शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

जलकुंभामधून वर्षाव; हजारो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:30 IST

जिल्ह्यासह अवघे राज्य दुष्काळात होरपळून निघालेले असताना गंगापूर धरणाचा जलसाठाही २० टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना पालक सचिव सीताराम कुंटे यांनी आढावा बैठक घेत शहरात पाणीकपात करण्याचा सल्ला शुक्रवारी महापालिका, जिल्हा प्रशासनाला दिला; मात्र दुसºयाच दिवशी शनिवारी (दि.१८) सिडको परिसरातील खुटवडनगर भागातील महापालिकेचा जलकुंभ धो-धो भरून सुमारे अर्धा तास वाहत असल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली.

ठळक मुद्देएकीकडे पाणीकपातीची टांगती तलवार; दुसरीकडे अपव्यय सुरूच

सिडको : जिल्ह्यासह अवघे राज्य दुष्काळात होरपळून निघालेले असताना गंगापूर धरणाचा जलसाठाही २० टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना पालक सचिव सीताराम कुंटे यांनी आढावा बैठक घेत शहरात पाणीकपात करण्याचा सल्ला शुक्रवारी महापालिका, जिल्हा प्रशासनाला दिला; मात्र दुसºयाच दिवशी शनिवारी (दि.१८) सिडको परिसरातील खुटवडनगर भागातील महापालिकेचा जलकुंभ धो-धो भरून सुमारे अर्धा तास वाहत असल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. वाया गेलेल्या हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची जबाबदारी आता नेमकी कोणाची? महापालिका प्रशासन याबाबत कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.राज्यात दुष्काळाने हाहाकार माजविला असून नाशिक जिल्ह्यातील अनेक गावे पाण्यावाचून तहानली आहेत. अशा परिस्थितीत सरकारपुढेही दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नाशिक शहराची तहान भागविणाºया गंगापूर धरणाचा जलसाठाही वीस टक्क्यांवर आला आहे. गंगापूर धरण समूहाचा पाणीसाठाही कमालीचा घसरला आहे. यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. पालक सचिवांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत महापालिकेला पाणीकपात करण्याचा सल्ला दिला.दुसरीकडे महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार शनिवारी चव्हाट्यावर आला. खुटवडनगर परिसरात दैनंदिन पाण्याचा पुरवठा करणारे जलकुंभाचा भरणा केला जात होता. यावेळी संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे हा जलकुंभ संपूर्ण भरून धो-धो भरून वाहत होता. त्यामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी गटारीत वाहून गेले. महापालिकेच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, याच मनपाच्या गलथान व ढिसाळ नियोजनामुळे शनिवारी (दि.१८) दुपारी एक वाजेच्या सुमारास खुटवडनगर भागातील वृंदावननगर येथील मनपाच्या जलकुंभ भरून धो-धो वाहत होता. सुमारे अर्धातास वाहत असलेल्या जलकुंभातून हजारो लिटर पाणी वाया गेले.घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यातनाशिक शहरापासून जवळच असलेल्या ग्रामीण भागात टिपूसभर पाण्यासाठी नागरिकांना अक्षरश: दिवस-रात्र एक करावी लागत आहे. घोटभर पाण्यासाठी महिला व लहान बालके जीव धोक्यात घालत असल्याचे विदारक चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच पाण्याची होत असलेली नासाडी थांबविण्याची गरज आहे.परिसरातून ये-जा करण्याºया नागरिकांनीदेखील मनपाच्या ही गोष्ट निदर्शनात आणून दिली. जलकुंभ ओव्हरफ्लो झाल्यानंतर कामकाज करणाºया कर्मचाºयाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित कर्मचारी हा खुटवडनगर येथून अंबड गावातील पाण्याच्या जलकुंभाकडे जाऊन त्याने व्हॉल्व्ह बंद केले. यावेळात मात्र हजारो लिटर पाणी वाया गेल्याने याबाबत मनपाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी