शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

पंढरीच्या वारीमधून मानवी जीवनमूल्यांची जोपासना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:58 IST

आम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठलनामाची धर्मपताका सांप्रदायाने फडकत ठेवली आहे. भक्त पुंडलिकाकडे मूळपुरुष म्हणून पाहिले जाते. कारण विठ्ठलभक्तीचा लळा भक्त पुंडलिकाने लावला.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजआम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठलनामाची धर्मपताका सांप्रदायाने फडकत ठेवली आहे. भक्त पुंडलिकाकडे मूळपुरुष म्हणून पाहिले जाते. कारण विठ्ठलभक्तीचा लळा भक्त पुंडलिकाने लावला. ‘पुंडलिके भक्ते रे तारिले विश्वजना। वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपुरी पाटणा।।’ पंढरपूरच समस्त वारकऱ्यांचे भक्तिपीठ आहे. संत नामदेवराय एका अभंगात म्हणतात, ‘आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।।’ अशी नामदेवांची दृढश्रद्धा आहे. परंतु संत ज्ञानदेव - नामदेवांच्या पूर्वीही पंढरपूरच्या यात्रेची परंपरा रूढ असावी. हे जरी सर्वमान्य असले आणि भीमा नदी, पंढरपूर, श्रीविठ्ठलही पूर्वपरंपरेने असले तरी वारकरी सांप्रदायाचा उदयकाल म्हणून आपल्याला बाराव्या शतकाच्या पूर्वार्धच स्वीकारावा लागतो.साधारणत: बाराव्या शतकापासून वारीला विशेषत्व प्राप्त झाले. कारण बाराव्या शतकात संत ज्ञानदेवादी भावंडांनी पंढरीचा विशेष महिमा गायिला. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘माझे जीवीची आवडी। पंढरपूर नेईन गुढी।।’ ही ज्ञानदेवांची धारणा होती. संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे शुद्ध होवूनी जावे। दवंडी पिटी भावे चोखामेळा।। टाळी वाजवावी, गुढी उभारावी। वाट ही चालावी पंढरीची ।।’ यातूनच लक्षावधी स्त्री-पुरुषांच्या नि:सत्व जीवनक्रमाला अध्यात्माची जोड देण्यामागील वारकरी सांप्रदायाचा उदार दृष्टिकोन दिसून येतो. या महाराष्टÑाच्या मनावर सात्त्विकतेचा, भावभक्तीचा व नि:स्वार्थाचा प्रभावी संस्कार वारकरी संतांनी केला. वारकरी हा सगुण-भक्तीचा पाईक आहे. कारण देवाला भेटायला जाणे आणि देव आपल्यासाठी वाट पाहत उभा आहे, ही मानसिकता विश्वात कुठेही दिसणार नाही. वारी हा वारकºयांचा प्राण आहे. ‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे।।’ हे वारकºयांचे ब्रीद आहे. वारीमधून मानवी जीवनमूल्य जोपासली जातात. अध्यात्माचे, भक्तीचे व आचरणाचे धडे वारीत गिरवायला मिळतात. समता-बंधुत्वाची शिकवण मिळते. ‘होय-होय वारकरी । पाहे - पाहे रे पंढरी।।’ ही वारकºयांची ब्रिदावली घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतो.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानवकल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमAshadhi Ekadashiआषाढी एकादशी