शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

जिल्ह्यात पाऊस; धरणसाठा अत्यल्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 18:09 IST

आतापर्यंत १६ टक्के पाऊस : बारा धरणांत अद्यापही शून्य टक्के पाणीसाठा 

ठळक मुद्देमहिनाभरातील पाणीसाठा पाहता धरणात अवघ्या एक टक्क्याने साठ्यात वाढ झालेली आहे.

नाशिक : जिल्ह्यात आर्द्रा नक्षत्राच्या अंतिम चरणात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आणि आतापर्यंत सरासरी १७० मि.मी. म्हणजे सुमारे १६ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी धरणांतील पाणीसाठ्यात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात अवघा एक टक्का वाढ झाली असून शनिवारी (दि.६) सुरू होणा-या पुनर्वसू नक्षत्राकडे आता बळीराजा मोठ्या आशेने बघत आहे.नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत १८८.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्याची टक्केवारी १२.६ टक्के आहे. आतापर्यंत महिनाभरात जिल्ह्यात सरासरी १७०.४७ मि.मी. पावसाची नोंद होऊन त्याची टक्केवारी १६.८२ टक्के इतकी राहिली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पावसाची टक्केवारी पाहता, नाशिक तालुक्यात ३६.२६ टक्के, इगतपुरी (१९.३०), दिंडोरी (१०.९२), पेठ (२४.६५), त्र्यंबकेश्वर (५.८३), मालेगाव (२६.०९), नांदगाव (१०.०६), चांदवड (६.५६), कळवण (२.२६), बागलाण (२२.१९), सुरगाणा (१५.४३), देवळा (५.३८), निफाड (१३.३१), सिन्नर (१६.८६) आणि येवला (४७.०६) याप्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, चांदवड, कळवण, देवळा, निफाड या तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापावेतो १६ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी धरणांतील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. महिनाभरातील पाणीसाठा पाहता धरणात अवघ्या एक टक्क्याने साठ्यात वाढ झालेली आहे. अद्यापही जिल्ह्यातील १२ धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कायम आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण