या शेतकºयांच्या बांधावर रास्त किमतीत युरिया खत पोहोच करण्यात आले. गत चार वर्षांपासून शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवणाºया या संस्थेने डाळिंब, भाजीपाला, कांदा आदी शेतमालाची रास्त भावात खरेदी करून विक्री केली आहे. कंपनीमार्फत शेतकºयांना खात्रीशीर बियाणे, औषधे उपलब्ध करून दिली जातात. शेतकरी ते ग्राहक या तत्त्वाने संस्था कार्य करत असून वावी येथे शेतीसाठी आवश्यक असणाºया खते, बी - बियाणे, अवजारांचे विक्री केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र चिने यांनी दिली.---------------------कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर राहिल्याने पिकांसाठी अनुकूल परिस्थिती राहिली. मात्र, ऊन सावल्यांचा खेळात पिकांना पाण्याची गरज असल्याने आता येरे येरे पावसा मांडण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. अनेक भागात शेतकºयांनी पिकांना युरियाचा पहिला डोस दिला आहे. तर असंख्य शेतकºयांनी युरियाची खरेदी करून ठेवली आहे.-----------पाऊस नसल्याने खतांची ही मात्रा वापरतात येत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. सध्यस्थितीत पिकांना खतांची मात्रा मिळाली तर पुढच्या पावसात पिके बहरतील अशी आस आहे.---------------कारण पुढच्या काळात श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पूर्वभागात जेमतेम पडणाºया पावसावर पिकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पिके वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसला तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. अनेक भागात मका, सोयाबीन वर किडीचे अस्तित्व जाणवत आहे. पावसाची वाट बघावी लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक