शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वीजबिल माफीचा शेतकर्‍यांना सरसकट लाभ द्यावा

By admin | Updated: May 7, 2014 22:36 IST

राज्यात जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीत शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्यांच्या नावावर लाईटबिल आहे,

नाशिक : राज्यात जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीत शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्यांच्या नावावर लाईटबिल आहे, त्यांनाच या निर्णयाचा लाभ होणार असल्याने लाईटबिल अन्य नातलगांच्या नावावर असलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनाही वीजबिल माफ करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीत मंजूर करण्यात आला.कृषी समितीची मासिक बैठक उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीजबिल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कालावधीतील वीज देयक शासन अदा करणार आहे. परंतु मोेठ्या प्रमाणात शेतकरी कागदोपत्री प्रत्यक्ष वीजग्राहक नसल्यामुळे या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तरी जे शेतकरी प्रत्यक्ष वीजग्राहक नाहीत परंतु वारसदार किंवा वीज उपभोक्ता म्हणून वीजबिल भरत आहेत अशा सर्व शेतकर्‍यांना या शासनाच्या निर्णयाचा लाभ देण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव तसेच सभेच्या सुरुवातीलाच मार्चनंतरही जिल्‘ात प्रामुख्याने मालेगाव, बागलाणसह काही तालुक्यांत बेमोसमी पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत, असा ठराव शैलेश सूर्यवंशी यांनी मांडला. त्यास बाळासाहेब गुंड यांनी अनुमोदन दिले. जिल्‘ात विशेषत: सटाणा व मालेगाव तालुक्यात शासकीय उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात फळबागा लागवड करण्यात येते. त्यात डाळींब या फळपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. त्यासाठी लागणारी कलमे अन्य तालुक्यांतील रोपवाटिकेतून घेण्यात येऊ नये अशी सक्ती करण्यात येते. अशी सक्ती करण्यात येऊ नये, असा ठराव शैलेश सूर्यवंशी यांनी मांडला, तो संमत करण्यात आला. तसेच बागलाण, निफाडसह अन्य तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. म्हणून केळझर, हरणबारी यांसह अन्य धरणांतून पाण्याचे आवर्तन तत्काळ सोडण्यात यावे, असा ठराव शैलेश सूर्यवंशी व भावना भंडारे यांनी मांडला, तो संमत करण्यात आला. बैठकीस अर्जुन बर्डे, श्रीमती शोभा डोखळे, सुभाष चौधरी, श्रीमती सुनंदा भोये, जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)