शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

पंढरीच्या वारीमधून मानवी जीवनमूल्यांची जोपासना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:58 IST

आम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठलनामाची धर्मपताका सांप्रदायाने फडकत ठेवली आहे. भक्त पुंडलिकाकडे मूळपुरुष म्हणून पाहिले जाते. कारण विठ्ठलभक्तीचा लळा भक्त पुंडलिकाने लावला.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजआम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठलनामाची धर्मपताका सांप्रदायाने फडकत ठेवली आहे. भक्त पुंडलिकाकडे मूळपुरुष म्हणून पाहिले जाते. कारण विठ्ठलभक्तीचा लळा भक्त पुंडलिकाने लावला. ‘पुंडलिके भक्ते रे तारिले विश्वजना। वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपुरी पाटणा।।’ पंढरपूरच समस्त वारकऱ्यांचे भक्तिपीठ आहे. संत नामदेवराय एका अभंगात म्हणतात, ‘आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।।’ अशी नामदेवांची दृढश्रद्धा आहे. परंतु संत ज्ञानदेव - नामदेवांच्या पूर्वीही पंढरपूरच्या यात्रेची परंपरा रूढ असावी. हे जरी सर्वमान्य असले आणि भीमा नदी, पंढरपूर, श्रीविठ्ठलही पूर्वपरंपरेने असले तरी वारकरी सांप्रदायाचा उदयकाल म्हणून आपल्याला बाराव्या शतकाच्या पूर्वार्धच स्वीकारावा लागतो.साधारणत: बाराव्या शतकापासून वारीला विशेषत्व प्राप्त झाले. कारण बाराव्या शतकात संत ज्ञानदेवादी भावंडांनी पंढरीचा विशेष महिमा गायिला. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘माझे जीवीची आवडी। पंढरपूर नेईन गुढी।।’ ही ज्ञानदेवांची धारणा होती. संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे शुद्ध होवूनी जावे। दवंडी पिटी भावे चोखामेळा।। टाळी वाजवावी, गुढी उभारावी। वाट ही चालावी पंढरीची ।।’ यातूनच लक्षावधी स्त्री-पुरुषांच्या नि:सत्व जीवनक्रमाला अध्यात्माची जोड देण्यामागील वारकरी सांप्रदायाचा उदार दृष्टिकोन दिसून येतो. या महाराष्टÑाच्या मनावर सात्त्विकतेचा, भावभक्तीचा व नि:स्वार्थाचा प्रभावी संस्कार वारकरी संतांनी केला. वारकरी हा सगुण-भक्तीचा पाईक आहे. कारण देवाला भेटायला जाणे आणि देव आपल्यासाठी वाट पाहत उभा आहे, ही मानसिकता विश्वात कुठेही दिसणार नाही. वारी हा वारकºयांचा प्राण आहे. ‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे।।’ हे वारकºयांचे ब्रीद आहे. वारीमधून मानवी जीवनमूल्य जोपासली जातात. अध्यात्माचे, भक्तीचे व आचरणाचे धडे वारीत गिरवायला मिळतात. समता-बंधुत्वाची शिकवण मिळते. ‘होय-होय वारकरी । पाहे - पाहे रे पंढरी।।’ ही वारकºयांची ब्रिदावली घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतो.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानवकल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमAshadhi Ekadashiआषाढी एकादशी