शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

आगामी कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीत शुध्द जल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 01:07 IST

त्र्यंबकेश्वर येथे उगमस्थानीच गोदावरी नदी प्रदूषित होत असून त्यामुळेच मेाठी समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे पालनच राज्य शासनाकडून होत नसल्याचा ठपका ठेवत, लवादाने गाेदावरीतील पाणी अंघोळीच्या पात्रतेचे नाही, असा शेरा मारला आहे. हा शेरा त्र्यंबकेश्वरसंदर्भात असला तरी, महापालिका प्रशासनाने मात्र त्यावर आणखी गांभीर्याने घेत पाठपुरावा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. आगामी कुंभमेळ्यापूर्वी म्हणजेच २०२७ च्या आत गोदावरी खऱ्याअर्थाने तीर्थजल होऊ शकेल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वरसंदर्भातील हरित लवादाच्या शेऱ्यानंतर महापालिका सरसावली

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे उगमस्थानीच गोदावरी नदी प्रदूषित होत असून त्यामुळेच मेाठी समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे पालनच राज्य शासनाकडून होत नसल्याचा ठपका ठेवत, लवादाने गाेदावरीतील पाणी अंघोळीच्या पात्रतेचे नाही, असा शेरा मारला आहे. हा शेरा त्र्यंबकेश्वरसंदर्भात असला तरी, महापालिका प्रशासनाने मात्र त्यावर आणखी गांभीर्याने घेत पाठपुरावा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. आगामी कुंभमेळ्यापूर्वी म्हणजेच २०२७ च्या आत गोदावरी खऱ्याअर्थाने तीर्थजल होऊ शकेल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकेकडून गोदावरी शुध्दीकरण होत नसल्याने उलट सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याची तक्रार येथील पर्यावरणप्रेमी किरण कांबळे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यावर राज्य शासनाला काही सूचना हरित लवादाने केल्या होत्या. त्याबाबत समाधानकारक कारवाई झाली नसल्याचे हरित लवादाचे म्हणणे असून त्याअनुषंगाने त्यांनी गोदावरी नदीतील पाणी अंघोळीयोग्य नसल्याचे नमूद केले आहे. त्र्यंबकेश्वर प्रकरणात राज्य शासनावर हरित लवादाने फटकारले असले तरी, नाशिक महापालिकेने मात्र, कार्यवाही सुरू केली असून आगामी कुंभमेळ्याच्या आत प्रकल्प पूर्ण झाल्यास गोदावरीत शुध्द जल प्रवाही होईल असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

नाशिक शहरातून १९ किलोमीटर गोदावरी नदी वाहते. त्यासाठी महापालिकेने १८०० कोटी रुपयांचा ड्राफ्ट डीपीआर तयार केला असून हा अहवाल केंद्र शासनाने मंजूर करून पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्यास केंद्र राज्य आणि नाशिक महापालिका यांच्या मदतीने गोदावरी नदीला शुध्द जल मिळू शकेल असे आयुक्त जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नाशिक शहरातून वाहणारे ६७ नाले आणि ४ उपनद्या शुध्द झाल्याशिवाय म्हणजेच त्यात मिसळणारे सांडपाणी थांबवल्याशिवाय गोदावरी शुध्द होणार नाही, असे सांगून ते म्हणाले, निरीच्या निकषानुसार १० च्या आत बीओडी असणारी दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत, अन्य चार जुन्या केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी देखील शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे आयुक्तांनी सांगितले.

इन्फो...

रामकुंड परिसरातील काँक्रिटीकरण मुक्तीचे समर्थन

गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी रामकुंड परिसरातील तळ काँक्रिटीकरण हटवण्याच्या पर्यावरणप्रेमींच्या मागणीचे आयुक्त कैलास जाधव यांनी समर्थन केले. स्मार्ट सिटी सध्या हे काम करीत असल्याचे आयुक्त म्हणाले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरीtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर