शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शाळा बनले मद्यपींचे ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:44 IST

ओझर : विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।... या ओळी स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहून क्र ांती घडवली आणि मुलींना शिक्षणाची कवाडे खुली झाली . मती, नीती आणि गती या तीनही बाबींचा विचार केल्यास ओझर मधील त्याच मुलींच्या शाळेत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

ओझर : विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।... या ओळी स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहून क्र ांती घडवली आणि मुलींना शिक्षणाची कवाडे खुली झाली . मती, नीती आणि गती या तीनही बाबींचा विचार केल्यास ओझर मधील त्याच मुलींच्या शाळेत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.आधीपासून साडेसातीने ग्रासलेल्या ओझरच्या बाजारपेठेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागलेले ग्रहण सुटत नसताना आता त्याला नेहेमीप्रमाणे लॉकडाऊनमध्ये सुद्धा मद्यपी,जुगारी आणि प्रेमीयुगुलानी बेजार करून ठेवले आहे.ओझर गावात दोन जिल्हा परिषद शाळा आहे. महामार्ग पलीकडे मुलांची तर बाजारपेठेत मुलींची. सध्या महामार्गावरील शाळेचे निर्लेखन झाल्याने तेथील विद्यार्थी गावातचदोन सत्रांमध्ये कसेबसे शिक्षण घेतात.या शाळेच्या आवाराची खासियत म्हणजे चारही बाजूनेआत शिरता येते. दोन्ही सत्रांचीशाळा सुटली की सुरवातीच्या इमारतीत सुरू होते ती दारु ड्यांची मेजवानी. पडलेला बाटल्यांचा खच,त्यात फुटलेल्या काचेच्या बाटल्या मच्छरांचे साम्राज्य, कुबट वास हे सर्व पाहता शाळा रोगाच्या खाईत लोटली जात आहे. समोरच्या दुमजली इमारतीत दिवसा जुगाराचे अड्डे चालते तेथे देखील सिगारेटची थोटकं व बाटल्या सर्रासपणे उघड्यावर फेकलेल्या आहेत. तेच ठिकाण सायंकाळी प्रेमीयुगुलांना मिटिंग पॉर्इंट बनून गेला आहे. काही वर्गांचे कोंडे तोडण्याचा प्रयत्न झाला आहे.मागच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाजूने येऊन प्रेमवीर थेट शिडीच्या सहाय्याने वर जातात.एकूणच या प्रकरणी शाळेला संरक्षण भिंतच नसल्याने हे सर्व प्रकार घडत असून आसपास मोठी नागरीवस्ती आहे.पोलिस व स्थानिक प्रशासनाने देखील गस्त वाढवून सदर प्रकरणी विद्येच्या संकुलाचे होणारे नुकसान थांबवावे असे आवाहन पालकांनी व्यक्त केले आहे.---------------------------------------आज ज्या प्राथमिक शाळेत भारताची भावी पिढी विद्येचे धडे गिरवते तेथे चालणारे हे अघोरी प्रयोग निंदनिय आहे.शाळेच्या वर्गखोल्या प्रेमीयुगुलांचे हक्काचे ठिकाण बनले असून मद्यपी व जुगार खेळणार्यांमुळे परिसराला पूर्णपणे घाणीने ग्रासले आहे.स्थानिक प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.-पांडुरंग आहेर,अध्यक्ष, शालेय समिती.

 

टॅग्स :Nashikनाशिक