शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
3
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
6
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
7
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
8
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
9
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
10
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
11
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
12
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
13
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
14
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
15
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
16
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
17
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
18
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
19
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
20
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

वीजबिल माफीचा शेतकर्‍यांना सरसकट लाभ द्यावा

By admin | Updated: May 7, 2014 22:36 IST

राज्यात जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीत शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्यांच्या नावावर लाईटबिल आहे,

नाशिक : राज्यात जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीत शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाने जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्यांच्या नावावर लाईटबिल आहे, त्यांनाच या निर्णयाचा लाभ होणार असल्याने लाईटबिल अन्य नातलगांच्या नावावर असलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनाही वीजबिल माफ करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीत मंजूर करण्यात आला.कृषी समितीची मासिक बैठक उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीजबिल माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कालावधीतील वीज देयक शासन अदा करणार आहे. परंतु मोेठ्या प्रमाणात शेतकरी कागदोपत्री प्रत्यक्ष वीजग्राहक नसल्यामुळे या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तरी जे शेतकरी प्रत्यक्ष वीजग्राहक नाहीत परंतु वारसदार किंवा वीज उपभोक्ता म्हणून वीजबिल भरत आहेत अशा सर्व शेतकर्‍यांना या शासनाच्या निर्णयाचा लाभ देण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव तसेच सभेच्या सुरुवातीलाच मार्चनंतरही जिल्‘ात प्रामुख्याने मालेगाव, बागलाणसह काही तालुक्यांत बेमोसमी पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत, असा ठराव शैलेश सूर्यवंशी यांनी मांडला. त्यास बाळासाहेब गुंड यांनी अनुमोदन दिले. जिल्‘ात विशेषत: सटाणा व मालेगाव तालुक्यात शासकीय उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात फळबागा लागवड करण्यात येते. त्यात डाळींब या फळपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. त्यासाठी लागणारी कलमे अन्य तालुक्यांतील रोपवाटिकेतून घेण्यात येऊ नये अशी सक्ती करण्यात येते. अशी सक्ती करण्यात येऊ नये, असा ठराव शैलेश सूर्यवंशी यांनी मांडला, तो संमत करण्यात आला. तसेच बागलाण, निफाडसह अन्य तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. म्हणून केळझर, हरणबारी यांसह अन्य धरणांतून पाण्याचे आवर्तन तत्काळ सोडण्यात यावे, असा ठराव शैलेश सूर्यवंशी व भावना भंडारे यांनी मांडला, तो संमत करण्यात आला. बैठकीस अर्जुन बर्डे, श्रीमती शोभा डोखळे, सुभाष चौधरी, श्रीमती सुनंदा भोये, जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)