शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

निषेध सभा : सीएए, एनआरसीमुळे देशची धर्मनिरपेक्षता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 16:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे, त्यामुळे आता कुठल्याही अन्य कायद्याची अजिबात गरज उरलेली नाही.

ठळक मुद्देविविध जाती, धर्माचे लोक या देशात गुण्यागोविंदाने नांदत आहेसरकारला केवळ सीएए, एनआरसीसारख्या गोष्टींमध्येच रसमहापुरूषांच्या प्रतिमांनी वेधले लक्ष

नाशिक : केंद्र सरकार देशभरात आणू पाहणाऱ्या सीएए, एनआरसी कायदा हा भारतीय संविधानाच्या विरोधातला आहे. हा कायदा तातडीने रद्द करून देशाची अराजकतेकडे होणार वाटचाल रोखावी आणि धर्मनिरपेक्ष राष्टÑाचा भारताचा नावलौकिक टिकवावा, असा सूर सीएए,एनआरसीविरूध्द आयोजित महिलांच्या निषेध सभेतून उमटला.संविधानप्रेमी नाशिककर मनपा पुर्व विभाग व राहत फाउण्डेशनच्या संयुक्त विद्यमाने वडाळारोडवरील साहिल लॉन्समध्ये रविवारी (दि.१९) सीएए, एनआरसी, एनपीआरविरूध्द महिलांची निषेध सभा घेण्यात आली. यावेळी विचारमंचावर प्रमुख वक्ता म्हणून मुंबईच्या रिजवी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सादीया शेख, छात्रभारतीच्या युवती संघटक स्वाती त्रिभुवन, नॅशनल उर्दू वरिष्ठ महाविद्यालयाच्या अल्फीया शेख, छात्रभारतीच्या शहर उपाध्यक्ष आम्रपाली वाकळे, मुस्लीम महिला धर्मगुरू आलेमा फरहत बाजी, आलेमा नादेरा बाजी, डॉ. फौजिया बाजी उपस्थित होत्या.यावेळी सादियाने उर्दू शेरपासून आपल्या भाषणाला सुरूवात करत उपस्थित महिलांचे लक्ष वेधले. ती म्हणाली, या देशाच्या महिलांना कमी लेखले जाते, हे चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे, त्यामुळे आता कुठल्याही अन्य कायद्याची अजिबात गरज उरलेली नाही. त्यांच्या कायद्यान्वये देश आतापर्यंत उत्तरोत्तर प्रगती करत असून विविध जाती, धर्माचे लोक या देशात गुण्यागोविंदाने नांदत आहे; मात्र काही विशिष्ट विचारधारेच्या लोकांना ते बघवत नाही. सीएए, एनआरसी,एनपीआर यांसारखे हातखंडे ते अवलंबवून देशाची विविधतेतील एकता व धर्मनिरपेक्षता धोक्यात आणू पाहत आहे, असे सादिया म्हणाली.‘हमे चाहीये आजादी’ ही घोषणा पुन्हा देण्यासाठी मोदी सरकारने देशाच्या तरूणाईला मजबूर केले आहे. या देशातील विद्यापिठांमध्ये काही समाजकंटक धुडगूस घालतात. राज्यांच्या कानाकोपºयात महिला, तरूणींच्या अब्रूशी खेळले जात असून महिलांची सुरक्षितता धोक्यात सापडली असताना सरकारला केवळ सीएए, एनआरसीसारख्या गोष्टींमध्येच रस वाटतो, हे दुर्दैव असल्याचे आम्रपालीने सांगितले.महापुरूषांच्या प्रतिमांनी वेधले लक्षनिषेध सभेच्या ठिकाणी महिलांची स्वाक्षºयाही घेण्यात आल्या. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. विचारमंचाच्या पुढे राष्टÑध्वज तिरंगा उभारण्यात आला होता. तसेच उपस्थित महिलांनी हातात राष्टÑध्वजासह महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, अश्पाकउल्ला खान यांसारख्या महापूरुषांच्या प्रतीमाही घेत सहभा नोंदविला.

टॅग्स :Nashikनाशिकcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMuslim Women Rallyमुस्लीम महिला मोर्चा