शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 19:32 IST

नांदूरवैद्य : आयुष्यभराच्या जगण्याच्या संघर्षानंतर मरणाचे सोपस्कार तरी सुस्थितीत पार पडावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य गावात मरणानंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत. येथे स्वातंत्र्योत्तर काळा अगोदरपासून स्मशानभूमी नसल्याने गावाच्या बाजूला असलेल्या मिलिटरी विभागाच्या हद्दीत उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : उघड्यावरच करावे लागतात अंत्यसंस्कार

नांदूरवैद्य : आयुष्यभराच्या जगण्याच्या संघर्षानंतर मरणाचे सोपस्कार तरी सुस्थितीत पार पडावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य गावात मरणानंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत. येथे स्वातंत्र्योत्तर काळा अगोदरपासून स्मशानभूमी नसल्याने गावाच्या बाजूला असलेल्या मिलिटरी विभागाच्या हद्दीत उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या अन्य गावांत स्मशानभूमी, आधुनिक सुविधा असतांना आमच्या गावाला स्मशानभूमीपासून वंचित का राहावे लागत आहे असा उव्दिग्न सवाल येथील नागरिक प्रशासनाला करीत आहेत.नांदूरवैद्य येथे नागरिकांचे हेवेदावे, प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा जागेला विरोध, यामुळे जागेअभावी येथील स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून लांबणीवर पडला आहे. स्मशानभूमीसाठी जागा देण्यासाठी कोणीही तयार होत नाही. शासनाची गावठाण जागा जरी असली तरी त्याच्या शेजारी असलेल्या खासगी जागामालक त्यास विरोध करत असल्याचे सरपंच उषा रोकडे यांनी माहिती देतांना सांगितले.नांदूरवैद्य येथे अनेक ग्रामसभांमध्ये स्मशानभूमीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली असून गावाच्या चारही बाजूला शासनाची गावठाण जागा असून आत्तापर्यंत या गावाला अनेक राजकीय पुढारी लाभले असून परंतु एकाही पुढाऱ्याने स्मशानभूमीबाबत तोडगा काढलेला नाही.यापेक्षा पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होत असून अनेकदा पावसातच अंत्यविधी करावे लागतात. त्यावेळी अनेक अडचणी येतात. प्रशासनाने येथील स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देवून जागा निश्चित करावी व त्या ठिकाणी सुसज्ज स्मशानभूमीच्या शेडची पाण्याच्या सुविधेसह लवकर व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नांदूरवैद्य ग्रामस्थांनी केली आहे.स्मशानभूमी हा गावाचा मुख्य प्रश्न असून यासाठी गावातील ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतरही जागा उपलब्ध होत नसल्याने जागेअभावी निधी परत गेले असून जागेबद्दल ग्रामस्थांचा विरोध असून आता नव्याने गावठाण हद्दीतील जागा निश्चित करून त्या ठिकाणी पाण्यासह स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावणार आहे.- उषा रोकडे. सरपंच, नांदूरवैद्य.गावातील व्यक्ती मरण पावली तर त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही स्मशानभूमी अत्यंत खेदाची बाब आहे, माञ प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. त्यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे.आतातरी प्रशासनाने लक्ष घालून स्मशानभूमीसाठी शासनाच्या गावठाण हद्दीतील जागा उपलब्ध करून स्मशानभूमी उभारण्यासाठी कष्ट घ्यावे.- गणेश मुसळे. ग्रामस्थ 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू