शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीच्या वारीमधून मानवी जीवनमूल्यांची जोपासना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:58 IST

आम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठलनामाची धर्मपताका सांप्रदायाने फडकत ठेवली आहे. भक्त पुंडलिकाकडे मूळपुरुष म्हणून पाहिले जाते. कारण विठ्ठलभक्तीचा लळा भक्त पुंडलिकाने लावला.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजआम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठलनामाची धर्मपताका सांप्रदायाने फडकत ठेवली आहे. भक्त पुंडलिकाकडे मूळपुरुष म्हणून पाहिले जाते. कारण विठ्ठलभक्तीचा लळा भक्त पुंडलिकाने लावला. ‘पुंडलिके भक्ते रे तारिले विश्वजना। वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपुरी पाटणा।।’ पंढरपूरच समस्त वारकऱ्यांचे भक्तिपीठ आहे. संत नामदेवराय एका अभंगात म्हणतात, ‘आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।।’ अशी नामदेवांची दृढश्रद्धा आहे. परंतु संत ज्ञानदेव - नामदेवांच्या पूर्वीही पंढरपूरच्या यात्रेची परंपरा रूढ असावी. हे जरी सर्वमान्य असले आणि भीमा नदी, पंढरपूर, श्रीविठ्ठलही पूर्वपरंपरेने असले तरी वारकरी सांप्रदायाचा उदयकाल म्हणून आपल्याला बाराव्या शतकाच्या पूर्वार्धच स्वीकारावा लागतो.साधारणत: बाराव्या शतकापासून वारीला विशेषत्व प्राप्त झाले. कारण बाराव्या शतकात संत ज्ञानदेवादी भावंडांनी पंढरीचा विशेष महिमा गायिला. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘माझे जीवीची आवडी। पंढरपूर नेईन गुढी।।’ ही ज्ञानदेवांची धारणा होती. संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे शुद्ध होवूनी जावे। दवंडी पिटी भावे चोखामेळा।। टाळी वाजवावी, गुढी उभारावी। वाट ही चालावी पंढरीची ।।’ यातूनच लक्षावधी स्त्री-पुरुषांच्या नि:सत्व जीवनक्रमाला अध्यात्माची जोड देण्यामागील वारकरी सांप्रदायाचा उदार दृष्टिकोन दिसून येतो. या महाराष्टÑाच्या मनावर सात्त्विकतेचा, भावभक्तीचा व नि:स्वार्थाचा प्रभावी संस्कार वारकरी संतांनी केला. वारकरी हा सगुण-भक्तीचा पाईक आहे. कारण देवाला भेटायला जाणे आणि देव आपल्यासाठी वाट पाहत उभा आहे, ही मानसिकता विश्वात कुठेही दिसणार नाही. वारी हा वारकºयांचा प्राण आहे. ‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे।।’ हे वारकºयांचे ब्रीद आहे. वारीमधून मानवी जीवनमूल्य जोपासली जातात. अध्यात्माचे, भक्तीचे व आचरणाचे धडे वारीत गिरवायला मिळतात. समता-बंधुत्वाची शिकवण मिळते. ‘होय-होय वारकरी । पाहे - पाहे रे पंढरी।।’ ही वारकºयांची ब्रिदावली घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतो.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानवकल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमAshadhi Ekadashiआषाढी एकादशी