शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा

By suyog.joshi | Updated: February 10, 2024 15:59 IST

अर्बन डेव्हलपमेंट समिट’ परिषदेत तज्ञांचा सूर, ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण गरजेचे.

सुयोग जोशी,नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, गामपंचायतींचे प्रश्न वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरांच्या शाश्वत विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा असून ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. पायाभूत सुविधांची पूर्तता केल्यास शहरांचा कायापालट सहज शक्य असल्याचा सूर शाश्वत विकासाबाबत आयोजित परिषदेत तज्ञांकडून उमटला.जयहिंद लोकचळवळ आणि प्रज्ञा फाऊंडेशनतर्फे शहरांचा शाश्वत विकास हे प्रमुख उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून ‘अर्बन डेव्हलपमेंट समिट’ परिषदेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. 

व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, प्रज्ञा फाऊंडेशनच्या संचालक प्रियंका शर्मा, प्रतीक्षा देवळेकर, नामदेव गुंजाळ आदी उपस्थित होते. यावेळी तांबे म्हणाले, शहरांचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे, त्याप्रमाणे विकास हाेण्यासाठी लोहसहभागातून विकासाची कामे करण्याची गरज असल्याचे सांगितले. 

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:ची उत्पन्नाची साधने निर्माण करावी असेही आवाहन केले. यावेळी कचरा व्यवस्थापनाबद्दल बोलतांना प्रमाेद दब्रासे म्हणाले, ओला कचरा घराघरातून गोळा करण्याची गरज असून सडणारा कचराही रोज गोळा केल्यास प्रदूषणमुक्ती सहज शक्य आहे. प्रत्येक मनपाने कचरा कमी करण्याची धोरणे, नागरिकांचा सहभाग, जागरूकतता आणि समुदाय सहभाग, विशेष श्रेणीतील कचऱ्याचे व्यवस्थापन याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. परिषदेत उत्तर महाराष्ट्रातील मनपाचे अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन निशांत आवडे यांनी केले.

रामकुंडाचे पाणी पिऊ शकतो का?

यावेळी बोलतांना विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, सध्या नद्यांचे प्रदूषण वाढते आहे. आपण रामकूंडाचे पाणी पिऊ शकतो का असा प्रश्न विचारत नद्यांमध्ये वाढलेल्या पाणवेली काढण्याची गरज असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीअंतर्गत सायकलिंगचा प्रोजेक्ट राबविण्यात आला, पण काही दिवसातच सायकलीच गायब झाल्याचे त्यांनी सांगत जशा समस्या शहरात तशाच ग्रामीण भागातही असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक