शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

राहुलनगर बुडाले शोकसागरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:30 IST

जावळाच्या कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील केदराई येथे जाण्यासाठी निघालेल्या टाकळीतील कुटुंबीयावर काळाने झडप घातली आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राहुलनगर परिसर शोकसागरात बुडाला.

नाशिक : जावळाच्या कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील केदराई येथे जाण्यासाठी निघालेल्या टाकळीतील कुटुंबीयावर काळाने झडप घातली आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राहुलनगर परिसर शोकसागरात बुडाला. अगदी घराला घरे लागून असलेल्या चार घरांमधील कुणा ना कुणी अपघातात मरण पावल्याने येथील प्रत्येकाचा शोक अनावर झाला होता. अवघ्या सहा महिन्यांचे बाळही या अपघात दगावल्याने बाळाच्या वडिलांच्या आक्रोशाने साऱ्यांचेच हृदय हेलावले. मन सुन्न करणाºया या घटनेमुळे संपूर्ण नाशिकरोड परिसरात शोककळा पसरली आहे.टाकळीतील राहुलनगर परिसरातील स्वप्नील कांडेकर यांच्या घरी त्यांचा मुलगा त्रिशाल याच्या जावळ काढण्याचा कार्यक्रम होता. राहुलनगर परिसरात कांडेकर, डांगे, लोंढे आणि गवळी, कुटुंबीय अगदी जवळच राहतात. कोणत्याही कार्यक्रमासाठी हे कुटुंबीय एकत्र येतात. जावळाच्या कार्यक्रमासाठीदेखील सर्वच आयशर टेम्पोने केदराईदेवस्थानकडे निघाले होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत शिवारात दोन आयशर गाड्यांमध्ये समोरासमोर अपघात झाल्याने या कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये सुशीला सुरेश गवळी (६६), निवृत्ती रामभाऊ लोंढ (५०), शोभाबाई सूर्यवंशी (६०), सुदाम पाटणकर (६६), सुंदराबाई आनंदा कांडेकर (८०) आशा दत्तात्रय कांडेकर (४७) समृद्धी मनीष डांगे (सहा महिने) यांना काळाने हिरावून घेतले. यातील बहुतांश कुटुंबीय हे राहुलनगर परिसरातच वास्तव्यास आहेत. या अपघातात एकाच कुटुंबातील सासू-सुनेचा मृत्यू झाला. तर अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीलाही काळाने हिरावून नेल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.सातत्याने वर्दळ आणि गजबजलेल्या टाकळी परिसरात रविवार सकाळपासून स्मशानशांतता पसरली होती. संपूर्ण राहुलनगर परिसरात काळाची गडद छाया पसरली होती.घटनेचे वृत्त कळताच राहुल दिवे, प्रशांत दिवे, रवी पगारे, सचिन साळवे, नगरसेवक अनिल ताजनपुरे, आशा तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. राहुलनरमध्ये जाऊन त्यांनी उर्वरित कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यूअपघातात आशा दत्तात्रय कांडेकर यांच्यासह त्यांच्या सासू सुंदराबाई कांडेकर व आई सुशीला सुरेश गवळी यांचा मृत्यू झाला.पत्नीची साथ सुटलीसूर्यवंशी दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने ते राहुलनगरमध्येच आपल्या भाच्याच्या आश्रयाने राहत होते. अपघातात शोभा सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने एकाकी पडलेल्या सूर्यवंशी यांना धक्का बसला आहे.सर्वांचाच प्रवासठरला अखेरचाघरातील कोणत्याही कार्यासाठी एकत्र जाणाºया कुटुंबीयांचा रविवारचा प्रवास अखेरचा ठरला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू