शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

पाऊस बरसला, दुष्काळी मदतीची अद्यापही प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:00 IST

जिल्ह्णातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने जिल्ह्णातील १७ महसुली मंडळातील ३०८ गावांसाठी ७५ कोटींच्या निधीची घोषणा केली होती तशी तरतूदही मदत निधीमध्ये करण्यात आली होती; मात्र कठोर दुष्काळानंतर पावसाची सरी बरसल्या तरीही या गावांमध्ये दुष्काळी मदत पोहोचलीच नसल्याने शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, ७५ कोटींचा मदतनिधी मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव दिला असल्याचे समजते.

ठळक मुद्दे३०८ गावे वंचित : ७५ कोटींची मदत पोहोचेना; प्रशासनाकडून प्रस्ताव

नाशिक : जिल्ह्णातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने जिल्ह्णातील १७ महसुली मंडळातील ३०८ गावांसाठी ७५ कोटींच्या निधीची घोषणा केली होती तशी तरतूदही मदत निधीमध्ये करण्यात आली होती; मात्र कठोर दुष्काळानंतर पावसाची सरी बरसल्या तरीही या गावांमध्ये दुष्काळी मदत पोहोचलीच नसल्याने शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, ७५ कोटींचा मदतनिधी मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव दिला असल्याचे समजते.राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून त्यासाठी मदतीची घोषणा केली होती. या दुष्काळी तालुक्यांमध्ये नाशिकच्या काही तालुक्यांचादेखील समावेश होता. जिल्हयातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केल्यानंतर या तालुक्यांना मदत निधी म्हणून शासनाने २८७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. या मदतीनंतर जिल्ह्णातील अनेक तालुक्यांमधील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहून या तालुक्यांमध्येदेखील दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढली होती. याबाबत अनेकांनी शासनाच्या निदर्शनास दुष्काळाची भीषणता मांडली होती. या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादरही करण्यात आले होते.या मागणीची दखल घेत शासनाने कळवण, दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यांतील १७ महसुली मंडळात दुष्काळ जाहीर केला. त्यामध्ये कळवण तालुक्यातील कळवण, नवीबेज, मोकभांगी या गावांचा समावेश होता, तर दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी, मोहाडी, वरखेडा या मंडळांमध्ये दुष्काळ होता. निफाड तालुक्यातील निफाड, रानवड, चांदोरी, देवगाव, सायखेडा, नांदूरमधमेश्वर या सहा मंडळांत दुष्काळ जाहीर केला होता. तर येवला तालुक्यातील नगरसूल, अंदरसूल, पाटोदा, सावरगाव, जळगाव नेऊर या मंडळाचा समावेश होता. या १७ महसुली मंडळांमध्ये दुष्काळाने पीडित ३०८ गावांचा समावेश आहे.पूर्वीच्या गावांना मिळालेली मदत आपल्यापर्यंतही पोहोचेल या आशेने संपूर्ण दुष्काळाचा काळ शेतकºयांनी प्रतीक्षेवर काढला. शेतकºयांना मदत म्हणून शासनाकडून ७५ कोटींचा निधी दिला जाणार होता. त्यामुळे दुष्काळग्रस्तांचे या मदतीकडे लक्ष लागून होते.मात्र, आता पावसाळा उजांडला तरी ही मदत शासनाकडून अद्यापही प्राप्त झालेली नाही. दुष्काळग्रस्तांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनदेखील प्रयत्न केले जात असून, तसा प्रस्ताव त्यांनी शासनदरबारी धाडला आहे. आता प्रत्यक्षात मदत शेतकºयांना मिळण्याची प्रतीक्षा आहे.—इन्फो—-दफ्तर दिरंगाईचा फटकादुष्काळ निवारणासाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या उर्वरित निधीची प्रतीक्षा गेल्या चार महिन्यांपासून आहे. शासनाने निधीची तरतूद केली असली तरी दुसºया टप्प्यातील निधी वितरणास दप्तर दिरंगाई कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या दिरंगाईमुळे राज्यातील अनेक शेतकरी अजूनही दुष्काळी मदतीपासून वंचित आहेत. जिल्हा प्रशासनाने मागणी नोंदविली असली तरी प्रत्यक्षात निधी हातात कधी पडतो आणि वितरण कधी होते याची प्रतीक्षा असणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकारMONEYपैसा