शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे जेष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला; प्रकृती चिंताजनक!
2
मुंबईत मनसेला भगदाड, भाजपापाठोपाठ शिंदेसेनेचाही धक्का; प्रवक्त्यांसह नेत्यांचा पक्षाला रामराम
3
१० वर्षांत बना 'करोडपती'! दरमहा SIP द्वारे १ कोटींचा निधी उभारण्याचे गणित; किती करावी लागेल गुंतवणूक?
4
तुम्ही बुरखा घालून मागच्या दाराने विधानसभेत गेलात; रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
5
'व्हेनेझुएलासारखी परिस्थिती भारतातही उद्भवू शकते'; अमेरिकेच्या कारवाईवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठे विधान
6
'हिंदूंची हत्या ही एक किरकोळ घटना'; बांगलादेशी नेत्याचे धक्कादायक विधान
7
‘राजसाहेब तहात हरले, कुटुंबं एकत्र करण्यासाठी मनसेचा बळी दिला’, संतोष धुरींचा सनसनाटी दावा 
8
रील पाहता पाहता श्वास थांबला, पलंगावर बसलेल्या १० वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
9
मुकेश अंबानींच्या 'या' स्टॉकमध्ये दिसली गेल्या ८ महिन्यांतील सर्वाधिक घसरण, काय आहे शेअर आपटण्यामागचं कारण?
10
Vijay Hazare Trophy : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आधी गिल फ्लॉप; श्रेयस अय्यरनं हिट शोसह दाखवला आपला फिटनेस
11
VIDEO: "निघ नाहीतर गोळी घालेन..."; सीमेवर व्हिडीओ काढणाऱ्या बांगलादेशींना BSF जवानाचा इशारा
12
"तुम्हालाच नाईलाजाने आमची विचाराधारा स्वीकारावी लागतेय, हेच सत्य", आशिष शेलारांना अमोल मिटकरींचे खडेबोल
13
ईपीएफओ पेन्शनधारकांचे अच्छे दिन! किमान पेन्शनमध्ये ५ पटीने वाढ होण्याची शक्यता
14
ना एशियन पेंट्स, ना बर्जर! राष्ट्रपती भवन ते हावडा ब्रिजपर्यंत सगळे रंगवले; 'ही' आहे सर्वात जुनी कंपनी
15
'मोदी-शाह की कब्र...' JNU मध्ये विद्यार्थ्यांची वादग्रस्त घोषणाबाजी; भाजपचा जोरदार पलटवार...
16
Viral Video: ट्यूशनवरून परतणाऱ्या मुलींचा पाठलाग आणि अश्लील कमेंट्स; कुठे घडला 'हा' संतापजनक प्रकार?
17
सगळं असूनही मन अस्वस्थ का? मी आनंदी का नाही? वाचा चाळीशीनंतर पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं!
18
६ महिन्यांमध्ये १ लाखांचे केले ४ लाख; आजही जोरदार वाढ, कंडोम तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये का आली तेजी?
19
भारतीयांसाठी 'लॉटरी'! १ लाख रुपयांचे होतील ७५ लाख; दक्षिण अमेरिकेतील 'या' देशात राजेशाही थाटात जगाल
20
व्हेनेजुएलातील तेलाने अमेरिका मालामाल होणार; पाकिस्तानच्या GDP पेक्षा 30 पट अन् भारताच्या...
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 01:17 IST

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने राज्यात १४४ जागांची मागणी केलेली असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेला १२० पर्यंत जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. सेनेची मागणी व मिळणाऱ्या जागांचा विचार करता जिल्ह्यात युतीचे जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने राज्यात १४४ जागांची मागणी केलेली असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेला १२० पर्यंत जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. सेनेची मागणी व मिळणाऱ्या जागांचा विचार करता जिल्ह्यात युतीचे जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सन २००९च्या निवडणुकीत जिल्ह्यातील पंधरा जागांपैकी सेनेने स्वत:कडे दहा जागा ठेवून भाजपला पाचच जागा दिल्या होत्या. परंतु बदललेली राजकीय समीकरणे व दोन्ही पक्षांची वाढलेली ताकद पाहता भाजप सेनेकडून कमी जागेवर समाधान मानेल काय किंवा निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांची संख्या लक्षात घेता सेना आपल्या हक्काच्या जागा भाजपला सोडेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सन २०१४ चा अपवाद वगळता राज्यात शिवसेना-भाजपची कायमच युती राहिली आहे. त्यात शिवसेना मोठा भाऊ असल्यामुळे साहजिकच सेनेच्या वाट्याला नेहमीच जादा जागा आल्या आहेत. जिल्ह्यात १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेची राजकीय ताकद वाढल्यामुळे युतीच्या जागावाटपात सेनेला झुकते माप मिळत गेले. शिवसेना लढवित असलेल्या जागांपैकी निम्म्या जागांवर आजवर विजय मिळत आला आहे. सन २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर युतीच्या जागावाटपाचे सूत्रे बदलली. त्यावेळी सेनेने स्वत:कडे दहा जागा घेतल्या व पाच जागा भाजपसाठी सोडल्या होत्या. त्यात भाजप फक्त बागलाणची जागा जिंकू शकला, तर सेनेने चार जागांवर विजय मिळविला होता.सेना व भाजप दोन्ही पक्षांनी मतदारसंघाची व इच्छुकांचीही चाचपणी केली असून, ज्या जागांवर विद्यमान आमदार आहेत, त्या जागा त्या त्या पक्षांकडे कायम राहतील असे संकेत मिळत आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना राज्यातील निम्म्या जागांची मागणी करीत असून, तोच निकष नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांच्या जागा-वाटपाबाबत लावला, तर २००९च्या फॉर्म्युल्यानुसार भाजप पाच जागांवर समाधान मानेल काय, हाच खरा प्रश्न आहे. २००९ मध्ये भाजपने मालेगाव मध्य, बागलाण, चांदवड, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम या पाच जागा लढविल्या होत्या. त्यापैकी चांदवड, नाशिक पूर्व व पश्चिम या जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या जागा भाजप कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असे मानले जात आहे. मात्र या जागांव्यतिरिक्तआणखी जागांवर भाजपने दावा सांगितला आहे. त्यात प्रामुख्याने नांदगाव, कळवण, बागलाण या तीन मतदारसंघाचा समावेश आहे. या तीन मतदारसंघापैकी गेल्या निवडणुकीत कळवण व बागलाण या दोन मतदारसंघात भाजप अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकावर होती. आता त्यात नांदगावची भर पडली आहे. गेल्या निवडणुकीत नांदगाव मतदारसंघात शिवसेना दुसºया क्रमांकावर होती. त्यामुळे शिवसेना ही जागा सोडेल काय, असा प्रश्न उपस्थित होत असून, ती जागा सोडली तर सेना त्या बदल्यात नाशिक पश्चिम मतदारसंघाची मागणी करू शकते. मात्र कळवण व बागलाणच्या मोबदल्यात सेनेला कोणतेमतदारसंघ सुटतील याची उत्सुकता कायम आहे.भाजपची ताकद वाढल्याचा दावासन २०१४ मध्ये सेना व भाजप स्वतंत्र लढल्यामुळे दोन्ही पक्षांनी जिल्ह्यातील पंधराही जागांवर उमेदवार उभे केले त्यात भाजपला चार, तर सेनेलाही चार जागांवर विजय मिळाला. सेनेशी युती न करता स्वतंत्र लढल्यामुळे ताकद वाढल्याचा दावा भाजपच्या वतीने केला जात असला तरी, आगामी विधानसभा निवडणुकीत युती करण्याची व जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. ज्या मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार आहेत, त्या मतदारसंघातील जागावाटप कसे होणार याविषयी इच्छुकांना उत्सुकता आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा