शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

गोदाकाठ भागात वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:35 IST

सायखेडा : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी सायखेडा परिसरात पाणी दाखल झाले. गुरुवारी दुपारपर्यंत नांदूरमधमेश्वर धरणात पाणी दाखल होईल. दारणा धरणातून ७००, वालदेवी २००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, भयाण दुष्काळात आलेल्या आवर्तनामुळे गोदाकाठ भागातील गावांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देवालदेवी २००, दारणा ७००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेकचा विसर्ग

सायखेडा : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी सायखेडा परिसरात पाणी दाखल झाले. गुरुवारी दुपारपर्यंत नांदूरमधमेश्वर धरणात पाणी दाखल होईल. दारणा धरणातून ७००, वालदेवी २००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, भयाण दुष्काळात आलेल्या आवर्तनामुळे गोदाकाठ भागातील गावांना दिलासा मिळणार आहे.दारणा आणि गोदावरी नदी अनेक दिवसांपासून कोरडी पडली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा थेंबही नसल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना बंद झाल्या आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. आठ दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. गावांना पाणीपुरवठा करणाºया विहिरी कोरड्याठाक पडल्याने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.सोमवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुष्काळ दौरा केला. त्याच दिवशी वालदेवी, मुकणे आणि दारणा धरणातून एकूण १८०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. मात्र नदीचे कोरडेठाक पात्र आणि वाळू उपसा झाल्याने पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे नदीच्या पात्रात मोठा जलसाठा साठला जात असल्याने पाणी पुढे ढकलण्यास उशीर होत आहे. गुरु वारी नांदूरमधमेश्वर धरणात पाणी पोहोचून दोन दिवसानंतर डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे.नदीतून वाहणाºया पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होऊ नये, अडथळा निर्माण होऊ नये, नदीपात्रातून काही दिवस शेतकऱ्यांनी पाणी उचलू नये, धरण भरून उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडले जावे तोपर्यंत नदीकाठच्या भागातील वीजपुरवठा २२ तास खंडित करण्यात आला आहे.बंद पडलेल्यायोजना कार्यान्वित गोदावरी नदीच्या काठावर विहिरी खोदून अनेक गावांनी कुपनलिकांद्वारे गावांना पाणीपुरवठा करणाºया योजना केल्या आहेत. मात्र नदीचे पाणी आटल्याने एक महिन्यापासून अनेक योजना बंद पडल्या होत्या. नदीला अखेरचे आवर्तन आल्याने या योजना पुन्हा सुरू होऊन गावांना दिलासा मिळणार आहे. यामुळे किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.