शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

निषेध सभा : सीएए, एनआरसीमुळे देशची धर्मनिरपेक्षता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 16:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे, त्यामुळे आता कुठल्याही अन्य कायद्याची अजिबात गरज उरलेली नाही.

ठळक मुद्देविविध जाती, धर्माचे लोक या देशात गुण्यागोविंदाने नांदत आहेसरकारला केवळ सीएए, एनआरसीसारख्या गोष्टींमध्येच रसमहापुरूषांच्या प्रतिमांनी वेधले लक्ष

नाशिक : केंद्र सरकार देशभरात आणू पाहणाऱ्या सीएए, एनआरसी कायदा हा भारतीय संविधानाच्या विरोधातला आहे. हा कायदा तातडीने रद्द करून देशाची अराजकतेकडे होणार वाटचाल रोखावी आणि धर्मनिरपेक्ष राष्टÑाचा भारताचा नावलौकिक टिकवावा, असा सूर सीएए,एनआरसीविरूध्द आयोजित महिलांच्या निषेध सभेतून उमटला.संविधानप्रेमी नाशिककर मनपा पुर्व विभाग व राहत फाउण्डेशनच्या संयुक्त विद्यमाने वडाळारोडवरील साहिल लॉन्समध्ये रविवारी (दि.१९) सीएए, एनआरसी, एनपीआरविरूध्द महिलांची निषेध सभा घेण्यात आली. यावेळी विचारमंचावर प्रमुख वक्ता म्हणून मुंबईच्या रिजवी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सादीया शेख, छात्रभारतीच्या युवती संघटक स्वाती त्रिभुवन, नॅशनल उर्दू वरिष्ठ महाविद्यालयाच्या अल्फीया शेख, छात्रभारतीच्या शहर उपाध्यक्ष आम्रपाली वाकळे, मुस्लीम महिला धर्मगुरू आलेमा फरहत बाजी, आलेमा नादेरा बाजी, डॉ. फौजिया बाजी उपस्थित होत्या.यावेळी सादियाने उर्दू शेरपासून आपल्या भाषणाला सुरूवात करत उपस्थित महिलांचे लक्ष वेधले. ती म्हणाली, या देशाच्या महिलांना कमी लेखले जाते, हे चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे, त्यामुळे आता कुठल्याही अन्य कायद्याची अजिबात गरज उरलेली नाही. त्यांच्या कायद्यान्वये देश आतापर्यंत उत्तरोत्तर प्रगती करत असून विविध जाती, धर्माचे लोक या देशात गुण्यागोविंदाने नांदत आहे; मात्र काही विशिष्ट विचारधारेच्या लोकांना ते बघवत नाही. सीएए, एनआरसी,एनपीआर यांसारखे हातखंडे ते अवलंबवून देशाची विविधतेतील एकता व धर्मनिरपेक्षता धोक्यात आणू पाहत आहे, असे सादिया म्हणाली.‘हमे चाहीये आजादी’ ही घोषणा पुन्हा देण्यासाठी मोदी सरकारने देशाच्या तरूणाईला मजबूर केले आहे. या देशातील विद्यापिठांमध्ये काही समाजकंटक धुडगूस घालतात. राज्यांच्या कानाकोपºयात महिला, तरूणींच्या अब्रूशी खेळले जात असून महिलांची सुरक्षितता धोक्यात सापडली असताना सरकारला केवळ सीएए, एनआरसीसारख्या गोष्टींमध्येच रस वाटतो, हे दुर्दैव असल्याचे आम्रपालीने सांगितले.महापुरूषांच्या प्रतिमांनी वेधले लक्षनिषेध सभेच्या ठिकाणी महिलांची स्वाक्षºयाही घेण्यात आल्या. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. विचारमंचाच्या पुढे राष्टÑध्वज तिरंगा उभारण्यात आला होता. तसेच उपस्थित महिलांनी हातात राष्टÑध्वजासह महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, अश्पाकउल्ला खान यांसारख्या महापूरुषांच्या प्रतीमाही घेत सहभा नोंदविला.

टॅग्स :Nashikनाशिकcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMuslim Women Rallyमुस्लीम महिला मोर्चा