शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
4
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
5
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
7
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
8
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
9
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
10
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
11
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
12
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
13
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
14
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
15
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
16
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
17
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
18
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
19
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
20
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल माफीचा शेतकर्‍यांना सरसकट लाभ द्यावा

By admin | Updated: May 7, 2014 22:36 IST

राज्यात जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीत शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्यांच्या नावावर लाईटबिल आहे,

नाशिक : राज्यात जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीत शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्यांच्या नावावर लाईटबिल आहे, त्यांनाच या निर्णयाचा लाभ होणार असल्याने लाईटबिल अन्य नातलगांच्या नावावर असलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनाही वीजबिल माफ करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीत मंजूर करण्यात आला.कृषी समितीची मासिक बैठक उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीजबिल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कालावधीतील वीज देयक शासन अदा करणार आहे. परंतु मोेठ्या प्रमाणात शेतकरी कागदोपत्री प्रत्यक्ष वीजग्राहक नसल्यामुळे या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तरी जे शेतकरी प्रत्यक्ष वीजग्राहक नाहीत परंतु वारसदार किंवा वीज उपभोक्ता म्हणून वीजबिल भरत आहेत अशा सर्व शेतकर्‍यांना या शासनाच्या निर्णयाचा लाभ देण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव तसेच सभेच्या सुरुवातीलाच मार्चनंतरही जिल्‘ात प्रामुख्याने मालेगाव, बागलाणसह काही तालुक्यांत बेमोसमी पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत, असा ठराव शैलेश सूर्यवंशी यांनी मांडला. त्यास बाळासाहेब गुंड यांनी अनुमोदन दिले. जिल्‘ात विशेषत: सटाणा व मालेगाव तालुक्यात शासकीय उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात फळबागा लागवड करण्यात येते. त्यात डाळींब या फळपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. त्यासाठी लागणारी कलमे अन्य तालुक्यांतील रोपवाटिकेतून घेण्यात येऊ नये अशी सक्ती करण्यात येते. अशी सक्ती करण्यात येऊ नये, असा ठराव शैलेश सूर्यवंशी यांनी मांडला, तो संमत करण्यात आला. तसेच बागलाण, निफाडसह अन्य तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. म्हणून केळझर, हरणबारी यांसह अन्य धरणांतून पाण्याचे आवर्तन तत्काळ सोडण्यात यावे, असा ठराव शैलेश सूर्यवंशी व भावना भंडारे यांनी मांडला, तो संमत करण्यात आला. बैठकीस अर्जुन बर्डे, श्रीमती शोभा डोखळे, सुभाष चौधरी, श्रीमती सुनंदा भोये, जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)