शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
3
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
4
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
5
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
6
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
7
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
8
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
9
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
10
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
11
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
12
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
13
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
14
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
15
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
16
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
17
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
18
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
19
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
20
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा

प्रकल्प बंदिस्त; पर्यटन उद््ध्वस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:53 IST

कुंभनगरी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार तरी कधी? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. पर्यटनाला ‘बुस्ट’ देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना वर्षानुवर्षांपासून राजकीय अनास्था व प्रशासकीय उदासीनतेमुळे खीळ बसलेली आहे.

नाशिक : कुंभनगरी म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार तरी कधी? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. पर्यटनाला ‘बुस्ट’ देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना वर्षानुवर्षांपासून राजकीय अनास्था व प्रशासकीय उदासीनतेमुळे खीळ बसलेली आहे. त्यामुळे नाशिककरांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना नाशिकच्या आजूबाजूला नेमके पर्यटन घडवायचे तरी कसले? हा यक्षप्रश्न सतावतो. राज्याने निधी पुरविला नाही तर केंद्राकडून मिळालेला चार कोटींचा खर्च पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि रिंगणातील प्रत्येक उमेदवाराने पर्यटन आणि पर्यावरणाचा आपापल्या जाहीरनाम्यात उदोउदो केला, मात्र प्रत्यक्षात पर्यटनाला वाव जरी असला तरी त्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेत विविध प्रकल्पांना गती दिली जात नसल्याने नागरिकदेखील संभ्रमात पडले आहेत. गंगापूर धरण परिसरात पर्यटकांचा राबता असतो, मात्र तेथील बोट क्लब अद्यापही धूळखात पडलेला असून, कोट्यवधी रुपयांच्या बोटींसह या प्रकल्पावर पाणी फिरले आहे. या इमारतीचा अन्य दुसºया तरी कारणासाठी उपयोग व्हावा, अशी मागणी होत आहे.गोदावरी परिचय उद्यानाचे तीन तेरानाशिककरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण दूधस्थळी (सोमेश्वर) धबधबा परिसराच्या सौंदर्यीकरणाची अद्याप कुणालाही गरज वाटलेली नाही. लाखो रुपये खर्च करून महापालिकेने येथे साकारलेल्या गोदावरी परिचय उद्यानाची पुरती वाट लागली आहे. हे उद्यान केवळ ओसाड मोकळे भूखंड बनून राहिले आहे. उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे मनपासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतील हा प्रकल्पदेखील गोदाकाठी बुडाला, असे म्हणणे वावगे ठरू नये. धबधब्याच्या परिसरात येणाºया पर्यटकांसाठी मनपा अद्याप प्रसाधनगृह व पाणपोईचीदेखील सुविधा उपलब्ध करून देऊ शकलेली नाही. देखभाल दुरुस्तीअभावी या उद्यानाची अवस्था कमालीची बिकट झाली आहे. गर्दुल्ले, जुगारी, मद्यपींचा अड्डा म्हणून या उद्यानाकडे बघितले जाऊ लागले आहे. त्याचा त्रास धबधब्याच्या परिसरात आनंद घेण्यासाठी येणाºया पर्यटकांनाही कायमस्वरूपी सहन करावा लागत आहे.राज्याकडून निधी नाही‘कलाग्राम’च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १२ ते १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्राकडून सुमारे चार कोटी रुपयांचा निधीही सुरुवातीला पुरविला गेला, मात्र त्यानंतर केंद्राने योजना बंद पडल्याचे सांगून उर्वरित निधी पुरविला नाही. परिणामी ‘कलाग्राम’चा प्रकल्प अंतिम टप्प्यात येऊन रखडला. उर्वरित कामासाठी राज्याच्या पर्यटन विभागाक डून जोपर्यंत निधी येत नाही, तोपर्यंत क लाग्रामचे ग्रहण सुटणार नाही.राज्य पर्यटन विकास महामंडळाने गोवर्धन शिवारात ‘कलाग्राम’चा प्रकल्प मागील पाच वर्षांपूर्वी हाती घेतला होता. केंद्राच्या निधीतून हा प्रकल्प साकारला गेला, मात्र अंतिम टप्प्यात निधी अपुरा पडल्याने कलाग्रामला तीन ते चार वर्षांपासून लागलेले ग्रहण सुटता सुटत नसल्याने या प्रकल्पावर अद्याप करण्यात आलेला कोटींचा खर्च पाण्यात गेल्यासारखा आहे. केंद्राचा निधी संपून तीन वर्षे उलटली असून, पर्यटन मंत्रालयाकडून या प्रकल्पाचा ‘कळस’ चढविण्यासाठी निधी अजूनही उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, हे दुर्दैवच. हा प्रकल्प अधांतरी असताना गंगापूर धरण परिसरात पर्यटन महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून ‘ग्रेप रिसॉर्ट’ची देखणी वास्तू साकारली, मात्र दोन वर्षांपासून हा प्रकल्प अजूनही कार्यान्वित होऊ शकलेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtourismपर्यटन