शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
2
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
3
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
5
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
6
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
7
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
9
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
10
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
12
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
14
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
15
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
16
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
17
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
18
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
19
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
20
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर

वीज मंडळ कर्मचाऱ्यांचे पेन्शन देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:42 AM

गेल्या पंचवीस वर्षांपासून वीज मंडळाचे कर्मचारी व सेवानिवृत्त अभियंता आणि अन्य कर्मचारी सेवानिवृत्ती वेतनाची मागणी करीत असून, शासन आणि आता कंपनी त्यासंदर्भात टाळाटाळ करीत आहे.

नाशिक : गेल्या पंचवीस वर्षांपासून वीज मंडळाचे कर्मचारी व सेवानिवृत्त अभियंता आणि अन्य कर्मचारी सेवानिवृत्ती वेतनाची मागणी करीत असून, शासन आणि आता कंपनी त्यासंदर्भात टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे राज्य विद्युत मंडळ सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संघाच्या वतीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली अवमान याचिका दुरुस्तीसह दाखल करण्यात आली असून, ती अंतिम सुनावणीसाठी मंजूर झाली आहे. लवकरच त्यावर निर्णय होणार असल्याने सर्वांचे त्या याचिकेकडे लक्ष लागून आहे.विद्युत मंडळातील कर्मचाऱ्यांना १ एप्रिल १९९३ रोजी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली आहे. त्यात मंडळाच्या सेवेतून १ एप्रिल १९७४ नंतर निवृत्त होणाºया प्रत्येक कर्मचाºयाकरिता कोणत्याही भेदभावाशिवाय योजना अंमलात आणण्याचे ठरले होते. कारण मंडळाने १९९५ सालापासून लागू केलेली ईपीएस ९५ ही योजना कर्मचारी हिताची नसल्याने मंडळाने त्यापेक्षा चांगली योजना राबविण्याचा ठराव ३१ मे १९९७ रोजी संमत केला होता.राज्य शासनानेदेखील सर्व कायदेशीर बाजू पडताळल्यानंतर विधानसभेत २००१ मध्ये राज्य शासनाच्या धर्तीवर निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु त्यानंतर काहीच हालचाल न झाल्याने सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष बी. के. करंदीकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २०१७ मध्ये नागपूर खंडपीठाने यासंदर्भात तीन महिन्यांत जबाबदारीने निर्णय घेण्याचे आदेश दिले. परंतु यानंतरदेखील काहीच प्रतिसाद न मिळाल्याने करंदीकर यांनी अवमान याचिका दाखल केली. त्यावर वीज मंडळाकडे सूत्र असलेल्या कंपनीने बैठक घेऊन मंडळाच्या आर्थिक अडचणींचा बोजा राज्य सरकार घेण्यास तयार नसल्याने निवृत्तिवेतन देता येणार नाही, असा ठराव केला आहे त्यामुळे सर्व मुद्द्यांचा समावेश करून पुन्हा याचिका सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.अंतिम सुनावणीसाठी याचिकायाचिकाकर्त्याने न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा याचिका दाखल केली आहे. एस. एच. शुक्रे व एम. एस. मोडक यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी झाली आणि त्यांनी अंतिम सुनावणीसाठी याचिका मंजूर केली आहे. शासनाचा आणि वीज कंपनीचा वेळकाढूपणा तसेच लालफितीचे धोरण यामुळे कंपनीचे कर्मचारी त्रस्त झाले असून, आता अंतिम सुनावणीकडे साºयांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीelectricityवीजCourtन्यायालय