शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कॅप्सूल तंत्रज्ञानातून उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:01 IST

पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देमहेंद्र बोरसे : पाथरेत सेंद्रिय व जैविक खते वापरावर कार्यशाळा

पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी यावेळी सांगितले.पाथरे येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीमध्ये झालेल्या चर्चासत्रात शेतकºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, विभागीय कार्यालय नाशिक व एस.आर.टी. अ‍ॅग्रो सायन्स कंपनी छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सेंद्रिय व जैविक शेती या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी व्यासपीठावर महामंडळाचे समन्वयक शशिकांत पठारे, उपव्यवस्थापक भरत जाधव, सहायक व्यवस्थापक सुनील शेलवले, उपव्यवथापक किशोर राठोड, विभागीय व्यवस्थापक रवींद्र पाटील, श्रीकांत बेहरे, कुणाल शित्रे, प्रमोद वझरे, पाथरे सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष गंगाधर सुडके, बाळासाहेब घुमरे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र घुमरे, नवनाथ नरोडे, चांगदेव गुंजाळ उपस्थित होते.आंबा, शेवगा, सोयाबीन, वाटणे, भट, ऊस, कापूस, मूग, बाजरी, काकडी, भुईमूग, मका आणि भाजीपाला यासाठी उपयोग होतो. यावेळी शशिकांत पाटील, किशोर पठारे यांनीही शेतकºयांना कॅप्सूल तंत्रज्ञानाचा वापर करावा याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी सोसायटीचे संचालक मच्छिंद्र चिने, प्रवीण चिने, बाळासाहेब चिने, कारभारी सुडके, नारायण गुंजाळ, भाऊसाहेब नरोडे, रामनाथ चिने, भाऊसाहेब चिने, प्रमोद नरोडे, सूर्यभान गुंजाळ, अशोक गव्हाणे, मोहन दवंगे, संदीप ढवण, भीमा पवार, योगेश रहाणे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अण्णासाहेब चिने यांनी सूत्रसंचालन केले.कॅप्सूल हे तंत्रज्ञान भारताने विकसित केले असून, त्यातून औषधांची निर्मिती केली आहे. रासायनिक खतांपेक्षा स्वस्त आणि फायदेशीर ही खते आहेत. याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात पाथरे सोसायटीत प्रथमच शेतकºयांना याबद्दल माहिती देण्यात आली. याद्वारे शेती केली असता निश्चित फायदा होतो आणि पर्यावरण संरक्षण होते.