पावसाने दडी मारली, पिके कोमेजू लागली

By Admin | Updated: September 5, 2016 00:46 IST2016-09-05T00:46:08+5:302016-09-05T00:46:48+5:30

पावसाने दडी मारली, पिके कोमेजू लागली

Rain rained, crops got sour | पावसाने दडी मारली, पिके कोमेजू लागली

पावसाने दडी मारली, पिके कोमेजू लागली

मेशी : मेशीसह परिसरात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके कोमेजू लागली आहेत. सलग पाच वर्षांपासून पावसाने वक्रदृष्टी दाखविली आहे. खरीप हंगामातील बाजरी, मका, मूग, भुईमूग, तूर आदि पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा कमालीचा संकटात सापडला आहे. गणपतीकाळात तरी पाणी पडेल या आशेने शेतकरी वाट पाहत आहेत. मोठ्या आशेने कर्ज घेऊन खरिपाची लागवड केली; मात्र अपेक्षाभंग झाला आहे. कांदा पिकास बाजारभाव नाही. खरीप आता नाहीसा होत आहे. बाजरी पिकास कणीस लागले आहेत. दाणे भरणा सुरू आहे, पाणी आवश्यक आहे.

Web Title: Rain rained, crops got sour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.