शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा

By suyog.joshi | Updated: February 10, 2024 15:59 IST

अर्बन डेव्हलपमेंट समिट’ परिषदेत तज्ञांचा सूर, ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण गरजेचे.

सुयोग जोशी,नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, गामपंचायतींचे प्रश्न वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा असून ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. पायाभूत सुविधांची पूर्तता केल्यास शहरांचा कायापालट सहज शक्य असल्याचा सूर शाश्वत विकासाबाबत आयोजित परिषदेत तज्ञांकडून उमटला.जयहिंद लोकचळवळ आणि प्रज्ञा फाऊंडेशनतर्फे शहरांचा शाश्वत विकास हे प्रमुख उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून ‘अर्बन डेव्हलपमेंट समिट’ परिषदेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. 

व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, प्रज्ञा फाऊंडेशनच्या संचालक प्रियंका शर्मा, प्रतीक्षा देवळेकर, नामदेव गुंजाळ आदी उपस्थित होते. यावेळी तांबे म्हणाले, शहरांचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे, त्याप्रमाणे विकास हाेण्यासाठी लोहसहभागातून विकासाची कामे करण्याची गरज असल्याचे सांगितले. 

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:ची उत्पन्नाची साधने निर्माण करावी असेही आवाहन केले. यावेळी कचरा व्यवस्थापनाबद्दल बोलतांना प्रमाेद दब्रासे म्हणाले, ओला कचरा घराघरातून गोळा करण्याची गरज असून सडणारा कचराही रोज गोळा केल्यास प्रदूषणमुक्ती सहज शक्य आहे. प्रत्येक मनपाने कचरा कमी करण्याची धोरणे, नागरिकांचा सहभाग, जागरूकतता आणि समुदाय सहभाग, विशेष श्रेणीतील कचऱ्याचे व्यवस्थापन याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. परिषदेत उत्तर महाराष्ट्रातील मनपाचे अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन निशांत आवडे यांनी केले.

रामकुंडाचे पाणी पिऊ शकतो का?

यावेळी बोलतांना विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, सध्या नद्यांचे प्रदूषण वाढते आहे. आपण रामकूंडाचे पाणी पिऊ शकतो का असा प्रश्न विचारत नद्यांमध्ये वाढलेल्या पाणवेली काढण्याची गरज असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीअंतर्गत सायकलिंगचा प्रोजेक्ट राबविण्यात आला, पण काही दिवसातच सायकलीच गायब झाल्याचे त्यांनी सांगत जशा समस्या शहरात तशाच ग्रामीण भागातही असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक