शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पावसाअभावी रब्बी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 16:01 IST

निफाड : करपलेल्या पिकांची तहसीलदारांकडून पाहणी

ठळक मुद्देकाही शेतक-यांनी उभ्या सोयाबिन पिकामध्ये जनावरे सोडुन दिली आहेत

रामनगर : निफाड तालुक्याच्या दक्षिण सीमेवर असलेल्या तळवाडे ,महाजनपुर,रामनगर, पिंपळगाव निपानी ,भेंडाळी,औरंगपूर,बागलवाडी या परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीपाची पिके करपून गेली आहेत.  शेतकऱ्यांनी शेतजमिनीत गुंतवलेले भांडवल सुध्दा मिळणे कठीण झाले आहे. परिसरातील दुष्काळी सदृश परिस्थितीची निफाडचे तहसिलदार दिपक पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, कृषि अधिकारी पाटील यांच्यासह महसूल अधिका-यांनी पाहणी करुन पीकस्थितीचा आढावा घेतला.तळवाडे व परिसरातील गावात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतक-यांनी पेरलेली सोयाबीन,मका,भुईमुग ,बाजरी व इतर खरीपाची पिके पावसाअभावी पुर्णपणे करपून गेली आहेत. सोयाबिन पिक कापणी करून मळणी करणे सुध्दा परवडणारे नसल्याने काही शेतक-यांनी उभ्या सोयाबिन पिकामध्ये जनावरे सोडुन दिली आहेत. परतीच्या पावसानेही यंदा हजेरी लावली नाही. त्यामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. यावेळी ग्रामस्थांनी व लोकप्रतिनीधीनी तहसिलदार दिपक पाटील यांच्याकडे दुष्काळ जाहिर करावा व शेतक-यांना मदत द्यावी तसेच गावाला पिण्यासाठी टँकर सुरू करावा अशा मागण्या केल्या. त्यानुसार, तहसिलदार पाटील यांचेसह जि.प. सदस्य सुरेश कमानकर यांनी पीकस्थितीची पाहणी केली. यावेळी तळवाडेचे सरपंच लता सांगळे, राजेंद्र सांगळे महाजनपुरचे बंचवत फड , औरंगपुरचे सोपान खालकर, भेंडाळीच्या संरपच शोभा कमानकर , दिपक कमानकर ,मंडल अधिकारी केदार, कृषी अधिकारी पाटील, कृषी सहाय्यक शेजवळ, यांचेसह तलाठी, ग्रामसेवक आदिसह ग्रामस्त उपस्थित होते.तीव्र पाणी टंचाईतळवाडे परिसरात पाऊस अतिशय कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे परिसरांत तीव्र पाणी टंचाई आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.शासनाने तात्काळ दुष्काळ जाहिर करून शेतक-यांना मदत करावी.- लता राजेंद्र सांगळे, सरपंच, तळवाडे

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ