शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

जलकुंभामधून वर्षाव; हजारो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:30 IST

जिल्ह्यासह अवघे राज्य दुष्काळात होरपळून निघालेले असताना गंगापूर धरणाचा जलसाठाही २० टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना पालक सचिव सीताराम कुंटे यांनी आढावा बैठक घेत शहरात पाणीकपात करण्याचा सल्ला शुक्रवारी महापालिका, जिल्हा प्रशासनाला दिला; मात्र दुसºयाच दिवशी शनिवारी (दि.१८) सिडको परिसरातील खुटवडनगर भागातील महापालिकेचा जलकुंभ धो-धो भरून सुमारे अर्धा तास वाहत असल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली.

ठळक मुद्देएकीकडे पाणीकपातीची टांगती तलवार; दुसरीकडे अपव्यय सुरूच

सिडको : जिल्ह्यासह अवघे राज्य दुष्काळात होरपळून निघालेले असताना गंगापूर धरणाचा जलसाठाही २० टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना पालक सचिव सीताराम कुंटे यांनी आढावा बैठक घेत शहरात पाणीकपात करण्याचा सल्ला शुक्रवारी महापालिका, जिल्हा प्रशासनाला दिला; मात्र दुसºयाच दिवशी शनिवारी (दि.१८) सिडको परिसरातील खुटवडनगर भागातील महापालिकेचा जलकुंभ धो-धो भरून सुमारे अर्धा तास वाहत असल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. वाया गेलेल्या हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची जबाबदारी आता नेमकी कोणाची? महापालिका प्रशासन याबाबत कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.राज्यात दुष्काळाने हाहाकार माजविला असून नाशिक जिल्ह्यातील अनेक गावे पाण्यावाचून तहानली आहेत. अशा परिस्थितीत सरकारपुढेही दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नाशिक शहराची तहान भागविणाºया गंगापूर धरणाचा जलसाठाही वीस टक्क्यांवर आला आहे. गंगापूर धरण समूहाचा पाणीसाठाही कमालीचा घसरला आहे. यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. पालक सचिवांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत महापालिकेला पाणीकपात करण्याचा सल्ला दिला.दुसरीकडे महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार शनिवारी चव्हाट्यावर आला. खुटवडनगर परिसरात दैनंदिन पाण्याचा पुरवठा करणारे जलकुंभाचा भरणा केला जात होता. यावेळी संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे हा जलकुंभ संपूर्ण भरून धो-धो भरून वाहत होता. त्यामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी गटारीत वाहून गेले. महापालिकेच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, याच मनपाच्या गलथान व ढिसाळ नियोजनामुळे शनिवारी (दि.१८) दुपारी एक वाजेच्या सुमारास खुटवडनगर भागातील वृंदावननगर येथील मनपाच्या जलकुंभ भरून धो-धो वाहत होता. सुमारे अर्धातास वाहत असलेल्या जलकुंभातून हजारो लिटर पाणी वाया गेले.घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यातनाशिक शहरापासून जवळच असलेल्या ग्रामीण भागात टिपूसभर पाण्यासाठी नागरिकांना अक्षरश: दिवस-रात्र एक करावी लागत आहे. घोटभर पाण्यासाठी महिला व लहान बालके जीव धोक्यात घालत असल्याचे विदारक चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच पाण्याची होत असलेली नासाडी थांबविण्याची गरज आहे.परिसरातून ये-जा करण्याºया नागरिकांनीदेखील मनपाच्या ही गोष्ट निदर्शनात आणून दिली. जलकुंभ ओव्हरफ्लो झाल्यानंतर कामकाज करणाºया कर्मचाºयाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित कर्मचारी हा खुटवडनगर येथून अंबड गावातील पाण्याच्या जलकुंभाकडे जाऊन त्याने व्हॉल्व्ह बंद केले. यावेळात मात्र हजारो लिटर पाणी वाया गेल्याने याबाबत मनपाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी