शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

जलकुंभामधून वर्षाव; हजारो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:30 IST

जिल्ह्यासह अवघे राज्य दुष्काळात होरपळून निघालेले असताना गंगापूर धरणाचा जलसाठाही २० टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना पालक सचिव सीताराम कुंटे यांनी आढावा बैठक घेत शहरात पाणीकपात करण्याचा सल्ला शुक्रवारी महापालिका, जिल्हा प्रशासनाला दिला; मात्र दुसºयाच दिवशी शनिवारी (दि.१८) सिडको परिसरातील खुटवडनगर भागातील महापालिकेचा जलकुंभ धो-धो भरून सुमारे अर्धा तास वाहत असल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली.

ठळक मुद्देएकीकडे पाणीकपातीची टांगती तलवार; दुसरीकडे अपव्यय सुरूच

सिडको : जिल्ह्यासह अवघे राज्य दुष्काळात होरपळून निघालेले असताना गंगापूर धरणाचा जलसाठाही २० टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना पालक सचिव सीताराम कुंटे यांनी आढावा बैठक घेत शहरात पाणीकपात करण्याचा सल्ला शुक्रवारी महापालिका, जिल्हा प्रशासनाला दिला; मात्र दुसºयाच दिवशी शनिवारी (दि.१८) सिडको परिसरातील खुटवडनगर भागातील महापालिकेचा जलकुंभ धो-धो भरून सुमारे अर्धा तास वाहत असल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. वाया गेलेल्या हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची जबाबदारी आता नेमकी कोणाची? महापालिका प्रशासन याबाबत कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.राज्यात दुष्काळाने हाहाकार माजविला असून नाशिक जिल्ह्यातील अनेक गावे पाण्यावाचून तहानली आहेत. अशा परिस्थितीत सरकारपुढेही दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नाशिक शहराची तहान भागविणाºया गंगापूर धरणाचा जलसाठाही वीस टक्क्यांवर आला आहे. गंगापूर धरण समूहाचा पाणीसाठाही कमालीचा घसरला आहे. यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. पालक सचिवांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत महापालिकेला पाणीकपात करण्याचा सल्ला दिला.दुसरीकडे महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार शनिवारी चव्हाट्यावर आला. खुटवडनगर परिसरात दैनंदिन पाण्याचा पुरवठा करणारे जलकुंभाचा भरणा केला जात होता. यावेळी संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे हा जलकुंभ संपूर्ण भरून धो-धो भरून वाहत होता. त्यामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी गटारीत वाहून गेले. महापालिकेच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, याच मनपाच्या गलथान व ढिसाळ नियोजनामुळे शनिवारी (दि.१८) दुपारी एक वाजेच्या सुमारास खुटवडनगर भागातील वृंदावननगर येथील मनपाच्या जलकुंभ भरून धो-धो वाहत होता. सुमारे अर्धातास वाहत असलेल्या जलकुंभातून हजारो लिटर पाणी वाया गेले.घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यातनाशिक शहरापासून जवळच असलेल्या ग्रामीण भागात टिपूसभर पाण्यासाठी नागरिकांना अक्षरश: दिवस-रात्र एक करावी लागत आहे. घोटभर पाण्यासाठी महिला व लहान बालके जीव धोक्यात घालत असल्याचे विदारक चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच पाण्याची होत असलेली नासाडी थांबविण्याची गरज आहे.परिसरातून ये-जा करण्याºया नागरिकांनीदेखील मनपाच्या ही गोष्ट निदर्शनात आणून दिली. जलकुंभ ओव्हरफ्लो झाल्यानंतर कामकाज करणाºया कर्मचाºयाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित कर्मचारी हा खुटवडनगर येथून अंबड गावातील पाण्याच्या जलकुंभाकडे जाऊन त्याने व्हॉल्व्ह बंद केले. यावेळात मात्र हजारो लिटर पाणी वाया गेल्याने याबाबत मनपाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी