शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सरींचा वर्षाव अन‌् वातावरणात गारठा; आर्द्रतेचे प्रमाण थेट ९२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 19:09 IST

वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे वातावरणात ढगांची निर्मिती अधिक होत आहे. परिणामी मागील तीन दिवसांपासून नाशिककरांना दिनकराचे दर्शन होऊ शकलेले नाही.

ठळक मुद्देनाशिककरांना सूर्यदर्शन दुर्लभबळीराजावर दाटले चिंतेचे 'ढग'कमाल तापमानाचा पारा वेगाने घसरत आहे

नाशिक : लहरी निसर्गामुळे वातावरण बदलाचा कमालीचा अनुभव नाशिककरांना मागील चार दिवसांपासून येत आहे. शनिवारी संध्याकाळी रिमझिम सरींचा बेमोसमी वर्षाव झाला. रविवारी (दि. १३) पुन्हा सकाळ-संध्याकाळ मध्यम सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ हवामान कायम राहिल्याने नाशिककरांना रविवारीसुद्धा सूर्यदर्शन घडले नाही. या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानाचा पारा १७ अंशावर असला तरी कमाल तापमानाचा पारा वेगाने घसरत असून वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. आर्द्रतेचे प्रमाण रविवारी सकाळी ९२ टक्के इतके नोंदविले गेले.अरबी समुद्रात उठणाऱ्या लहान-मोठ्या वादळांमुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैऋत्य व वायव्य मोसमी वाऱ्यांची परस्परविरुद्ध बदललेली दिशा यामुळे चक्रवात क्षेत्राची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.दक्षिण पूर्व-अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या स्थितीमुळे उत्तर महाराष्ट्रातील वातावरण मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. मागील चार दिवसांपासून शहराच्या हवामानात मोठा बदल नाशिककरांना अनुभवायला येत अहे.

रविवारी पहाटेच्या सुमारास दृश्यमानतादेखील कमी झाली होती. मध्यम सरींचा रिमझिम वर्षाव, दाटलेले धुके आणि सुटलेला थंड वारा असे काहीसे वातावरण अनुभवायला आले. यामुळे रविवारची सुटी असूनही शहरामधील जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसून आली नाही. वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे वातावरणात ढगांची निर्मिती अधिक होत आहे. परिणामी मागील तीन दिवसांपासून नाशिककरांना दिनकराचे दर्शन होऊ शकलेले नाही.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमानRainपाऊस