शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

राहुलनगर बुडाले शोकसागरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:30 IST

जावळाच्या कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील केदराई येथे जाण्यासाठी निघालेल्या टाकळीतील कुटुंबीयावर काळाने झडप घातली आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राहुलनगर परिसर शोकसागरात बुडाला.

नाशिक : जावळाच्या कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील केदराई येथे जाण्यासाठी निघालेल्या टाकळीतील कुटुंबीयावर काळाने झडप घातली आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राहुलनगर परिसर शोकसागरात बुडाला. अगदी घराला घरे लागून असलेल्या चार घरांमधील कुणा ना कुणी अपघातात मरण पावल्याने येथील प्रत्येकाचा शोक अनावर झाला होता. अवघ्या सहा महिन्यांचे बाळही या अपघात दगावल्याने बाळाच्या वडिलांच्या आक्रोशाने साऱ्यांचेच हृदय हेलावले. मन सुन्न करणाºया या घटनेमुळे संपूर्ण नाशिकरोड परिसरात शोककळा पसरली आहे.टाकळीतील राहुलनगर परिसरातील स्वप्नील कांडेकर यांच्या घरी त्यांचा मुलगा त्रिशाल याच्या जावळ काढण्याचा कार्यक्रम होता. राहुलनगर परिसरात कांडेकर, डांगे, लोंढे आणि गवळी, कुटुंबीय अगदी जवळच राहतात. कोणत्याही कार्यक्रमासाठी हे कुटुंबीय एकत्र येतात. जावळाच्या कार्यक्रमासाठीदेखील सर्वच आयशर टेम्पोने केदराईदेवस्थानकडे निघाले होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत शिवारात दोन आयशर गाड्यांमध्ये समोरासमोर अपघात झाल्याने या कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये सुशीला सुरेश गवळी (६६), निवृत्ती रामभाऊ लोंढ (५०), शोभाबाई सूर्यवंशी (६०), सुदाम पाटणकर (६६), सुंदराबाई आनंदा कांडेकर (८०) आशा दत्तात्रय कांडेकर (४७) समृद्धी मनीष डांगे (सहा महिने) यांना काळाने हिरावून घेतले. यातील बहुतांश कुटुंबीय हे राहुलनगर परिसरातच वास्तव्यास आहेत. या अपघातात एकाच कुटुंबातील सासू-सुनेचा मृत्यू झाला. तर अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीलाही काळाने हिरावून नेल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.सातत्याने वर्दळ आणि गजबजलेल्या टाकळी परिसरात रविवार सकाळपासून स्मशानशांतता पसरली होती. संपूर्ण राहुलनगर परिसरात काळाची गडद छाया पसरली होती.घटनेचे वृत्त कळताच राहुल दिवे, प्रशांत दिवे, रवी पगारे, सचिन साळवे, नगरसेवक अनिल ताजनपुरे, आशा तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. राहुलनरमध्ये जाऊन त्यांनी उर्वरित कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यूअपघातात आशा दत्तात्रय कांडेकर यांच्यासह त्यांच्या सासू सुंदराबाई कांडेकर व आई सुशीला सुरेश गवळी यांचा मृत्यू झाला.पत्नीची साथ सुटलीसूर्यवंशी दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने ते राहुलनगरमध्येच आपल्या भाच्याच्या आश्रयाने राहत होते. अपघातात शोभा सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने एकाकी पडलेल्या सूर्यवंशी यांना धक्का बसला आहे.सर्वांचाच प्रवासठरला अखेरचाघरातील कोणत्याही कार्यासाठी एकत्र जाणाºया कुटुंबीयांचा रविवारचा प्रवास अखेरचा ठरला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू