शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

मालवाहतुकीत रेल्वेचा विक्रम; चार कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST

नाशिक रोड : येथील रेल्वे मालधक्क्यावरून जुलैच्या एका महिन्यात देशातील विविध राज्यांत रेल्वेच्या २९ एनएमजी रेकद्वारे तब्बल २९०० चारचाकी ...

नाशिक रोड : येथील रेल्वे मालधक्क्यावरून जुलैच्या एका महिन्यात देशातील विविध राज्यांत रेल्वेच्या २९ एनएमजी रेकद्वारे तब्बल २९०० चारचाकी गाड्या पाठवून देशात नाशिक रोड रेल्वे मालधक्क्याने विक्रम प्रस्थापित केला आहे. या वाहतुकीतून रेल्वेला तब्बल सव्वाचार कोटी रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे.

भारतीय रेल्वेमध्ये अंदाजे चार ते पाच वर्षांपूर्वी कार, ट्रॅक्टर, जीप अशी छोटी चार चाकी वाहने वाहतुकीसाठी अवघे एलएचबीचे सहा रेक होते. चार ते पाच वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने याकडे व्यावसायिकदृष्ट्या लक्ष देऊन जुने प्रवासी वाहतूक करणारे रेल्वे डब्यांमधील आसन व शौचालय काढून पोकळ रेल्वे डबा बनविला. एनएमजी म्हणजे न्यू मॉडिफाइड गुड्स रेक असून रेल्वेचे जे जुने झालेले डबे भंगारामध्ये देण्याच्या परिस्थितीचे झाले होते. त्यांना रेल्वे प्रशासनाने ॲल्युमिनियम कोचसारखे बनवून छोट्या कार वाहतुकीसाठी त्यांचा वापर केला जात आहे.

चौकट===

रेल्वे मालधक्क्याचा विक्रम

गेल्या तीन वर्षांपासून एनएमजीचे न्यू मॉडिफाइड रेक रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बनविल्याने चारचाकी गाडी बनविणाऱ्या कंपनीने रेल्वेकडे रेकची मागणी केली तर एक-दोन दिवसांत रेक उपलब्ध होऊन जातो. त्यामुळे कार बनविणाऱ्या कंपन्यांनी रेल्वेद्वारे नवीन कार विविध पाठविण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात नाशिक रोड रेल्वे मालधक्क्यावरून दर महिन्याला एनएमजीचे २१ रेक पाठविण्यात आले होते. रेल्वेच्या एका रेकला पंचवीस डबे असून प्रत्येक डब्यात चार कार बसतात. महिंद्रा कंपनीचा हरिद्वार येथे प्लांट असून हरिद्वार रेल्वे मालधक्क्यावरून एनएमजीचे एका महिन्यात देशात सर्वाधिक २३ रेक पाठविण्याचा विक्रम होता. तो जुलै महिन्यात मोडीत निघाला. तब्बल २९ रेक राजस्थान, दिल्ली, आसाम, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, उत्तरप्रदेश तसेच बिहारपर्यंत गेलेले रेल्वेचे रेकमधील काही गाड्या नेपाळ, बांगलादेशला देखील गेल्या. या रेकमधून २९०० गाड्या पाठविण्याचा विक्रम संपूर्ण देशात नाशिक रोड रेल्वे मालधक्क्याने केला आहे. यामधून रेल्वे प्रशासनाला ४ कोटी २५ लाख ४४ हजार ४१२ रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे.

चौकट===

रेल्वे एनएमजीच्या रेकच्या डब्यामध्ये कार ठेवताना त्यांच्या चाकातील थोडी हवा कमी केल्याने नवीन गाडी रेल्वेच्या डब्यात कुठल्याही बाजूला टच होत नाही. तसेच चारही चाकांना पुढून व मागून लाकडाची उटी लावून तसेच गाडी गेअरमध्ये ठेवली जाते. यामुळे नवीन कार सहीसलामत कमी वेळेत व कमी खर्चात पाहिजे त्या ठिकाणी पोहोचत आहे.

प्रतिक्रिया==

रेल्वेने कार वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात नवीन एनएमजी रेक बनविल्याने संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून योग्य समन्वय साधल्याने रेल्वे प्रशासनाला त्यामधून चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न रेल्वेला मिळविता आले. तसेच संबंधित कंपन्यांना देखील कमी खर्चात व कमी वेळेत सुरक्षितरीत्या नवीन गाड्या पाठवणे सहजरीत्या शक्य झाले.

-कुंदन महापात्रा, मुख्य माल पर्यवेक्षक, नाशिक रोड

(फोटो ३१ रेल्वे, महापात्रा)