शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 19:32 IST

नांदूरवैद्य : आयुष्यभराच्या जगण्याच्या संघर्षानंतर मरणाचे सोपस्कार तरी सुस्थितीत पार पडावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य गावात मरणानंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत. येथे स्वातंत्र्योत्तर काळा अगोदरपासून स्मशानभूमी नसल्याने गावाच्या बाजूला असलेल्या मिलिटरी विभागाच्या हद्दीत उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : उघड्यावरच करावे लागतात अंत्यसंस्कार

नांदूरवैद्य : आयुष्यभराच्या जगण्याच्या संघर्षानंतर मरणाचे सोपस्कार तरी सुस्थितीत पार पडावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य गावात मरणानंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत. येथे स्वातंत्र्योत्तर काळा अगोदरपासून स्मशानभूमी नसल्याने गावाच्या बाजूला असलेल्या मिलिटरी विभागाच्या हद्दीत उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या अन्य गावांत स्मशानभूमी, आधुनिक सुविधा असतांना आमच्या गावाला स्मशानभूमीपासून वंचित का राहावे लागत आहे असा उव्दिग्न सवाल येथील नागरिक प्रशासनाला करीत आहेत.नांदूरवैद्य येथे नागरिकांचे हेवेदावे, प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा जागेला विरोध, यामुळे जागेअभावी येथील स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून लांबणीवर पडला आहे. स्मशानभूमीसाठी जागा देण्यासाठी कोणीही तयार होत नाही. शासनाची गावठाण जागा जरी असली तरी त्याच्या शेजारी असलेल्या खासगी जागामालक त्यास विरोध करत असल्याचे सरपंच उषा रोकडे यांनी माहिती देतांना सांगितले.नांदूरवैद्य येथे अनेक ग्रामसभांमध्ये स्मशानभूमीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली असून गावाच्या चारही बाजूला शासनाची गावठाण जागा असून आत्तापर्यंत या गावाला अनेक राजकीय पुढारी लाभले असून परंतु एकाही पुढाऱ्याने स्मशानभूमीबाबत तोडगा काढलेला नाही.यापेक्षा पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होत असून अनेकदा पावसातच अंत्यविधी करावे लागतात. त्यावेळी अनेक अडचणी येतात. प्रशासनाने येथील स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देवून जागा निश्चित करावी व त्या ठिकाणी सुसज्ज स्मशानभूमीच्या शेडची पाण्याच्या सुविधेसह लवकर व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नांदूरवैद्य ग्रामस्थांनी केली आहे.स्मशानभूमी हा गावाचा मुख्य प्रश्न असून यासाठी गावातील ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतरही जागा उपलब्ध होत नसल्याने जागेअभावी निधी परत गेले असून जागेबद्दल ग्रामस्थांचा विरोध असून आता नव्याने गावठाण हद्दीतील जागा निश्चित करून त्या ठिकाणी पाण्यासह स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावणार आहे.- उषा रोकडे. सरपंच, नांदूरवैद्य.गावातील व्यक्ती मरण पावली तर त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही स्मशानभूमी अत्यंत खेदाची बाब आहे, माञ प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. त्यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे.आतातरी प्रशासनाने लक्ष घालून स्मशानभूमीसाठी शासनाच्या गावठाण हद्दीतील जागा उपलब्ध करून स्मशानभूमी उभारण्यासाठी कष्ट घ्यावे.- गणेश मुसळे. ग्रामस्थ 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू