शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

उमेदवारांकडून ‘फोन अ फ्रेण्ड’द्वारे प्रचार जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:53 IST

निवडणुकीच्या अंतिम पर्वात शक्य ती सर्व माध्यमे वापरून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट उमेदवारांनी ठेवले आहे. त्यामुळे आता लॅँडलाइन तसेच भ्रमणध्वनींवर फोन करून उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवाराचे नाव, चिन्ह सांगून मतदान करण्याची विनंती करीत आहेत. तसेच निकटचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नातेसंबंधातील मतदारांना फोन करण्यास लावत असल्याने निवडणुकीची ही लढाई हातघाईवर आल्याचे अधोरेखित होत आहे.

नाशिक : निवडणुकीच्या अंतिम पर्वात शक्य ती सर्व माध्यमे वापरून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट उमेदवारांनी ठेवले आहे. त्यामुळे आता लॅँडलाइन तसेच भ्रमणध्वनींवर फोन करून उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवाराचे नाव, चिन्ह सांगून मतदान करण्याची विनंती करीत आहेत. तसेच निकटचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नातेसंबंधातील मतदारांना फोन करण्यास लावत असल्याने निवडणुकीची ही लढाई हातघाईवर आल्याचे अधोरेखित होत आहे.प्रदीर्घ काळ ज्या नातेवाइकांचा आपल्याला कधीही फोन आलेला नसतो अशा नातेवाइकांकडून फोन येण्याचे प्रकारदेखील वाढू लागले आहेत. अमुक अमुक उमेदवार आपल्या तमुक-तमुकचा संबंधातला आहे. कधी काही मदत लागली तर भविष्यात आपल्याला हक्काने त्याच्याकडे जाता येईल. त्यामुळे यावेळी त्यालाच किंवा तिलाच मतदान करा, असेही फोन येण्यास प्रारंभ झाले आहेत. प्रत्येक उमेदवारांच्या समर्थकांकडून फोनचे हत्यार वापरले जात आहे.रेकॉर्डेडऐवजी प्रत्यक्ष संवादउमेदवाराच्या प्रचार कार्यालयातून किंवा प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून गत काही निवडणुकांमध्ये रेकॉर्डेड कॉल येत असत. मात्र, असे बहुतांश रेकॉर्डेड कॉल कट करून टाकले जात असल्याचे अनुभव आल्याने प्रचार यंत्रणेमार्फत आता टेलिकॉलर्सद्वारे फोन केले जात आहेत. संबंधित टेलिकॉलर महिला प्रत्यक्ष मतदाराशी बोलून आपल्या उमेदवाराचे नाव, निशाणी सांगून २१ आॅक्टोबरला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकElectionनिवडणूक