शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

गावठाणातील वाड्यांच्या समस्याही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:17 IST

दहा वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने आखलेल्या पूररेषेमुळे शेकडो मिळकती त्यात अडकल्या असून गावठाणाची सुटकाही झालेली नाही. एकीकडे पूररेषेतील वाड्यांच्या पुनर्विकासासाठी परवानगी दिली जात नाही आणि दुसरीकडे मात्र वाडे धोकादायक असल्याने ते रिक्त करण्यासाठी नोटिसा दिल्या जात आहेत.

नाशिक : दहा वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने आखलेल्या पूररेषेमुळे शेकडो मिळकती त्यात अडकल्या असून गावठाणाची सुटकाही झालेली नाही. एकीकडे पूररेषेतील वाड्यांच्या पुनर्विकासासाठी परवानगी दिली जात नाही आणि दुसरीकडे मात्र वाडे धोकादायक असल्याने ते रिक्त करण्यासाठी नोटिसा दिल्या जात आहेत. त्यामुळे मूळ प्रश्न कसा सुटणार? वाड्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुळात पुराची आणि पूररेषेची तीव्रता कमी करण्याचा जो प्रामाणिक उपाय होता तोच न केल्याने समस्या कायम आहे.शहरात येणाऱ्या पुराचा मोठा फटका गोदाकाठी असलेल्या भागाला बसतो. नाशिक आणि पंचवटी गावठाणातील भाग सर्वाधिक धोकादायक ठिकाणी आहे. पुराचे पाणी या भागात शिरत असल्याने नागरिक सतर्क असतात. मात्र २००८ मधील महापूर अनपेक्षित होता. गंगापूर धरणातून एकाएकी विसर्ग झाल्याने हा महापूर मानवनिर्मित होता असा ठपका ठेवला गेला, परंतु तसे चौकशी करून यंत्रणा निष्कर्षाप्रत आली असती, तर वेगळा भाग होता हा आक्षेप कायम असतानाही महापालिकेने जलसंपदा विभागाकडून पूररेषा आखून घेतली आणि आ बैल मुझे मार अशी स्थिती उद्भवली आहे. मुळात पुराची तीव्रता कमी होण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे त्या अद्याप केलेल्या नाहीत. महापालिकेने त्यातील एकही उपाययोजना करण्याबाबत जलसंपदा विभागाशी चर्चा केलेली नाही.महापालिकेने पूररेषा आखल्यानंतर पूररेषेतील बांधकामे स्थगित करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पूररेषेतील बांधकाम म्हणून नवीन परवानग्या दिल्या नाहीत. दुसरीकडे वाडे धोकादायक असल्याने नागरिकांनी स्थलांतरित व्हावे किंवा वाडे पाडून टाकावे म्हणून नोटिसा बजावल्या जात आहेत. वाडे पाडा म्हणणे सोपे आहे, मात्र येथून स्थलांतरित होणाºया नागरिकांना अन्य भागातील भाडे कसे परवडेल याचा कोणताही विचार केला गेलेला नाही. मूळ मुद्दा बांधकामांचा आहे. अलीकडे पडलेले भालेराव वाडा किंवा अन्य अनेक वाडे पूररेषेतील होते आणि महापालिकेने त्यांना बांधकामाची परवानगी नाकारली आहे. आता हे वाडे पडू लागल्यानंतर केवळ वाडे मालक आणि धोकादायक स्थितीत राहणाऱ्यांना जबाबदार धरून काय होणार? पूररेषा आणि पुराची तीव्रता कमीच करायची नसेल तर किमान गोदाकाठच्या वाड्यांचा प्रश्न तरी सुटणे अशक्यच आहे.क्लस्टरसाठी वाडे शिल्लक राहतील?२००८ मध्ये आलेला महापूरच नव्हे तर महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आली तेव्हापासून गावठाण भागाच्या विकासासाठी योजना असावी आणि जादा चटई क्षेत्र द्यावे, अशी मागणी आहे. वाड्यांसाठी क्लस्टर योजनेची घोषणा होऊन दोन वर्षे उलटली, परंतु इतक्या संथ गतीने काम सुरू आहे की योजना प्रत्यक्ष येण्यासाठीदेखील काम झालेले नाही त्यामुळे क्लस्टरच प्रत्यक्ष प्रस्ताव येईपर्यंत वाडे तरी शिल्लक राहतील का असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :floodपूरNashikनाशिक