शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आमदारांच्या पुढयात मागण्यांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 17:32 IST

विरगाव गट : दिलीप बोरसे यांना निवेदने सादर

ठळक मुद्देतरसाळी येथील एकलव्य आदिवासी मित्र मंडळाच्या वितने गावात मंगलकार्यालय उभारण्यात यावे., खावटी मिळावी याबाबतचे निवेदन देण्यात आले.

तरसाळी : बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी विविध गावांमधील समस्या जाणून घेण्यासाठी ‘आमदार आपल्या गावी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवारी (दि.१०) विरगांव गटातील तरसाळी, औंदाणे, वनोली या गावांना भेटी देण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांनी समस्या कथन करतानाच आमदारांच्या पुढयात मागण्यांचा पाऊस पाडला. दरम्यान, कुठल्याही लोकप्रतिनिधीने प्रतिनिधित्व करत असतांना मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता गावातील हेवेदावे गावातच ठेवुन सकारात्मक विचार सारणीने काम केल्यास लोककल्याणकारी योजना गावात योग्य प्रकारे राबवून गावाचा विकास उत्कृष्ट पद्धतीने करता येतो., असे प्रतिपादन दिलिप बोरसे यांनी तरसाळी येथे बोलताना केले.दिलीप बोरसे यांना तरसाळी येथील एकलव्य आदिवासी मित्र मंडळाच्या वितने गावात मंगलकार्यालय उभारण्यात यावे., खावटी मिळावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. तर सुधाकर पाटील यांनी केळझर चारी क्र मांक आठचे काम लवकर पूर्ण करून ते पाणी सुकडनाल्यात टाकण्यात यावे. हत्ती नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात यावा तसेच डांगसौंदाणे कडे जाण्यासाठीचा रस्ता तयार करण्यात यावा अशा मागण्या केल्या. बोरसे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात चालु असलेल्या सप्ताहस भेट दिली. आमदार बोरसे यांनी कुठल्याही गटातटाचे राजकारण न करता ग्रामस्थांंच्या मागणीनुसार सर्व विकासकामे पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.बोरसे यांचा सत्कार तरसाळीच्या सरपंच मिनाबाई पवार यांनी केला. यावेळी उपसरपंच सुमनबाई पवार, ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक गांंगुर्डे, वैशाली मोहन, कमल गांंगुर्डे, दिपक रौंंदळ, दला पिंंपळसे, ग्रामसेवक एन.एम.देवरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राकेश रौंंदळ, उपाध्यक्ष पुंंडलिक रौंंदळ, सुधाकर पाटील,प्रभाकर पवार, भिका रौंंदळ आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकMLAआमदार