शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आगामी कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीत शुध्द जल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 01:07 IST

त्र्यंबकेश्वर येथे उगमस्थानीच गोदावरी नदी प्रदूषित होत असून त्यामुळेच मेाठी समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे पालनच राज्य शासनाकडून होत नसल्याचा ठपका ठेवत, लवादाने गाेदावरीतील पाणी अंघोळीच्या पात्रतेचे नाही, असा शेरा मारला आहे. हा शेरा त्र्यंबकेश्वरसंदर्भात असला तरी, महापालिका प्रशासनाने मात्र त्यावर आणखी गांभीर्याने घेत पाठपुरावा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. आगामी कुंभमेळ्यापूर्वी म्हणजेच २०२७ च्या आत गोदावरी खऱ्याअर्थाने तीर्थजल होऊ शकेल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वरसंदर्भातील हरित लवादाच्या शेऱ्यानंतर महापालिका सरसावली

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे उगमस्थानीच गोदावरी नदी प्रदूषित होत असून त्यामुळेच मेाठी समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे पालनच राज्य शासनाकडून होत नसल्याचा ठपका ठेवत, लवादाने गाेदावरीतील पाणी अंघोळीच्या पात्रतेचे नाही, असा शेरा मारला आहे. हा शेरा त्र्यंबकेश्वरसंदर्भात असला तरी, महापालिका प्रशासनाने मात्र त्यावर आणखी गांभीर्याने घेत पाठपुरावा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. आगामी कुंभमेळ्यापूर्वी म्हणजेच २०२७ च्या आत गोदावरी खऱ्याअर्थाने तीर्थजल होऊ शकेल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकेकडून गोदावरी शुध्दीकरण होत नसल्याने उलट सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याची तक्रार येथील पर्यावरणप्रेमी किरण कांबळे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यावर राज्य शासनाला काही सूचना हरित लवादाने केल्या होत्या. त्याबाबत समाधानकारक कारवाई झाली नसल्याचे हरित लवादाचे म्हणणे असून त्याअनुषंगाने त्यांनी गोदावरी नदीतील पाणी अंघोळीयोग्य नसल्याचे नमूद केले आहे. त्र्यंबकेश्वर प्रकरणात राज्य शासनावर हरित लवादाने फटकारले असले तरी, नाशिक महापालिकेने मात्र, कार्यवाही सुरू केली असून आगामी कुंभमेळ्याच्या आत प्रकल्प पूर्ण झाल्यास गोदावरीत शुध्द जल प्रवाही होईल असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

नाशिक शहरातून १९ किलोमीटर गोदावरी नदी वाहते. त्यासाठी महापालिकेने १८०० कोटी रुपयांचा ड्राफ्ट डीपीआर तयार केला असून हा अहवाल केंद्र शासनाने मंजूर करून पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्यास केंद्र राज्य आणि नाशिक महापालिका यांच्या मदतीने गोदावरी नदीला शुध्द जल मिळू शकेल असे आयुक्त जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नाशिक शहरातून वाहणारे ६७ नाले आणि ४ उपनद्या शुध्द झाल्याशिवाय म्हणजेच त्यात मिसळणारे सांडपाणी थांबवल्याशिवाय गोदावरी शुध्द होणार नाही, असे सांगून ते म्हणाले, निरीच्या निकषानुसार १० च्या आत बीओडी असणारी दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत, अन्य चार जुन्या केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी देखील शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे आयुक्तांनी सांगितले.

इन्फो...

रामकुंड परिसरातील काँक्रिटीकरण मुक्तीचे समर्थन

गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी रामकुंड परिसरातील तळ काँक्रिटीकरण हटवण्याच्या पर्यावरणप्रेमींच्या मागणीचे आयुक्त कैलास जाधव यांनी समर्थन केले. स्मार्ट सिटी सध्या हे काम करीत असल्याचे आयुक्त म्हणाले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरीtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर