शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

रक्तपेढ्यांतील पारंपरिक एलायझा चाचणीच्या वापरावरच प्रश्नचिन्ह निर्माण

By admin | Updated: February 2, 2015 01:26 IST

रक्तपेढ्यांतील पारंपरिक एलायझा चाचणीच्या वापरावरच प्रश्नचिन्ह निर्माण

नाशिक : गेल्या पाच वर्षांत दूषित रक्तामुळे राज्यातील सुमारे एक हजार रुग्णांना एचआयव्हीची लागण झाल्याचे धक्कादायक वास्तव राष्ट्रीय एड््स नियंत्रण संघटनेने उघड केल्यानंतर रक्तपेढ्यांतील पारंपरिक एलायझा चाचणीच्या वापरावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अद्ययावत तंत्राचा अवलंब करत नॅट टेस्टेड सुरक्षित रक्ताचा आग्रह आता रुग्णालयांकडूनच होऊ लागला आहे. दरम्यान, नाशिकमधील आयएमए-अर्पण थॅलेसेमिया केअर सेंटरमध्ये थॅलेसेमिया पीडित रुग्णांना गेल्या तीन वर्षांपासून नॅट टेस्टेड रक्ताचा मोफत पुरवठा केला जात असून, अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने केलेल्या चाचण्यांमुळे एकाही रुग्णाला एचआयव्ही अथवा काविळीची बाधा पोहोचली नसल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्जाला उत्तर देताना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने गेल्या पाच वर्षांची आकडेवारी समोर ठेवत भीषण वास्तव मांडले होते. दूषित रक्तातून एचआयव्हीची बाधा झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या गुजरात आणि उत्तर प्रदेशात असून, त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. या दूषित रक्तपुरवठ्याबाबत रक्तपेढ्यांतील अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव ही रक्त देण्याघेण्याच्या प्रक्रियेतील प्रमुख अडचण असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले असून, पारंपरिक एलायझा चाचणीतून होणाऱ्या निदानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये आजही एलायझा चाचणीद्वारेच एचआयव्ही / काविळीचे निदान करत रक्तपुरवठा केला जातो, परंतु या चाचणीतही आता धोके दिसू लागल्याने अद्ययावत तंत्राचा अवलंब करत नॅट टेस्टेड रक्ताचा पुरवठा करण्यावर रक्तपेढ्याही भर देऊ लागल्या असून, त्यासंबंधी रुग्णांसह डॉक्टरांनाही सजग करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नाशकात अर्पण रक्तपेढी, जनकल्याण यांच्यामार्फत नॅट टेस्टेड रक्तपुरवठ्याची सुविधा आहे. त्यातही अर्पण रक्तपेढीने स्वत:ची अद्ययावत लॅबच नाशकात उभारलेली आहे. अर्पण रक्तपेढीत आतापर्यंत २२३१८ रक्तपिशव्यांवर नॅट टेस्ट करण्यात आली आहे. त्यात ४५ रक्तघटक हे एचआयव्ही, कावीळ बी आणि सी बाधित आढळल्याचे आणि विशेष म्हणजे हेच रक्तघटक एलायझा चाचणीत निगेटिव्ह आढळून आले आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार, एलायझा चाचणीत विषाणूंमधील प्रथिन घटक सापडतात, तर नॅट टेस्ंिटगमध्ये विषाणूंमधील डीएनए / आरएनए सापडतात. याशिवाय एलायझा चाचणीत विषाणूबाधित रक्तदाता हा २२ दिवस ते २ महिन्यांच्या कालावधीत बाधित झाल्याचे आढळून येते, तर नॅट टेस्टिंगमध्ये हीच प्रक्रिया केवळ २ ते ५ दिवसांत होते. एलायझा चाचणीद्वारे मिळणारी रक्तपिशवी कमी खर्चात उपलब्ध होत असली तरी त्यात धोके जाणवू लागल्याने रक्तपेढ्यांनाही आता ही चाचणी करणे जबाबदारीचे बनले असून, अद्ययावत तंत्राचा अवलंब करत नॅट टेस्टेड रक्ताचा पुरवठा करण्याबाबत रुग्णालयेही आग्रह धरू लागली आहेत. नाशिकमधील अनेक नामवंत रुग्णालयांसह काही खासगी डॉक्टरांकडून नॅट टेस्टेड रक्ताचाच आग्रह धरला जात असल्याचे रक्तपेढ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)