शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

हवामान बदलाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 14:53 IST

पाटोदा :येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात वारंवार बदल होत असल्याने या हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याने धोक्यात आली आहे.

पाटोदा :येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात वारंवार बदल होत असल्याने या हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याने धोक्यात आली आहे. शेतकर्यांना पिकांवर दिवसाआड औषध फवारणी करावी लागत असल्याने खर्चात वाढ झाली असल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे.असून तो दुहेरी संकटात सापडला आहे.तब्बल मिहनाभर चाललेल्या अवकाळी पावसाने येवला तालुक्यातील खरीपाची संपूर्ण वाताहत झाली तर द्राक्ष व डाळिंब बागाही गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले . असे असतानाही शेतकरी वर्गाने रब्बीसाठी पाणी उपलब्ध असल्याने .कांदा ,गहू, हरभरा,आदि पिकांची लागवड केली. खरीप नाही तर आता रब्बी पिकात उणीव भरून काढूया या आशेवर असणार्या शेतकर्यांची निसर्गाच्या लहरीपणा घोर निराशा केली.परिसरात तब्बल दोन अडीच मिहने ढगाळ वातावरण असून जोडीला दाट धुके, व दव आहेच त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य किडी व रोगांचा फैलाव मोठया प्रमाणात होत असून पिकांच्या कोवळ्या भागास इजा पोहचत असल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे रब्बीची पिके वाचिवण्यासाठी शेतकर्यांना पिकांवर दिवसाआड औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे..................................यंदा विहिरी कुपनलिका व बोअरवेल्सला मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी वर्गाने मोठया प्रमाणात रांगडा कांदा,उन्हाळ कांदा,गहू,हरभरा ,ज्वारी, या रब्बी पिकांची शेतात लागवड केली आहे.मात्र वातावरणातील या बदलामुळे गहू व कांदा पिकावर मावा तसेच अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा तालुक्यात कांदा लागवड क्षेत्रात तिप्पट वाढ झाली असून अजूनही लागवड सुरूच असल्याने क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.तसेच गव्हाची सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.तसेच हरभरा पिकावर घाट अळीच्या प्रादुर्भावामुळे हि पिके धोक्यात आली असल्याने पिके वाया जातात कि आशी धास्ती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.........................................खरीप हंगामात शेतकरी वर्ग पूर्णपणे कर्ज बाजरी झालेला असून रब्बी हंगामही या निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतो कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक