शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

१८ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:10 IST

सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त जास्त पाऊस झाल्याने जलसाठे भरले आहेत. रब्बीखालील क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली असून, कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला असल्याची माहिती असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

ठळक मुद्देसिन्नर : सहा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात गव्हाची पेरणी

यंदा ८०३ मिमी इतका पाऊस झाल्याने जलपातळीही झपाट्याने सुधारण्यास मदत झाली. रब्बीच्या अखेरपर्यंत विहिरींची जलपातळी टिकून राहण्याची शक्यता आहे. भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला आहे. ठाणगाव, चास, नळवाडी, कोनांबे, पांढुर्ली, नांदूरशिंगोटे या परिसरात भूजल पातळी टिकून आहे. वावी, पंचाळे, शहा टंचाईग्रस्त मानल्या जाणाऱ्या या परिसरातही भूजल पातळी समाधानकारक असल्याने रब्बीखालील क्षेत्र वाढले आहे. रब्बी पिकांची एकूण चौदा हजार ६६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीची १,५६८, मका १,७६८ तर हरभऱ्याची तीन हजार ९९४ हेक्टरवर पेरणी झाली. गव्हाच्या क्षेत्रात यंदा ५०० हेक्टरने वाढ झाली आहे. ज्वारीचेही क्षेत्र दीडशे हेक्टरने वाढले आहे.तालुक्यात गहू, हरभरा, मका या रब्बी पिकांसाठी स्पर्धा होत आहे. शेतकऱ्यास यात सहभागी होता येईल. रब्बीतील पीक कापणी प्रयोगासाठी गावनिहाय समितीही गठीत करण्यात आली आहे. तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्यास पाच हजार, द्वितीय क्रमांकास तीन तर तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे बक्षीस सरकारतर्फे देण्यात येणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.३,२५२ हेक्टरवर कांदा लागवडरब्बी कांदा लागवड यंदा ३,२५२ हेक्टरवर करण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे परिसरात १,२२१ हेक्टरवर, तर वावी परिसरात १,०५२ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. नायगाव, ब्राह्मणवाडे, गुळवंच, नांदूरशिंगोटे, डुबेरे, सोनांबे परिसरात कांद्याची लागवड झाली आहे.पिकांवर दुष्परिणामरब्बी पिकांवर बदलत्या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येत आहे. ढगाळ हवामानामुळे माव्याचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वाढला आहे. धुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम झाला आहे. त्यातच कमी दाबाने व खंडित वीजपुरवठा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती