शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, अहिल्यादेवी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 14:16 IST

जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो, याचा मला खूप आनंद होत आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. माझे भाग्य आहे की, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीसाठी नाशिक येथे आलो आहे. भारत की नारी शक्ती राजमाता जिजाऊ यांचीही आज जयंती आहे. जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो, याचा मला खूप आनंद होत आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची मराठीतून सुरुवात केली. नरेंद्र मोदी मराठीतून बोलताच एकच जल्लोष झाला. 

PM मोदींच्या खांद्यावरची शाल खाली पडणार, इतक्यात CM शिंदेंनी...; पाहा पुढे काय घडलं!

जिजाऊ यांच्या नारीशक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाला घडविले. देवी अहिल्यादेवी होळकर, लोकमान्य टिळक, विर सावरकर यांनी या भूमिने घडविले. पंचवटीत श्रीरामही येऊन गेले, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी नाशिक येथे आयोजित केलेल्या २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. नरेंद्र मोदींचे नाशकात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

मागील सरकारपेक्षा जास्त वेगाने काम सध्याचे सरकार करत आहे, असं कौतुकही नरेंद्र मोदींनी केले. तसेच वंदे भारत जोरात सुरू आहे. भारतातील विमानतळं आधुनिक पद्तीने तयार करण्यात आले आहे. जगाच्या विमानतळांबरोबर त्यांची गणना होत आहे. देशात नवी एनआयटी, आयआयटी तयार केल्या. विदेशात जाणाऱ्यांना प्रशिक्षणं दिले. मेड इन इंडिया, फायटर प्लेन, तेजस आकाशाची उंची गाठत असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले. शिक्षण, रोजगार, स्टार्ट अप, स्पोर्टस या सर्व क्षेत्रात युवकांसाठी एक सिस्टिम तयार होत आहे. युवकांसाठी आधुनिक इको स्किल सिस्टिम तयार होत आहे. युवकांच्या ताकदीची झलक सारं जग पाहतय. १० वर्षात  युवकांना विविध संधी दिल्या. अनेक युवकांना फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, युके सारख्या देशांशी संपर्क करून युवकांसाठी नव्या संधी प्राप्त करून दिल्या जात आहे, अशी माहिती देखील नरेंद्र मोदींनी यावेळी दिली. 

दरम्यान, प्रत्येकाला जीवनात वेगळी संधी असते. आजही मेजर ध्यानचंद यांना लक्षात ठेवले जाते. भगतसिंह, चंद्रशेखर आझाद यांची आठवण ठेवतो. त्यांनी आपल्या पराक्रमाने इंग्रजांना पळविले. महात्मा फूले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणात मोठी क्रांती केली. स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी देशासाठी अहोरात्र काम केले. ते देशासाठीच जगले. त्यांनी देशासाठीच संकल्प केले. देशाला नवी दिशा दिली. आता ही जबाबदारी युवकांवर आहे. देशातील युवांमध्ये सामथ्य' आहे. भारतातील ही युवकांची पिढी सर्वात भाग्यवान आहे. भारताचे युवा हे लक्ष पूर्ण करतील, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज