शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आगामी कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीत शुध्द जल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 01:07 IST

त्र्यंबकेश्वर येथे उगमस्थानीच गोदावरी नदी प्रदूषित होत असून त्यामुळेच मेाठी समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे पालनच राज्य शासनाकडून होत नसल्याचा ठपका ठेवत, लवादाने गाेदावरीतील पाणी अंघोळीच्या पात्रतेचे नाही, असा शेरा मारला आहे. हा शेरा त्र्यंबकेश्वरसंदर्भात असला तरी, महापालिका प्रशासनाने मात्र त्यावर आणखी गांभीर्याने घेत पाठपुरावा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. आगामी कुंभमेळ्यापूर्वी म्हणजेच २०२७ च्या आत गोदावरी खऱ्याअर्थाने तीर्थजल होऊ शकेल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वरसंदर्भातील हरित लवादाच्या शेऱ्यानंतर महापालिका सरसावली

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे उगमस्थानीच गोदावरी नदी प्रदूषित होत असून त्यामुळेच मेाठी समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे पालनच राज्य शासनाकडून होत नसल्याचा ठपका ठेवत, लवादाने गाेदावरीतील पाणी अंघोळीच्या पात्रतेचे नाही, असा शेरा मारला आहे. हा शेरा त्र्यंबकेश्वरसंदर्भात असला तरी, महापालिका प्रशासनाने मात्र त्यावर आणखी गांभीर्याने घेत पाठपुरावा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. आगामी कुंभमेळ्यापूर्वी म्हणजेच २०२७ च्या आत गोदावरी खऱ्याअर्थाने तीर्थजल होऊ शकेल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकेकडून गोदावरी शुध्दीकरण होत नसल्याने उलट सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याची तक्रार येथील पर्यावरणप्रेमी किरण कांबळे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यावर राज्य शासनाला काही सूचना हरित लवादाने केल्या होत्या. त्याबाबत समाधानकारक कारवाई झाली नसल्याचे हरित लवादाचे म्हणणे असून त्याअनुषंगाने त्यांनी गोदावरी नदीतील पाणी अंघोळीयोग्य नसल्याचे नमूद केले आहे. त्र्यंबकेश्वर प्रकरणात राज्य शासनावर हरित लवादाने फटकारले असले तरी, नाशिक महापालिकेने मात्र, कार्यवाही सुरू केली असून आगामी कुंभमेळ्याच्या आत प्रकल्प पूर्ण झाल्यास गोदावरीत शुध्द जल प्रवाही होईल असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

नाशिक शहरातून १९ किलोमीटर गोदावरी नदी वाहते. त्यासाठी महापालिकेने १८०० कोटी रुपयांचा ड्राफ्ट डीपीआर तयार केला असून हा अहवाल केंद्र शासनाने मंजूर करून पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्यास केंद्र राज्य आणि नाशिक महापालिका यांच्या मदतीने गोदावरी नदीला शुध्द जल मिळू शकेल असे आयुक्त जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नाशिक शहरातून वाहणारे ६७ नाले आणि ४ उपनद्या शुध्द झाल्याशिवाय म्हणजेच त्यात मिसळणारे सांडपाणी थांबवल्याशिवाय गोदावरी शुध्द होणार नाही, असे सांगून ते म्हणाले, निरीच्या निकषानुसार १० च्या आत बीओडी असणारी दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत, अन्य चार जुन्या केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी देखील शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे आयुक्तांनी सांगितले.

इन्फो...

रामकुंड परिसरातील काँक्रिटीकरण मुक्तीचे समर्थन

गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी रामकुंड परिसरातील तळ काँक्रिटीकरण हटवण्याच्या पर्यावरणप्रेमींच्या मागणीचे आयुक्त कैलास जाधव यांनी समर्थन केले. स्मार्ट सिटी सध्या हे काम करीत असल्याचे आयुक्त म्हणाले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरीtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर