शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रताप दिघावकरांनी अल्पावधीतच जिंकली शेतकऱ्यांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 01:43 IST

नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमाल विकत घेत त्याची व्यवहारानुसार ठरलेली लाखो रुपयांची रक्कम न देता फरार झालेल्या व्यापाऱ्यांना ‘खाकी’ने प्रथमच जोरदार हादरा दिला. नाशिक परिक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या पदरात सुमारे साडेअकरा कोटींची रक्कम वसूल करण्यास पोलीस यंत्रणेला यश आले. यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली नाशिकचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी.  दिघावकर हे आपल्या प्रदीर्घ पोलीस सेवेतून शुक्रवारी (दि.३0) निवृत्त झाले. स्वतः शेतकरी असलेले दिघावकर हे काही महिन्यांतच शेतकऱ्यांचे ‘हीरो’ बनले.

ठळक मुद्देसेवेतून निवृत्त : बुडीत निघालेल्या ११ कोटींची वसुली करण्यात यश; गुटखामुक्तीसाठीही  प्रयत्न

नाशिक : नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमाल विकत घेत त्याची व्यवहारानुसार ठरलेली लाखो रुपयांची रक्कम न देता फरार झालेल्या व्यापाऱ्यांना ‘खाकी’ने प्रथमच जोरदार हादरा दिला. नाशिक परिक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या पदरात सुमारे साडेअकरा कोटींची रक्कम वसूल करण्यास पोलीस यंत्रणेला यश आले. यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली नाशिकचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी. दिघावकर हे आपल्या प्रदीर्घ पोलीस सेवेतून शुक्रवारी (दि.३0) निवृत्त झाले. स्वतः शेतकरी असलेले दिघावकर हे काही महिन्यांतच शेतकऱ्यांचे ‘हीरो’ बनले. दिघावकर यांनी सप्टेंबर २०२० साली नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची सूत्रे तत्कालीन आयपीएस अधिकारी छेरिंग दोरजे यांच्याकडून स्वीकारली.यानंतर त्यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शेतकरी फसवणूक प्रकरणावर भर देणार असल्याचे म्हटले आणि फसवणूक करून पोबारा केलेल्या ‘त्या’ व्यापाऱ्यांना रोखठोक इशारा दिला. यामुळे व्यापाऱ्याचे धाबे दणाणले. शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज तालुका पातळीवरील पोलीस ठाण्यांमधील फायलींत धूळखात पडून होते, त्या सर्व अर्जांवरील धूळ झटकली गेली.नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्वच जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांनी शेतकऱ्यांचे फसवणुकीच्या बाबतीत प्राप्त झालेल्या अर्जांची युद्धपातळीवर चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. परिणामी, सप्टेंबरपासून डिसेंबरअखेरपर्यंत एकूण पाच जिल्ह्यांतून १ हजार १९२ शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याचे गाऱ्हाणे अर्जातून मांडले. यापैकी १ हजार १६१ अर्ज केवळ नाशिक ग्रामीणमधून आले आहेत. फसवणुकीची एकूण रक्कम ४६ कोटी २० लाख ५२ हजार ४३६ च्या घरात पोहोचली. १९१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले. २०० व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये तडजोड होऊन १९९ व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ६ कोटी ७५ लाख ८८ हजार ९८ रुपयांची रक्कम परत केली आहे. सुशिक्षित बेरोजगारांनाही दिला दिलासासुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार उत्तर महाराष्ट्रातील ३९ सुशिक्षित बेरोजगारांनी केली होती. या तक्रारींनुसार त्यांची २ कोटी ३८ लाख ९० हजार १०० रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी २ तक्रारदार व फसवणूक करणाऱ्यांमध्ये तडजोड झाली आहे, तसेच ११ जणांनी ३७ लाख ३८ हजार रुपये परत केले, तर फसवणूक करणाऱ्यांनी १५ लाख ५७ हजार रुपये परत करण्याची तयारी दर्शवली आहे, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेरोजगारांना गंडा घातल्याप्रकरणी सर्वाधिक तक्रारी नाशिक ग्रामीण भागातील असून, येथील २२ तक्रारींनुसार त्यांना १ कोटी ४४ लाख ४१ हजार १०० रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. दिघावकर मूळ नाशिककरदिघावकर हे मूळ नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र आहे. १९८७ च्या राज्यसेवा आयोगाच्या बॅचचे ते अधिकारी आहेत. जिल्ह्यातील अवैध धंदे, गुटख्याची तस्करी, शस्त्रांची तस्करी जुगाराचे अड्डे, दारूच्या भट्ट्या नाशिक परिक्षेत्र अर्थात उत्तर महाराष्ट्रातून उद्‌ध्वस्त करण्याचे आदेश त्यांनी सूत्रे हाती घेताच दिले. गुटखामुक्त उत्तर महाराष्ट्र हे अभियानही ग्रामीण पोलिसांचे गाजले.

कृतज्ञतेपोटी होर्डिंग झळकावलेनलहोर्डिंग, जाहिरात फलक, कटआऊट म्हटलं की एखादा पुढारी समोर येतो. राजकीय व्यक्ती आणि होर्डिंग्ज यांचे जुने समीकरण आहे. मात्र, जेव्हा एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याचे खाकी वर्दीवरील सचित्र असलेले भले मोठे होर्डिंग शहरातील मुख्य चौकात झळकले आणि हा विषय अधिकच चर्चेचा बनला होता. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा असाच भला मोठा फलकाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले होते. एका शेतकारीपुत्राने निनावी हे कृतज्ञतापूर्वक होर्डिंग्ज लावले होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसFarmerशेतकरी