शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

जिल्ह्यात पाऊस; धरणसाठा अत्यल्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 18:09 IST

आतापर्यंत १६ टक्के पाऊस : बारा धरणांत अद्यापही शून्य टक्के पाणीसाठा 

ठळक मुद्देमहिनाभरातील पाणीसाठा पाहता धरणात अवघ्या एक टक्क्याने साठ्यात वाढ झालेली आहे.

नाशिक : जिल्ह्यात आर्द्रा नक्षत्राच्या अंतिम चरणात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आणि आतापर्यंत सरासरी १७० मि.मी. म्हणजे सुमारे १६ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी धरणांतील पाणीसाठ्यात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात अवघा एक टक्का वाढ झाली असून शनिवारी (दि.६) सुरू होणा-या पुनर्वसू नक्षत्राकडे आता बळीराजा मोठ्या आशेने बघत आहे.नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत १८८.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्याची टक्केवारी १२.६ टक्के आहे. आतापर्यंत महिनाभरात जिल्ह्यात सरासरी १७०.४७ मि.मी. पावसाची नोंद होऊन त्याची टक्केवारी १६.८२ टक्के इतकी राहिली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पावसाची टक्केवारी पाहता, नाशिक तालुक्यात ३६.२६ टक्के, इगतपुरी (१९.३०), दिंडोरी (१०.९२), पेठ (२४.६५), त्र्यंबकेश्वर (५.८३), मालेगाव (२६.०९), नांदगाव (१०.०६), चांदवड (६.५६), कळवण (२.२६), बागलाण (२२.१९), सुरगाणा (१५.४३), देवळा (५.३८), निफाड (१३.३१), सिन्नर (१६.८६) आणि येवला (४७.०६) याप्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, चांदवड, कळवण, देवळा, निफाड या तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापावेतो १६ टक्के पावसाची नोंद झाली असली तरी धरणांतील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. महिनाभरातील पाणीसाठा पाहता धरणात अवघ्या एक टक्क्याने साठ्यात वाढ झालेली आहे. अद्यापही जिल्ह्यातील १२ धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कायम आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण