शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा

By suyog.joshi | Updated: February 10, 2024 15:59 IST

अर्बन डेव्हलपमेंट समिट’ परिषदेत तज्ञांचा सूर, ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण गरजेचे.

सुयोग जोशी,नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, गामपंचायतींचे प्रश्न वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा असून ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. पायाभूत सुविधांची पूर्तता केल्यास शहरांचा कायापालट सहज शक्य असल्याचा सूर शाश्वत विकासाबाबत आयोजित परिषदेत तज्ञांकडून उमटला.जयहिंद लोकचळवळ आणि प्रज्ञा फाऊंडेशनतर्फे शहरांचा शाश्वत विकास हे प्रमुख उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून ‘अर्बन डेव्हलपमेंट समिट’ परिषदेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. 

व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, प्रज्ञा फाऊंडेशनच्या संचालक प्रियंका शर्मा, प्रतीक्षा देवळेकर, नामदेव गुंजाळ आदी उपस्थित होते. यावेळी तांबे म्हणाले, शहरांचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे, त्याप्रमाणे विकास हाेण्यासाठी लोहसहभागातून विकासाची कामे करण्याची गरज असल्याचे सांगितले. 

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:ची उत्पन्नाची साधने निर्माण करावी असेही आवाहन केले. यावेळी कचरा व्यवस्थापनाबद्दल बोलतांना प्रमाेद दब्रासे म्हणाले, ओला कचरा घराघरातून गोळा करण्याची गरज असून सडणारा कचराही रोज गोळा केल्यास प्रदूषणमुक्ती सहज शक्य आहे. प्रत्येक मनपाने कचरा कमी करण्याची धोरणे, नागरिकांचा सहभाग, जागरूकतता आणि समुदाय सहभाग, विशेष श्रेणीतील कचऱ्याचे व्यवस्थापन याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. परिषदेत उत्तर महाराष्ट्रातील मनपाचे अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन निशांत आवडे यांनी केले.

रामकुंडाचे पाणी पिऊ शकतो का?

यावेळी बोलतांना विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, सध्या नद्यांचे प्रदूषण वाढते आहे. आपण रामकूंडाचे पाणी पिऊ शकतो का असा प्रश्न विचारत नद्यांमध्ये वाढलेल्या पाणवेली काढण्याची गरज असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीअंतर्गत सायकलिंगचा प्रोजेक्ट राबविण्यात आला, पण काही दिवसातच सायकलीच गायब झाल्याचे त्यांनी सांगत जशा समस्या शहरात तशाच ग्रामीण भागातही असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक