टमाट्याचे दर गगनाला भिडले
By Admin | Updated: June 12, 2016 00:57 IST2016-06-12T00:44:12+5:302016-06-12T00:57:28+5:30
टमाट्याचे दर गगनाला भिडले

टमाट्याचे दर गगनाला भिडले
वणी : परराज्यात महाराष्ट्रातील टमाट्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वणी : स्थानिक ठिकाणी उत्पादनातील घट व परराज्यात महाराष्ट्रातील टमाट्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने टमाट्याचे दर गगनाला भिडले आहेत. वेळेवर पर्जन्यराजाची कृपा झाली नाहीतर दर अजून वाढण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
सध्या घाऊक बाजारात प्रतवारी व दर्जा पाहून ५० रुपये प्रतिकिलोचा भाव उत्पादकांना मिळतो आहे. किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलोचा दर ग्राहकांना मोजावा लागतो आहे. मागील वर्षी सरासरी पर्जन्यमानामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने त्याच्या प्रतिकूल परिणामांचे चटके आता जाणवत आहेत. धरणांनी तळ गाठला. विहिरी, नद्या, नाले कोरडेठाक झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची मारामार तेथे शेतीव्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न उभा राहिला आहे. दुष्काळी स्थितीमुळे अडचणी व समस्या उभ्या ठाकल्याने जनावरे जगवायची कशी, शेती करावयाची की नाही या विवंचनेत सापडलेल्या शेतकरी वर्गाचे कृषी उत्पादनाकडे दुर्लक्ष झाले आहे. (वार्ताहर)