शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नांदूरशिंगोटे बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 6:09 PM

नांदूरशिंगोटे : येथील बसस्थानकाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर व जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या नांदूरशिंगोटे येथील बसस्थानकात तीनशेच्या आसपास बसची नोंद होते. तसेच दररोज शेकडो प्रवाशांची चढ-उतार येथे होत असते. पंचवीस गावांचा केंद्रबिंदू व मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील प्रवाशी येथील बसस्थानकाला पसंती देतात. परंतु येथील बसस्थानकाची गेल्या काही वर्षापासून दुरवस्था झाल्याने ग्रामस्थ व प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तीन ते चार वर्षापूर्वी ग्रामस्थांच्या मागणीनतंर बसस्थानकाची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली होती. बसस्थानक परिसरात खड्डेच-खड्डे व घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात दुर्गंधी पसरते. सिन्नर, संगमनेर, नाशिक, लोणी, दोडी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी परिसरातील गावांतील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थींनी येथील बसस्थानकात दररोज येत असतात. पावसाळ्यात आवारातील या खड्यांमध्ये पाणी साचल्याने प्रवाश्यांना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या पाण्यातूनच वाट शोधावी लागते. तसेच बसस्थानकात प्रवेश करताना अनेक बसचालकांना खड्डा वाचवितांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बसस्थानकातील काही भागातील डांबरीकरण उखडले असल्याने अनेक ठिकाणी खड्डे पहावयास मिळत आहे. तसेच काही भागात पत्र्यांना गळती असल्याने प्रवाशांना बसस्थानकात ताटकळत उभे रहावे लागते. परिवहन विभागाने याबाबत लक्ष घालून बसस्थानकातील खड्ड्यांची दुरूस्ती करण्याची मागणी प्रवाशांसह ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :passengerप्रवासी