शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोदाकाठ भागात वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:35 IST

सायखेडा : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी सायखेडा परिसरात पाणी दाखल झाले. गुरुवारी दुपारपर्यंत नांदूरमधमेश्वर धरणात पाणी दाखल होईल. दारणा धरणातून ७००, वालदेवी २००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, भयाण दुष्काळात आलेल्या आवर्तनामुळे गोदाकाठ भागातील गावांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देवालदेवी २००, दारणा ७००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेकचा विसर्ग

सायखेडा : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी सायखेडा परिसरात पाणी दाखल झाले. गुरुवारी दुपारपर्यंत नांदूरमधमेश्वर धरणात पाणी दाखल होईल. दारणा धरणातून ७००, वालदेवी २००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, भयाण दुष्काळात आलेल्या आवर्तनामुळे गोदाकाठ भागातील गावांना दिलासा मिळणार आहे.दारणा आणि गोदावरी नदी अनेक दिवसांपासून कोरडी पडली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा थेंबही नसल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना बंद झाल्या आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. आठ दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. गावांना पाणीपुरवठा करणाºया विहिरी कोरड्याठाक पडल्याने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.सोमवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुष्काळ दौरा केला. त्याच दिवशी वालदेवी, मुकणे आणि दारणा धरणातून एकूण १८०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. मात्र नदीचे कोरडेठाक पात्र आणि वाळू उपसा झाल्याने पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे नदीच्या पात्रात मोठा जलसाठा साठला जात असल्याने पाणी पुढे ढकलण्यास उशीर होत आहे. गुरु वारी नांदूरमधमेश्वर धरणात पाणी पोहोचून दोन दिवसानंतर डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे.नदीतून वाहणाºया पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होऊ नये, अडथळा निर्माण होऊ नये, नदीपात्रातून काही दिवस शेतकऱ्यांनी पाणी उचलू नये, धरण भरून उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडले जावे तोपर्यंत नदीकाठच्या भागातील वीजपुरवठा २२ तास खंडित करण्यात आला आहे.बंद पडलेल्यायोजना कार्यान्वित गोदावरी नदीच्या काठावर विहिरी खोदून अनेक गावांनी कुपनलिकांद्वारे गावांना पाणीपुरवठा करणाºया योजना केल्या आहेत. मात्र नदीचे पाणी आटल्याने एक महिन्यापासून अनेक योजना बंद पडल्या होत्या. नदीला अखेरचे आवर्तन आल्याने या योजना पुन्हा सुरू होऊन गावांना दिलासा मिळणार आहे. यामुळे किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.