शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

नदीत जाणारे प्रदूषित पाणी तातडीने रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:26 IST

गोदावरी व नंदिनी नदीत होणारे प्रदूषण व नदीत जाणाऱ्या गटारीच्या पाण्याकडे मनपाचे होणारे दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करताना सहा महिन्यांत गटारीचे पाणी दोन्ही नदीत जाणार नाही याबाबत कारवाई करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले.

नाशिक : गोदावरी व नंदिनी नदीत होणारे प्रदूषण व नदीत जाणाऱ्या गटारीच्या पाण्याकडे मनपाचे होणारे दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करताना सहा महिन्यांत गटारीचे पाणी दोन्ही नदीत जाणार नाही याबाबत कारवाई करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या कार्यकारी अभियंता संजय घुगे यांना दिले  या नदी प्रदूषणासंदर्भात आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी विचारलेल्या विधी मंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंघाने विधानभवन येथे झालेल्या बैठकीत कदम यांनी हे आदेश दिले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून आमदार वारंवार पाठपुरावा करत असताना अधिकारी वर्गाचे सातत्याने दुर्लक्ष होत असले बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन महिन्यांत सातपूर व अंबड येथे गटार व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करून देणे कामी सूचना औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना देण्याचे अन्यथा कारवाही करण्याचे आदेश त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव डॉ. अनबलगन यांना दिले. या बैठकीस अवर मुख्य सचिव गवई, डॉ. अमर सुपाते, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे संचालक डॉ. पाटील, प्रादेशिक अधिकारी आर. यू. पाटील आदी उपस्थित होते.सहा महिने मुदतसहा महिने ही अखेरची मुदत असून, त्यात कोणत्याही परिस्थितीत वाढ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सातपूर औद्योगिक वसाहतीत २७४ कारखाने व अंबड औद्योगिक वसाहतीत ४०४ कारखाने सुरू असताना औद्योगिक विकास महामंडळाने गटारीची व्यवस्था केलेली नाही हे गंभीर असल्याचे कदम यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण