शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

आर्थिक धोरणामुळे कामगार संघटनांची शक्ती खिळखिळी : भालचंद्र कांगो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:17 IST

भाजपा सरकार शेतकरी व कामगारांच्या विरोधात धोरण आखून अन्याय करत आहे. या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारच्या विरोधात कामगार, शेतकरीवर्ग एकवटला असून, सर्व संघटनांच्या वतीने एल्गार पुकारला आहे.

नाशिक : भाजपा सरकार शेतकरी व कामगारांच्या विरोधात धोरण आखून अन्याय करत आहे. या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारच्या विरोधात कामगार, शेतकरीवर्ग एकवटला असून, सर्व संघटनांच्या वतीने एल्गार पुकारला आहे.जानेवारी महिन्यात होणाऱ्या देशव्यापी संपात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ताकद दाखवावी. कामगारविरोधी व नवीन आर्थिक धोरणांमुळे संघटनांची शक्ती खिळखिळी झाली आहे, असे प्रतिपादन भाकपचे राष्टय सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.आयटकच्या वतीने आयोजित दोनदिवसीय १८व्या त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी कांगो बोलत होते. आयटकचे प्रदेशाध्यक्ष सुकुमार दामले हे अध्यक्षस्थानी होते. श्रीकृष्ण लॉन्स येथे होत असलेल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन शर्मा, महासचिव देवीदास तुळजापूरकर, श्यामजी काळे, राजू देसले आदी उपस्थित होते.यावेळी कांगो म्हणाले, बेरोजगारी, असंघटित कामगारांचे प्रश्न, किमान वेतनाच्या प्रश्नासह विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत; मात्र या सरकारला या समस्यांशी देणे-घेणे नाही. सरकार केवळ सर्वसामान्य जनतेच्या विरोधात निर्णय घेण्यात मग्न आहे.कायदा-सुव्यवस्था व संविधानाने दिलेले अधिकार हे धोक्यात आले आहे. देशातील सर्व कायदे बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने चालविला आहे.  जानेवारीमध्ये पुकारण्यात आलेला संप हा संविधान वाचविण्यासाठीदेखील असणार आहे. कामगार संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे महाराष्टला दिसून येईल, असा दावा त्यांनी केला. अधिवेशनामध्ये ८ व ९ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदबाबत नियोजन, कामगारविरोधी संकटांवर मात करण्यासाठी चर्चा, सरकारच्या कामगारविरोधी धोरणांवर विचारमंथन करण्यात येत आहे. दुपारच्या सत्रात कृषी अभ्यासक मिलिंद मुरुगकर यांनी शेतकरी कामगारांच्या चळवळीची एकजूट ही काळाची गरज या विषयावर मत मांडले.

टॅग्स :Employeeकर्मचारीNashikनाशिक