शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

ह्यचला मुलांनो शाळेत चलाह्ण नारा देत जनजागृतीसाठी गावात प्रभात फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 00:53 IST

जुनी शेमळी : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शासनाच्या आदेशानुसार आठवी ते दहावी वर्ग गुरुवारपासून (दि. १५) सुरू होत असून जुनी शेमळी (ता. बागलाण) येथील आर. बी. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी नवी शेमळी, जुनी शेमळी, चिंचकसाड या गावातील विद्यार्थ्यांना ह्यचला मुलांनो शाळेत चलाह्ण असा नारा करीत ढोल-ताशांच्या गजरात गावात प्रभातफेरी काढत जनजागृती केली.

ठळक मुद्देजुनी शेमळी : आजपासून होणार शाळा सुरू

जुनी शेमळी : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शासनाच्या आदेशानुसार आठवी ते दहावी वर्ग गुरुवारपासून (दि. १५) सुरू होत असून जुनी शेमळी (ता. बागलाण) येथील आर. बी. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी नवी शेमळी, जुनी शेमळी, चिंचकसाड या गावातील विद्यार्थ्यांना ह्यचला मुलांनो शाळेत चलाह्ण असा नारा करीत ढोल-ताशांच्या गजरात गावात प्रभातफेरी काढत जनजागृती केली.कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्याने पाचवी ते आठवीचे वर्ग शाळांमध्ये सुरू केले होते, मात्र पुन्हा कोरोनाचा कहर वाढला. सध्या कोरोना कमी होत असल्याने शासन आदेशानुसार गुरुवार (दि. १५)पासून आठवी ते दहावी वर्ग सुरू होत असल्याने मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.कोरोना व लॉकडाऊनमुळे मार्च २०२० पासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ऑनलाईन वर्ग, क्लासेस सुरू झाले. ऑनलाईनसाठी ॲन्ड्रॉईड मोबाईल व इंटरनेट बॅलन्स गरजेचे होऊन बसले होते. रोज मुलांसमोर सुमारे दोन ते चार तास मोबाईल डोळ्यांसमोर राहू लागला होता. आता मात्र शाळा सुरू होणार असल्याने पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.ऑनलाईन शिक्षणपद्धती आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांना अडचणीच्या काळात मुलांनी मोबाईल खरेदी करण्यास भाग पडले. परिस्थिती नसतानाही पालकांनी पाल्यांसाठी मोबाईल खरेदी केले. अन्य ठिकाणी मोबाईल नेटवर्क व बॅलन्सअभावी विद्यार्थी वंचित होता. शिक्षकांनी त्या काळात ह्यशिक्षक आपल्या दारीह्ण या उपक्रमाद्वारे ऑनलाईन शिक्षण दिले, त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक विद्यार्थी हा मोबाईलमध्ये गुंतून राहत होता. अलीकडे शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याने मुलांकडून मोबाईल दूर जात असल्याचे चित्र दिसून येणार आहे.कोरोनाच्या लॉकडाऊन काळात विद्या‌‌र्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला. या ऑनलाईनसाठी ॲन्ड्रॉईड मोबाईल व नेट बॅलन्सची गरज पडली, मात्र विद्यार्थी ऑनलाईन ऐवजी गेममध्येही रममाण होत होते. मात्र शाळा सुरू होत असल्याने अखेर मुलांच्या हातून मोबाईलची सुटका होणार आहे.- दादा बागुल, पालक.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी