शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसाच्या सरी कोसळताच वीज विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:25 IST

पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, तेथून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेकडो ग्राहकांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देशहरात अनेक घटना : पंचवटीत नागरिक संतप्त;इंदिरानगर, पाथर्डी फाटा, गंगापूररोड, शरणपूररोडला वीज खंडित

पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, तेथून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेकडो ग्राहकांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना ‘बिजली गूल’चा फटका सहन करावा लागल्याने आगामी काळात वीजवितरण कंपनी ग्राहकांना असेच वेठीस धरणार का? असा सवाल केला जात आहे.हिरावाडी परिसरातील बनारसीनगर, शक्तीनगर, भगवतीनगर, अभिजितनगर, शिवकृपानगर, पाटकिनार परिसर भागात रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांच्या घरातील बिजली गूल होण्यापाठोपाठ मुख्य रस्त्यावर असलेले पथदिवेदेखील बंद असल्याने किर्रर्र अंधार पसरलेला होता.नाशिकनाशिकरोडच्या अनेक भागात अंधाररोडच्या अनेक भागात अंधारनाशिकरोड : गेल्या शनिवारपासून पहिल्या पावसात विजेचा सुरू झालेला खेळखंडोबा अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे नाशिकरोडच्या अनेक भागात रात्रीच्या सुमारास वीज गायब होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.पावसाच्या कालावधीत दरवर्षी विद्युत रोहित्र तसेच वीज वाहिन्यांमध्ये बिघाड होत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असतो त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो वीज वितरण कंपनीने पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे असले तरी पावसाळ्याच्या पहिल्या दुसºया दिवसापासूनच वीजपुरवठा खंडित होत असल्याने आगामी कालावधीत वीज वितरण कंपनी वारंवार वीजपुरवठा खंडित करून ग्राहकांना अशाप्रकारे अंधारात ठेवणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.तक्रार क्रमांक बिझीपरिसरातील वीज खंडित झाली किंवा विद्युत रोहित्रात बिघाड झाल्यास वीज वितरण कंपनीकडे तक्रार नोंदविण्यासाठी वीज वितरण कंपनीने ग्राहकांना एका मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे; मात्र सदरचा क्रमांक सतत बिझी येत असल्याने नागरिकांना संताप व्यक्त करावा लागला. वीजवितरण कंपनीने सदरचा मोबाइल क्रमांक पंचवटी परिसरातील तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिलेला असला तरी अत्यावश्यक वेळी सदर क्रमांक सतत बिझी दाखवित असल्याने ग्राहकांना वारंवार नंबर डायल करावा लागला. अखेर फोन लागलाच नाही.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज