शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कृषिमाल वाहतुकीची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:33 PM

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात संचारबंदी लागू असताना सरकारने जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करणारी वाहने आणि दुकाने सुरू ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये भीती : माल संकलन करणारी वाहने अडविण्याचे प्रकार

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात संचारबंदी लागू असताना सरकारने जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करणारी वाहने आणि दुकाने सुरू ठेवण्यास सूट दिली आहे. मात्र विविध जिल्ह्णांतून नाशिककडे येणाºया वाहनांच्या कोंडीत भाजीपाल्याची वाहतूक करणारी वाहनेही अडकली असून, कृषिमालाच्या पॅकिंगसाठी आवश्यक साहित्य प्रक्रिया उद्योगांपर्यंत पोहचविणारी वाहनेही विविध भागात अडकल्याने कृषिमाल प्रक्रिया व वितरण करणाºया उद्योगांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.नाशिक जिल्ह्णातून मुंबईला मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळबाज्यांच्या पुरवठा केला जातो. यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह गिरणारे, पिंपळगाव, लासलगाव, निफाड, इगतपुरीतील घोटी व पांढुर्ली या भागातून अनेक व्यापारी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करून मुंबईला पोहोचवितात. परंतु, गेल्या तीन ते चार दिवसांत या व्यापाऱ्यांची वाहने मुंबईहून नाशिकच्या दिशेने परतताना अनेक अडचणी येत आहेत. काही वाहनचालक मुंबईतून बाहेर पडणाºया प्रवाशांना वाहनात जागा देण्याचा प्रकार घडत असल्याने पोलिसांकडून अशा वाहनांची कसून चौकशी होत आहे. तर दुसरीकडे काही वाहने वाहतूक कोंडीत अडकल्याने वेळेत परतू न शकल्याने व्यापाºयांनी मर्यादित भाजीपाला खरेदी केला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत अनेक शेतकºयांच्या कृषिमालाची विक्री होऊ शकली नाही.दरम्यान, यासंदर्भात कृषिमाल प्रक्रिया उद्योजक व शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन शेतकºयांच्या समस्यांविषयी माहिती दिली असून, प्रशासनाकडून शेतकºयांच्या समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नाशिक जिल्ह्णातील विविध कृषिमाल प्रक्रिया उद्योगांना पॅकिंसाठी लागणारे साहित्य उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे कृषिमाल उचलण्यासाठी विविध गावांमध्ये फिरणाºया वाहनांना स्थानिक नागरिकांकडून गावाच्या परिसरात येण्यास मज्जाव केला जात असल्याने कृषिमालाचे संकलन करण्याचे आव्हान या उद्योगांसमोर निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेतील विक्रीसोबच निर्यातीवर होत असल्याने कृषी प्रक्रिया उद्योगही संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार