शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

हवामान बदलाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 14:53 IST

पाटोदा :येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात वारंवार बदल होत असल्याने या हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याने धोक्यात आली आहे.

पाटोदा :येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात वारंवार बदल होत असल्याने या हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याने धोक्यात आली आहे. शेतकर्यांना पिकांवर दिवसाआड औषध फवारणी करावी लागत असल्याने खर्चात वाढ झाली असल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे.असून तो दुहेरी संकटात सापडला आहे.तब्बल मिहनाभर चाललेल्या अवकाळी पावसाने येवला तालुक्यातील खरीपाची संपूर्ण वाताहत झाली तर द्राक्ष व डाळिंब बागाही गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले . असे असतानाही शेतकरी वर्गाने रब्बीसाठी पाणी उपलब्ध असल्याने .कांदा ,गहू, हरभरा,आदि पिकांची लागवड केली. खरीप नाही तर आता रब्बी पिकात उणीव भरून काढूया या आशेवर असणार्या शेतकर्यांची निसर्गाच्या लहरीपणा घोर निराशा केली.परिसरात तब्बल दोन अडीच मिहने ढगाळ वातावरण असून जोडीला दाट धुके, व दव आहेच त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य किडी व रोगांचा फैलाव मोठया प्रमाणात होत असून पिकांच्या कोवळ्या भागास इजा पोहचत असल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे रब्बीची पिके वाचिवण्यासाठी शेतकर्यांना पिकांवर दिवसाआड औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे..................................यंदा विहिरी कुपनलिका व बोअरवेल्सला मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी वर्गाने मोठया प्रमाणात रांगडा कांदा,उन्हाळ कांदा,गहू,हरभरा ,ज्वारी, या रब्बी पिकांची शेतात लागवड केली आहे.मात्र वातावरणातील या बदलामुळे गहू व कांदा पिकावर मावा तसेच अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा तालुक्यात कांदा लागवड क्षेत्रात तिप्पट वाढ झाली असून अजूनही लागवड सुरूच असल्याने क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.तसेच गव्हाची सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.तसेच हरभरा पिकावर घाट अळीच्या प्रादुर्भावामुळे हि पिके धोक्यात आली असल्याने पिके वाया जातात कि आशी धास्ती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.........................................खरीप हंगामात शेतकरी वर्ग पूर्णपणे कर्ज बाजरी झालेला असून रब्बी हंगामही या निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतो कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक