शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
3
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
4
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
5
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
6
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
7
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
8
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
9
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
10
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
11
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
12
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
13
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
14
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
15
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
16
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
17
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीच्या वारीमधून मानवी जीवनमूल्यांची जोपासना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:58 IST

आम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठलनामाची धर्मपताका सांप्रदायाने फडकत ठेवली आहे. भक्त पुंडलिकाकडे मूळपुरुष म्हणून पाहिले जाते. कारण विठ्ठलभक्तीचा लळा भक्त पुंडलिकाने लावला.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजआम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठलनामाची धर्मपताका सांप्रदायाने फडकत ठेवली आहे. भक्त पुंडलिकाकडे मूळपुरुष म्हणून पाहिले जाते. कारण विठ्ठलभक्तीचा लळा भक्त पुंडलिकाने लावला. ‘पुंडलिके भक्ते रे तारिले विश्वजना। वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपुरी पाटणा।।’ पंढरपूरच समस्त वारकऱ्यांचे भक्तिपीठ आहे. संत नामदेवराय एका अभंगात म्हणतात, ‘आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।।’ अशी नामदेवांची दृढश्रद्धा आहे. परंतु संत ज्ञानदेव - नामदेवांच्या पूर्वीही पंढरपूरच्या यात्रेची परंपरा रूढ असावी. हे जरी सर्वमान्य असले आणि भीमा नदी, पंढरपूर, श्रीविठ्ठलही पूर्वपरंपरेने असले तरी वारकरी सांप्रदायाचा उदयकाल म्हणून आपल्याला बाराव्या शतकाच्या पूर्वार्धच स्वीकारावा लागतो.साधारणत: बाराव्या शतकापासून वारीला विशेषत्व प्राप्त झाले. कारण बाराव्या शतकात संत ज्ञानदेवादी भावंडांनी पंढरीचा विशेष महिमा गायिला. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘माझे जीवीची आवडी। पंढरपूर नेईन गुढी।।’ ही ज्ञानदेवांची धारणा होती. संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे शुद्ध होवूनी जावे। दवंडी पिटी भावे चोखामेळा।। टाळी वाजवावी, गुढी उभारावी। वाट ही चालावी पंढरीची ।।’ यातूनच लक्षावधी स्त्री-पुरुषांच्या नि:सत्व जीवनक्रमाला अध्यात्माची जोड देण्यामागील वारकरी सांप्रदायाचा उदार दृष्टिकोन दिसून येतो. या महाराष्टÑाच्या मनावर सात्त्विकतेचा, भावभक्तीचा व नि:स्वार्थाचा प्रभावी संस्कार वारकरी संतांनी केला. वारकरी हा सगुण-भक्तीचा पाईक आहे. कारण देवाला भेटायला जाणे आणि देव आपल्यासाठी वाट पाहत उभा आहे, ही मानसिकता विश्वात कुठेही दिसणार नाही. वारी हा वारकºयांचा प्राण आहे. ‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे।।’ हे वारकºयांचे ब्रीद आहे. वारीमधून मानवी जीवनमूल्य जोपासली जातात. अध्यात्माचे, भक्तीचे व आचरणाचे धडे वारीत गिरवायला मिळतात. समता-बंधुत्वाची शिकवण मिळते. ‘होय-होय वारकरी । पाहे - पाहे रे पंढरी।।’ ही वारकºयांची ब्रिदावली घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतो.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानवकल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमAshadhi Ekadashiआषाढी एकादशी