शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या सरी कोसळताच वीज विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:25 IST

पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, तेथून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेकडो ग्राहकांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देशहरात अनेक घटना : पंचवटीत नागरिक संतप्त;इंदिरानगर, पाथर्डी फाटा, गंगापूररोड, शरणपूररोडला वीज खंडित

पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, तेथून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेकडो ग्राहकांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना ‘बिजली गूल’चा फटका सहन करावा लागल्याने आगामी काळात वीजवितरण कंपनी ग्राहकांना असेच वेठीस धरणार का? असा सवाल केला जात आहे.हिरावाडी परिसरातील बनारसीनगर, शक्तीनगर, भगवतीनगर, अभिजितनगर, शिवकृपानगर, पाटकिनार परिसर भागात रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांच्या घरातील बिजली गूल होण्यापाठोपाठ मुख्य रस्त्यावर असलेले पथदिवेदेखील बंद असल्याने किर्रर्र अंधार पसरलेला होता.नाशिकनाशिकरोडच्या अनेक भागात अंधाररोडच्या अनेक भागात अंधारनाशिकरोड : गेल्या शनिवारपासून पहिल्या पावसात विजेचा सुरू झालेला खेळखंडोबा अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे नाशिकरोडच्या अनेक भागात रात्रीच्या सुमारास वीज गायब होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.पावसाच्या कालावधीत दरवर्षी विद्युत रोहित्र तसेच वीज वाहिन्यांमध्ये बिघाड होत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असतो त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो वीज वितरण कंपनीने पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे असले तरी पावसाळ्याच्या पहिल्या दुसºया दिवसापासूनच वीजपुरवठा खंडित होत असल्याने आगामी कालावधीत वीज वितरण कंपनी वारंवार वीजपुरवठा खंडित करून ग्राहकांना अशाप्रकारे अंधारात ठेवणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.तक्रार क्रमांक बिझीपरिसरातील वीज खंडित झाली किंवा विद्युत रोहित्रात बिघाड झाल्यास वीज वितरण कंपनीकडे तक्रार नोंदविण्यासाठी वीज वितरण कंपनीने ग्राहकांना एका मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे; मात्र सदरचा क्रमांक सतत बिझी येत असल्याने नागरिकांना संताप व्यक्त करावा लागला. वीजवितरण कंपनीने सदरचा मोबाइल क्रमांक पंचवटी परिसरातील तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिलेला असला तरी अत्यावश्यक वेळी सदर क्रमांक सतत बिझी दाखवित असल्याने ग्राहकांना वारंवार नंबर डायल करावा लागला. अखेर फोन लागलाच नाही.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज