शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

सिन्नर तालुक्यात श्रमदानासाठी जलमित्रांचे प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 17:24 IST

सिन्नर : तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी यावर्षी तब्बल ९० गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. तालुक्यात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि, या कामाचा जोर वाढविण्यासाठी सामाजिक संघटनांनी योगदान द्यावे, तसेच अन्य लोकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन येथील जलमित्रांनी केले आहे.

तालुक्यातील ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचा दाह सोसला आहे. परिणामी सर्वांनाच पाण्याचे महत्व कळाले असल्याचे जाणवते आहे. त्यामुळे १२८ पैकी सुमारे ९० गावांनी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. गावांनी सहभाग घेतला असला तरी त्यात ग्रामस्थांचा श्रमदानाच्या माध्यमाने सक्रीय सहभाग असणे महत्वाचे आहे. त्यामुळे जलमित्रांनी ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: विविध गावांमध्ये जाऊन श्रमदान करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यातून स्थानिकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मित्र मंडळी, नातेवाईक, समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, मित्र मंडळे, खासगी संस्था यांनी एकत्र येऊन समाजाचा घटक म्हणून श्रमदानात सहभागी होण्याची गरज जलमित्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ