शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

खासगीकरणाने वीज कंपनी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:02 IST

‘केंद्रीय विद्युत कायदा- २००३’ मध्ये काळानुरूप दुरुस्त्या करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने २०१४ मध्ये पाठविलेल्या प्रस्तावास केंद्र सरकार मान्यता देण्याच्या तयारीत आहे़ कायद्यातील या बदलामुळे खासगी कंपन्यांचे ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पदार्पण होणार असून, सार्वजनिक ऊर्जानिर्मिती कंपन्या धोक्यात येणार आहेत़

नाशिक : ‘केंद्रीय विद्युत कायदा- २००३’ मध्ये काळानुरूप दुरुस्त्या करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने २०१४ मध्ये पाठविलेल्या प्रस्तावास केंद्र सरकार मान्यता देण्याच्या तयारीत आहे़ कायद्यातील या बदलामुळे खासगी कंपन्यांचे ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पदार्पण होणार असून, सार्वजनिक ऊर्जानिर्मिती कंपन्या धोक्यात येणार आहेत़  देशभरातील सार्वजनिक ऊर्जानिर्मिती कंपन्या व कामगार संघटनांनी या कायदे बदलास विरोध केला असून, येत्या ७ डिसेंबरला एकदिवसीय देशव्यापी लाक्षणिक संप केला जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्री सिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी रविवारी (दि़२६) केली़ गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये राज्याच्या सार्वजनिक ऊर्जा क्षेत्रातील महापारेषण कंपनीतील कामगारांच्या राज्यव्यापी संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते़ पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारची सार्वजनिक ऊर्जाक्षेत्रासाठीची धोरणे ही पोषक नाहीत़ सरकारच्या या निर्णयामुळे खासगी कंपन्यांचे ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पदार्पण होणार असून सार्वजनिक कंपन्या या धोक्यात येणार आहेत़ खासगी कंपन्यांना ग्राहक निवडण्याचा अधिकार मिळणार असून त्यांच्याकडे कमर्शिअल ग्राहक तर सार्वजनिक कंपन्यांना घरगुती, कुटीरोद्योग, शेती, ग्रामीण क्षेत्र हे तुटीचे ग्राहक मिळणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले़  महापारेषणचे प्रभारी संचालक सुगत गमरे यांनी कंपनीतील कामगारांचे व अधिकारी कामाचे स्वरूप ठरवित असून, त्यानुसार कामगारांचा सन्मान व प्रतिष्ठा अबाधित ठेवण्याचे आश्वासन दिले़ यावेळी व्यासपीठावर प्रकल्प संचालक रवींद्र चव्हाण, संचलन संचालक गणपतराव मुंडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनंत पाटील, फेडरेशनचे सल्लागार व्ही़ डी़ धनवटे, सरचिटणीस कृष्णा भोयर, उपाध्यक्ष ज्योती नटराजन, अरुण म्हस्के उपस्थित होते़ यावेळी कंपनतील आकृतिबंध आराखड्याची सद्यस्थिती, प्रशासनाची भूमिका या विषयांवर चर्चा करण्यात आली़२़४० लाख वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी अवघे ७९ हजार कर्मचारी आहेत़ यापूर्वी कंपनीतील ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले असले तरी आणखी ३० हजार कर्मचारी हे कंत्राटी असून, गत पंधरा वर्षांपासून काम करीत आहेत़ या कर्मचाºयांना काय करावे, असा अहवाल रानडे व भाटिया समितीने दिलेला असतानाही सरकार कार्यवाही करीत नाही़ या विरोधात सोमवारी (दि़२७) राज्यातील विविध ठिकाणी एकदिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे़

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक