आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेला प्रारंभ आज सिंहस्थाचे सादरीकरण : उद्या रंगीत तालीम
By Admin | Updated: May 29, 2014 00:53 IST2014-05-29T00:38:18+5:302014-05-29T00:53:01+5:30
नाशिक : नैसर्गिक वा मानवनिर्मित कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्याची जबाबदारी असलेल्या विविध शासकीय यंत्रणांना मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी जिल्ातील शासकीय अधिकार्यांसाठी तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या कार्यशाळेचा शुभारंभ आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ बी. बी. गडनाईक व जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेला प्रारंभ आज सिंहस्थाचे सादरीकरण : उद्या रंगीत तालीम
नाशिक : नैसर्गिक वा मानवनिर्मित कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्याची जबाबदारी असलेल्या विविध शासकीय यंत्रणांना मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी जिल्ातील शासकीय अधिकार्यांसाठी तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या कार्यशाळेचा शुभारंभ आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ बी. बी. गडनाईक व जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ गडनाईक यांनी आदर्श आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, कोणतीही आपत्तीची घटना घडल्यावर संबंधित यंत्रणांनी कोणती कार्य पद्धती अवलंबली पाहिजे, घडलेल्या घटनेला तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठी, नियंत्रण यंत्रणेचा प्रतिसाद मिळण्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या असतात याचे सादरीकरण केले. आग, पाऊस, चक्रीवादळ, पूर याचबरोबर गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काय करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक आपत्ती व तिचे स्वरूप वेगवेगळे असल्याने तिच्यावर मात करण्यासाठीदेखील प्रत्येक यंत्रणेची जबाबदारी भिन्न असते, त्यामुळे प्रत्येक आपत्ती व त्यासाठी लागणारी यंत्रणा व अन्य सहकारी खात्याने त्यासाठी सूक्ष्म नियोजन करावयास हवे, असे सांगितले. प्रत्येक खात्याच्या प्रमुखाशी समन्वय साधला जाणे व आपत्तीचे स्वरूप, त्याचे होणारे परिणाम याचा विचारही करायला हवा, याबाबत त्यांनी माहिती दिली. प्रारंभी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यात तंत्रज्ञानाच्या युगात तसेच विविध इलेक्ट्रॉनिक साधनांच्या प्रगतीमुळे आज कोणतीही आपत्ती घडली तर तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठी साधनांची मदत होते व आपत्ती काळात व्यवस्थापन करणे सोपे जाते, असे सांगितले.
या बैठकीस पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत पोतदार, उपआयुक्त प्रकाश वाघमोडे, अपर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, सिंहस्थ कुंभमेळा अधिकारी महेश पाटील, तसेच जिल्ातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
आज सादरीकरण
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ तज्ज्ञ निवृत्त मेजर कर्नल व्ही. के. दत्ता हे गुरुवारी टेबल टॉक प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी विविध खात्यांनी तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडाही यावेळी सादर करण्यात येऊन त्यातील उणिवा व त्रुटींबाबत चर्चा करण्यात येणार आहे.