शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

कॅप्सूल तंत्रज्ञानातून उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:01 IST

पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देमहेंद्र बोरसे : पाथरेत सेंद्रिय व जैविक खते वापरावर कार्यशाळा

पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी यावेळी सांगितले.पाथरे येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीमध्ये झालेल्या चर्चासत्रात शेतकºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, विभागीय कार्यालय नाशिक व एस.आर.टी. अ‍ॅग्रो सायन्स कंपनी छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सेंद्रिय व जैविक शेती या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी व्यासपीठावर महामंडळाचे समन्वयक शशिकांत पठारे, उपव्यवस्थापक भरत जाधव, सहायक व्यवस्थापक सुनील शेलवले, उपव्यवथापक किशोर राठोड, विभागीय व्यवस्थापक रवींद्र पाटील, श्रीकांत बेहरे, कुणाल शित्रे, प्रमोद वझरे, पाथरे सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष गंगाधर सुडके, बाळासाहेब घुमरे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र घुमरे, नवनाथ नरोडे, चांगदेव गुंजाळ उपस्थित होते.आंबा, शेवगा, सोयाबीन, वाटणे, भट, ऊस, कापूस, मूग, बाजरी, काकडी, भुईमूग, मका आणि भाजीपाला यासाठी उपयोग होतो. यावेळी शशिकांत पाटील, किशोर पठारे यांनीही शेतकºयांना कॅप्सूल तंत्रज्ञानाचा वापर करावा याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी सोसायटीचे संचालक मच्छिंद्र चिने, प्रवीण चिने, बाळासाहेब चिने, कारभारी सुडके, नारायण गुंजाळ, भाऊसाहेब नरोडे, रामनाथ चिने, भाऊसाहेब चिने, प्रमोद नरोडे, सूर्यभान गुंजाळ, अशोक गव्हाणे, मोहन दवंगे, संदीप ढवण, भीमा पवार, योगेश रहाणे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अण्णासाहेब चिने यांनी सूत्रसंचालन केले.कॅप्सूल हे तंत्रज्ञान भारताने विकसित केले असून, त्यातून औषधांची निर्मिती केली आहे. रासायनिक खतांपेक्षा स्वस्त आणि फायदेशीर ही खते आहेत. याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात पाथरे सोसायटीत प्रथमच शेतकºयांना याबद्दल माहिती देण्यात आली. याद्वारे शेती केली असता निश्चित फायदा होतो आणि पर्यावरण संरक्षण होते.