शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

गारव्यामुळे रब्बीची पिके तरारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:25 IST

गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे रब्बीची सर्वच पिके तरारली आहेत. वाढलेल्या थंडीमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

नायगाव : गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे रब्बीची सर्वच पिके तरारली आहेत. वाढलेल्या थंडीमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करतआहेत.  गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. त्यामुळे परिसरातील वातावरणात सध्या चांगल्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने पुन्हा शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र नजरेस पडत आहे. आठवड्यापासून निर्माण झालेल्या गारव्यामुळे शेतातील रब्बीच्या सर्वच पिकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली आहे.  डिसेंबर महिन्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे गहू, कांदा, टमाटे, ज्वारी आदींसह विविध पिकांवर अनेक रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे पिकांना रोगांपासून वाचवण्यासाठी शेतकºयांवर महागडी किटकनाशके फवारण्याची वेळ आली होती.  सततच्या ढगाळ हवामानात अनेकदा फवारणी करूनही रब्बीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी बोलत आहेत. उत्पादन वाढीस मदत गेल्या सहा-सात दिवसांपासून थंडीची चाहूल लागल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. थंडीचे आगमन होताच शेतातील सर्वच पिके तरारू लागली आहेत. या वाढत्या थंडीमुळे पिकांवरील मावा, तुडतुडे, चिकटा बिना फवारणीचा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. वाढलेली थंडी आणखी काही दिवस अशीच राहून वातावरणातील गारवा असाच टिकून राहिल्यास उत्पादन वाढीसही मदत होईल, असेही शेतकरी सांगत आहेत.

 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी